Saturday, December 26, 2009

GROUND REALITY IN TILAK NAGAR CHEMBUR

GROUND REALITY IN TILAK NAGAR


Razing illegal structures not an easy task

Times of India , 26th Dec 2009


S Balakrishnan | TNN

Mumbai: The Bombay high court recently placed the onus of ensuring the legality of the flats on the purchasers. But the case of Tilak Nagar residents in Chembur shows how difficult it is to get illegal structures demolished. For more than one-and-a-halfyears the BMC’s M/west ward office of the is trying to demolish a seven-storeyed unauthorised building, but without much success.
Building no. 29 in Tilak Nagar was demolished for redevelopment by Paradise and Bhoomi Developers as per an agreement with Bharat Cooperative Housing Society. All the 36 tenants were rehoused
in A wing of the new building and 42 flats in B wing were to be sold. In late 2007, the residents found work on a totally new wing—C—in progress in the compound.
A resident of B wing, Sophia Sawant, filed an RTI application in January, 08. The BMC permitted her to inspect the building plans etc and it was found that the new structure was unauthorised. Following Sawant’s complaint, the BMC initiated action against builder Javed Memon, chairman of the society, Kumud Jaykar and secretary Mohan Pednekar under the Maharashtra Regional Town Planning Act. All three were arrested and released on bail.
Memon moved the HC for stay against the demolition which was refused. Following this the BMC started demolition in April, 2008. The BMC punctured the walls of the C wing and called for a tender to carry out further demolition without harming the legal portions of the building.
Sawant and seven other residents of B wing filed a writ peitition in the HC against unauthorised construction of C wing, open space violations and the absence of a proper entrance to their wing. The residents found that the passage which they were using as entrance was closed by Ms Jaykar who said the area was meant to be a shop purchased by her daughter Poonam.
With the access to their homes blocked, the petitioners sought the court’s intervention. The HC appointed a court commissioner Chirag Shah to visit the site and report to it. The residents also complained to the police. Following pressure from the police officials, the grille was removed and the residents got access to their building.
The BMC claimed that the builder had balance FSI against which the seventh floor of B wing, first floor of C wing and two shops could be regularised provided he demolished the remaining illegal portions within 30 days. “But the illegal structure is still in in tact,’’ Sawant complained. Memon was unavailable for comment. Sawant alleged that most buildings in Tilak Nagar, which was a housing board colony, had several illegal floors, but the BMC was not demolishing them.M/West ward Ramesh Pawar said he was readying to completely demolish the illegal wing.


Sunday, December 13, 2009

News in Maharashtra TImes dt. 14th Dec. 2009

Following news is published in Maharashtra Times dt. 14th Dec. 2009. Why such kind of action is not being taken of polluting Ravi Steel, located at Majiwada Junction, Thane West and Shanti Textiles , Kolshet Road, Thane West ?


बोईसरच्या प्रदूषणकारी १५ कारखान्यांचे पाणी तोडले
14 Dec 2009, 0153 hrs IST
:

- म. टा. वृत्तसेवा , पालघर


बोईसर औद्योगिक वसाहतीतील २१ कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हे कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते व त्यानंतर लागलीच अवघ्या ४८ तासांनंतर १५ कारखान्यांचा पाणी पुरवठा महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने खंडित केला आहे.

वीज कंपनीने तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यास नकार दिला आहे, तर आणखी १०० कारखान्यांवर कारवाई होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गेल्या काही वर्षांनंतर अशा स्वरूपाची मोठी कारवाई होत असल्याने कारखानदारांत एकच खळबळ उडाली आहे. कारखाने बंद करण्याच्या आदेशात अनुप फार्मा, वसुंधरा डेअरी, निर्भय रसायन, करमतारा इंजिनीअरिंग, जे. बी. टेक्सटाइल, आरती ड्रग, फार्मास्युटिकल प्रॉडक्टस ऑफ इंडिया, झियस इंटरनॅशनल रोल्सन सिंथेटिक्स, विराज प्रोफाइल्स, डिसीटेक्स डेकोअर, कफम्लीन फाईन केमिकल्स, मनोहर प्रोसेसर, डेक्टो टेक्सटाइल, डि-सी-टेक्सटाइल, अंगतपाल इंडस्ट्रीज, निपुर केमिकल्स, सम्राट निटरर्स आदी कंपन्यांचा समावेश आहे.

औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून उत्पादनासाठी वापरले जाणारे पाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंदातून 'ओव्हर फ्लो' होत असल्याने तसेच या पाण्याच्या दर्जात सुधारणा होणे, सांडपाणी गोळा करणाऱ्या पम्प क्रमांक ३ला त्याची जोडणी न करणे, समुद व खाडीतील पाण्यात असणारे मासे मृत्युमुखी पडणे, बॉम्बे रेयॉन फॅथन लि. व डि- सी-डेकोअर या कारखान्यांना परवानगी देण्याबाबतीत बोईसर विचार मंचातफेर् तक्रार करण्यात आली होती.

Friday, December 4, 2009

News in LOKMAT dt. 4th Dec. 2009

This news appeared on the 2nd page of Main Mumbai edition of LOKMAT .

You can very well see the current situation on GHODBUNDER ROAD, which is still same as in the past.

Wednesday, December 2, 2009

Bhopal like condition on Ghodbunder Raod, Thane, Maharashtra

On 2nd Dec. 2009 , I got up in the morning with breathing Highly Polluted Air coming out from one Shanti Textiles, Situated on Kolshet Road, Off. Ghodbunder Road, Thane WEST, Maharahstra State, INDIA.

Today, it the 25th year for Bhopal Gas Tragedy.

In spite of Fight since 2002/2003 Against Air Pollution in Residential Area , still residents of Ghodbunder Road has to breath polluted air.

Many times I wonder, how residents are keeping quite .

Wednesday, November 25, 2009

News in Maharashtra Times dt. 25th Nov. 2009

ठाणे + कोकण

घोडबंदर अजूनही प्रदूषणाच्या कचाट्यात!


25 Nov 2009, 0133 hrs IST

म. टा. प्रतिनिधी


घोडबंदर परिसरातील कंपन्यांमधून होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या विरोधात येथील रहिवाशांनी लढा उभारला आहे. हे प्रदूषण बंद करण्यासाठी वारंवार आंदोलने केल्यानंतर 'रवी स्टील' या कंपनीच्या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हे दाखल केले. मात्र, त्यानंतरही या कंपन्यांमधून होणारे प्रदूषण कायम असून वायू आणि रसायनमिश्रीत पाणी यामुळे येथील रहिवाशांचे जगणे असह्य झाले आहे.

घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्ध हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून येथे काँक्रिटचे जंगल उभे राहिले. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग इमारती थाटल्या गेल्या. परंतु, या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्ध हवेसाठी झगडावे लागत आहे. घोडबंदर परिसरातील अनेक कंपन्यांना टाळे लागले असले तरी आजही तेथे अनेक कारखाने सुरू आहेत. त्या कंपन्यांच्या चिमण्यांमधून उत्सजिर्त होणाऱ्या वायूमुळे डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायूमुळे अन्नावरील वासना उडणे असे त्रास रहिवाशांना होत आहेत. 'हाइड पार्क' सोसायटीतील रहिवाशांना असाच त्रास भेडसावत होता. महापालिका, पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सत्यजित शहा या दक्ष नागरिकाने ही समस्या मागीर् लावली आहे. 'हाइड पार्क'ची समस्या सुटली असली तरी कोलशेत रोड येथील श्रुती पार्क, माजिवडा येथील रुणवाल रिजन्सी आणि ऑकिर्ड, पोखरण रोड नं. २ येथील ओस्वाल पार्क अशा अनेक सोसायट्या या वायूप्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. हे वायू प्रदूषण संपावे, यासाठी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी दोषी कंपन्यांवर कारवाई करून प्रदूषण कमी करण्याचे आश्वासन आंदोलनर्कत्यांना देण्यात आले हाते. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपन्यांवर गुन्हे दाखल केले असले तरी प्रदूषण मात्र संपलेले नाही, अशी माहिती सत्यजित शहा यांनी दिली.

'रहिवासी संकुले उभी राहण्यापूवीर् या कंपन्या तिथे अस्तित्वात होत्या. त्यामुळे त्यांनी या भागातून स्थलांतर करावे, अशी आमची मागणी नाही. परंतु, कंपन्यांमध्ये प्रदूषणासंबंधीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने रहिवाशांना त्याचा उपदव होत आहे. या कंपन्यांमधून प्रदूषित हवा आणि रासायनिक पदार्थांचे उत्सर्जन होणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यावी एवढीच अपेक्षा आहे', असे सत्यजित शहा यांनी सांगितले.


Wednesday, October 21, 2009

Photos clicked on 21st Oct. 2009 of a polluting chimney of Ravi Steel

These are photos clicked on 21st Oct. 2009 of a polluting chimney of Ravi Steel , Majiwada, Thane West, Maharashtra, INDIA.


This is INDIA.

It is PITY that inspite of continuous FIGHT , AIR POLLUTION IS STILL EXISTING IN RESIDENTIAL AREA .

In INDIA DOGS are being well treated than HUMAN BEINGS.


Friday, October 16, 2009

News in Maharashtra Times about Unauthorised Party Offices

ठाणे + कोकण

बेकायदा पक्ष कार्यालयांवर कारवाई15 Oct 2009, 0141 hrs IST


ठाण्यातील बेकायदा पक्ष कार्यालयांवर चार आठवड्यांत कारवाई


म. टा. प्रतिनिधी

ठाणे शहरातील राजकीय पक्षांच्या ११५ अनधिकृत कार्यालयांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांच्यावर कारवाई करता आली नसल्याने त्यासाठी हायकोर्टाने बुधवारी पालिका प्रशासनाला चार आठवड्यांची मुदत दिली.

बेकायदा कार्यालयांवर कारवाई करतानाच त्यांना अभय देणाऱ्या संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळे न्या. जे. एन. पटेल यांच्या खंडपीठाने अनधिकृत कार्यालयांवर कारवाई करण्यासाठी चार आठवड्यांंची मुदत दिली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर होणाऱ्या कारवाईत महापालिका आणि राजकीय पक्ष यांच्यात धूमशान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाण्यातील दक्ष नागरिक प्रदीप इंदुलकर आणि नितीन देशपांडे यांनी २००६ मध्ये शहरातील बेकायदा पक्ष कार्यालयांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावेळी पालिकेने कोर्टाला सादर केलेल्या एका अहवालानुसार शहरातील ९८ पैकी ८८ कार्यालये बेकायदा असल्याचे मान्य केले होते. नव्या सवेर्क्षणानुसार ही संख्या आता ११५ पर्यंत गेली आहे. या कार्यालयांवर पालिकेने कोणती कारवाई केली, याबाबतचा अहवाल १४ ऑक्टोबर रोजी सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्यानुसार कोर्टाच्या आदेशानुसार पालिकेचे आयुक्त नंदकुमार जंत्रे, उपायुक्त सुधीर भातणकर आणि विधी सल्लागार मकरंद काळे हायकोर्टात सुनावणीसाठी उपस्थित होते. १३ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीच्या कामात पालिकेचे अधिकारी गुंतलेले होते. तसेच, या पक्ष कार्यालयांवरील कारवाईसाठी आवश्यक असलेले पोलिसांचे बळही निवडणुकीमुळेच मिळणे अशक्य होते. त्यामुळे कारवाई करता आली नाही. परंतु, ही बेकायदा बांधकामे करणाऱ्या पक्षांना रीतसर नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

ही कार्यालये उभारणाऱ्या पक्षाच्या नेत्यांविरोधात महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग अॅक्टच्या (एमआरटीपी) कलम १५२ अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. तसेच, पालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, असे कोर्टाने बजावले आहे. या बेकायदा कार्यालयांवर आणि अधिकाऱ्यांवर पालिका कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

...........

नगरसेवकपद रद्द करा

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे नगरसेवकपद रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. काही जणांचे पदही त्यामुळे रद्द झालेले आहे. तोच निकष लावत शहरातील ज्या अनधिकृत पक्ष कार्यालय उभारणीत विद्यमान नगरसेवकांचा सहभाग आहे, त्यांचे पदही रद्द व्हायला हवे, अशी मागणी नितीन देशपांडे यांनी केली आहे.

Friday, October 9, 2009

Photo of a polluting CHIMNEY in this MODERN WORLD

This is a photo of a polluting CHIMNEY of RAVI STEEL, MAJIWADA , THANE WEST , Maharashtra clicked on 3rd Oct. 2009 .

This is the situation after fightening since 2002/2003 against AIR POLLUTION IN RESIDENTIAL AREAS .

But I will never back out from this FIGHT as whenever I see AIR POLLUTION, I remmber my late mother, who died because of CANCER OF LUNGS.

I don't want present as well next generation should DIE because of CANCER , ( AIR POLLUTION is one of the cause for CANCER ).

This happens only in INDIA .

Not a single candidate in the forthcoming election speaks about this pollution in their ELECTION MANIFESTO.

PIL filed by Shri. Pradeep Indulkar ragarding NANDLAL COMMITTEE REPORT

Saturday, October 3, 2009

News in Maharshtra Times about problems created by STRAY DOGS

लोकपुरम की श्वानपुरम?
3 Oct 2009, 0417 hrs IST



भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने लोकपुरमचे


रहिवासी बेजार

>> म. टा. प्रतिनिधी, ठाणे

लोकपुरम सोसायटीत राहणाऱ्या एक हजार कुटुंबांना दोन श्वानप्रेमींनी अक्षरश: रडकुंडीला आणले आहे. या श्वानप्रेमींनी २० ते २२ भटक्या कुत्र्यांना पाळले असून या कुत्र्यांनी गेल्या सहा महिन्यात सात ते आठ मुलांचे लचके तोडले आहेत. या कुत्र्यांच्या दहशतीमुळे लोकांना घराबाहेर पडण्यासही भीती वाटत असून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या श्वानप्रेमींना अटकही झाली होती. परंतु, त्यानंतरही या श्वानप्रेमींचा उपदव संपला नसून पालिकेने इथल्या कुत्र्यांना सोसायटीच्याबाहेर स्थलांतरीत करावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

लोकपुरम ही ठाण्यातली सर्वात जुनी सोसायटी असून तिथल्या इमारतींमध्ये ११०० फ्लॅट आहेत. त्याशिवाय या सोसायटीच्या आवारात लोकपुरम पब्लिक स्कुल असून त्यात तीन हजार विद्याथीर् शिक्षण घेत आहेत. या सोसायटीत राहणाऱ्या संजीव दिघे आणि यतिन म्हात्रे हे श्वानप्रेमी सभोवतालच्या कुत्र्यांना दररोज खायला प्यायला देत असतात. त्यामुळे हे कुत्रे सोसायटीच्याच आवारात डेरा टाकून बसतात. ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर भुंकणे, त्यांच्यावर चाल करून जाणे असे प्रकार करणाऱ्या या कुत्र्यांनी प्रचंड दहशत निर्माण केल्याचे इथले रहिवासी सांगतात. रात्री बारा - एक वाजल्यानंतर चालत किंवा बाईकवरून घेरी जाणे अवघड झालेय. अनेकांनी मॉनिर्ंग वॉक आणि जॉगिंगला सोडचिठ्ठी दिली आहे. पहाटेच्या शांतसमयी, मोकळा वारा अंगावर घेत, शुद्ध हवा पीत जॉगिंग करत असतानाच कुत्रे चावल्याने काही जणांना थेट हॉस्पिटलात जावं लागले आहे. रात्रपाळीवरून परतणारे कर्मचारी, पेपर विक्रेते आणि दुधाचं वाटप करणारे विक्रेते यांनाही भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. या कुत्र्यांनी सर्वाधिक दहशत निर्माण केली आहे ती सोसायटीतल्या मुलांवर. गेल्या आठवड्यात संजीवनी झा या आठ वर्षाच्या मुलीला कुत्रा चावला. त्यामुळे इथल्या रहिवाशांमध्ये खदखदणाऱ्या संतापाचा उदेक झाला. त्यांनी थेट वर्तकनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस निरिक्षक जाधव यांनी या परिसराची पाहणी केली. इथे कुत्र्यांची खरोखरच दहशत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर या दोन श्वानप्रेमींना एक दिवस गजाआड पाठविण्यात आले होते. त्यानंतर तरी या कथित श्वानप्रेमींचे वागणे बदलेल अशी सोसायटीतल्या रहिवाशांची अपेक्षा होती. परंतु, ती साफ फोल ठरली आहे.

प्राण्यांविषयी ममत्व सोसायटीच्या सामान्य लोकांच्या मनातही आहेच. मात्र, जिथे स्वत:च्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्यानंतर संकटावर जालीम उपाय शोधायलाच लागतो. त्यामुळे या कुत्र्यांचा बदोबस्त करण्याची मागणी इथल्या रहिवासी अॅड. उमेशचंद यादव-पाटील यांनी केली आहे. बंदोबस्त करा म्हणजे सरसकट सर्व कुत्र्यांना ठार मारून टाका असे आम्हाला म्हणायचे नसून या कुत्र्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करणे सहज शक्य आहे. पालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा अशीच विनवणी इथले रहिवासी करत आहेत.

Thursday, October 1, 2009

Open Letter to Environment Minister

This open letter written by me to Shri. Ganesh Naik - Environment Minister - Maharashtra State was published in Maharashtra Times dt. 5th Dec. 2004.

Till date pollution is existing on Ghodbunder Road, Thane.

Where as population is increasing at rapid speed.

This only happens in INDIA.


Friday, September 18, 2009

News of Air Pollution in Dombivali in Maharashtra Times

प्रदूषणामुळे डोंबिवलीकर हैराण
18 Sep 2009, 0148 hrs IST

म. टा. प्रतिनिधी


डोंबिवली एमआयडीसीतील विषारी वायू ओकणाऱ्या कंपन्यांमुळे निवासी विभागात राहणाऱ्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून, या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी एमआयडीसीच्या निवासी विभागातील रहिवासी करत आहेत. याआधीही तेथील रहिवाशांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर काही प्रमाणात कमी झालेल्या प्रदूषणाने पुन्हा डोंबिवलीकरांना त्रस्त केले आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यापैकी काहींमधून प्रक्रिया न करताच विषारी रासायनिक वायू हवेत सोडला जातो. एरवीही असा वायू सोडला जात असला तरी गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण वाढल्यामुळे निवासी भागात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये काही विकार बळावले आहेत. सदीर्, खोकला, घशाची खवखव, अस्वस्थ वाटण्यासारखे अनेक प्रकार येथील रहिवाशंाना जाणवत असल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

विशेष करून रात्री १२ वाजेनंतर ते सकाळी पाचपर्यंत हवेत विषारी वायू अधिक प्रमाणात सोडला जात असल्याचा स्थानिकांंचा अनुभव आहे. सकाळपर्यंत घराची बाल्कनी किंवा इमारतीच्या गच्चीवर काळया पावडरचा थर जमा होत असल्याचे दिसून आले आहे. या वायूमुळे आरोग्याच्या तक्रारी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे तेथील रहिवाशांची तक्रार आहे. या वायूमुळे आरोग्य धोक्यात आल्याने त्यावर प्रक्रिया करुन सोडण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन याआधाही मिलापनगर आणि सुदर्शन नगर निवासी संघाच्या वतीने कंपन्यांना देण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात एक तक्रारही कल्याण येथील राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाला करण्यात आली होती.

त्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तेथील कंपन्यांवर वॉच ठेवल्यानंतर प्रदूषणाचे प्रमाण खालावले होते. परंतु, आता पुन्हा एकदा हा त्रास जाणवू लागल्याने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी मिलापनगर रेसिडेन्टस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजू नलावडे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जीतेंद संगेवार यांना संपर्क साधला असता रसायने घेऊन येणारे काही टँकर एमआयडीसीतील नाल्यांमध्ये ते सोडत असल्याने तेथील रहिवाशांना त्रास होत असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली. लोकसहभागाशिवाय या टँकर लॉबीला रोखणे अशक्य असल्याचे सांगत मागील वेळी मंडळाच्या पाहणीत एकही कारखाना प्रदूषण करतांना आढळून आला नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले.

Saturday, July 25, 2009

News in Hindustan Times - 25th July, 2009

Sporting an air filter mask and a placard saying `Fresh air is our birth right', 11-year-old Prithvi Kasulla made no bones about his protest against chimneys coughing out toxic fumes.
"I have taken a day off from school to register my protest,"
said Kasulla. "In school we are taught about the hazards of air pollution but everyday smoke enters our homes causing cold, cough and irritation in the eyes."

Kasulla was one of the 60 residents who protested outside the office of Maharashtra Pollution Control Board (MPCB) on July 18.

HT Live had reported (March 21) on how residents of Ghodbunder Road in Thane, who had been waking up to polluted air, had started a signature campaign against factories in the area.

The board has now pressed criminal charges against companies at fault.

"We decided to stage our protest after several requests went unnoticed," said Maithilee Chendvankar, resident of Oswal Park. "How will you react if you find black particulate matter accumulating on vehicles and on floors of your house every morning? We suffer from coughs and irritation of eyes, all thanks to pollution."

The fight against pollution was started by Satyajit Shah resident of Hyde Park Regency eight years ago.

In a written assurance given to residents, A.D. Mohekar regional officer of MPCB, said "We had given orders to shut down three factories in the residential area on May 20, 2009."

"While one was closed, Rav Steel and Shanti textile had appealed for a hearing," said Mohekar. "They were allowed to operate provided they followed norms of upgrading efflu ent treatment plant, installing dust collectors and scrubbers.

"Since these factories still continue to pollute, we have filed criminal charges under air and water act against them."

, An alternative is to provide , Mahanagar Gas connections to these industries.

"LPG will not cause pollution , and will benefit both the par: ties," he said. "After all, the fac tories have been in the area before the residential complexes, which mushroomed due to lack i of planning."

Another official requesting anonymity alleged that it is the land mafias that have caused these problems.

Monday, July 20, 2009

News in LOKSATTA dt. 19th July, 2009



Following news appeared in LOKSATTA dt. 19th July, 2009 on the main page. We are getting support from media also.

घोडबंदर रोडवरील प्रदूषणाविरोधात अभिनव आंदोलन
महिला व मुलांचाही सहभाग
कंपन्यांविरुध्द गुन्हे दाखल होणार
ठाणे, १८ जुलै/प्रतिनिधी
घोडबंदर रोडवरील हजारो रहिवाशांना वायूप्रदूषणामुळे जगणे अवघड करणाऱ्या कंपन्यांविरोधात सर्वसामान्य जनताच आज भाजप आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनास बसल्याने धास्तावलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अखेर या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले.

घोडबंदर रोडवरील रवी इंडस्ट्रीज, शांती टेक्स्टाईल व नरेंद्र सिल्क मिल या कंपन्यांमधून बाहेर पडणारा उग्र दर्पाचा वायू, तसेच काळ्याकुट्ट धुरामुळे माजिवडा, ढोकाळी, तत्त्वज्ञान विद्यापीठ, कोलशेत रोड, पोखरण-२ येथील असंख्य नागरिकांना श्वसनाचे, तसेच त्वचाविकार होत आहेत. विशेषत: लहान मुलांना या प्रदूषणाचा त्रास जास्त होत होता. याविरोधात सत्यजित शहा, दीपाली पाटील, मैथिली चेंदवणकर, सत्यजित आहेर, सुहास पोतनीस, सुनील बारहाते आदी जागरुक रहिवाशांनी लढा सुरू केला होता. ‘लोकसत्ता’ने हा विषय सतत लावून धरलेल्या या प्रकरणात आमदार केळकर यांनीही या कंपन्यांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न चालविले होते. नरेंद्र सिल्क मिल या कंपनीला सूचना, नोटिसा देऊनही या कंपनीने प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा बसविण्यास टाळाटाळ केल्याने अखेर ती बंद झाली.
उर्वरित दोन कंपन्यांमुळे प्रदूषणाचा त्रास वाढत गेल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी होत होती, पण राष्ट्रवादीच्या एका वजनदार मंत्र्याच्या दबावामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शांत बसून होते. अखेर शनिवारी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली रहिवासी एकत्र आले व येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर धरणे धरले. ‘शुद्ध स्वच्छ मोकळी हवा, मिळणार आम्हाला केव्हा? ’, घोडबंदर रोड भोपाळ होण्यापासून वाचवा’, ‘प्रदूषणाचा लागला फास, केव्हा मिळणार मोकळा श्वास’ असे फलक घेऊन मुले व महिलाही या अभिनव आंदोलनात सहभागी झाले होते. रहिवाशांनी घोषणाबाजी केली. नंतर मंडळाचे अधिकारी पोहेकर हे आले व त्यांनी उपरोक्त दोन कारखान्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले, तसेच याप्रकरणी मंडळाच्या सायन येथील कार्यालयात मंगळवारी बैठक घेण्याचेही त्यांनी मान्य केले. या बैठकीस मंडळाचे सचिव, तसेच दोन्ही कारखान्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मंदीच्या काळात कारखाने बंद होऊन तेथील कामगार देशोधडीला लागू नयेत, अशीच आमची इच्छा आहे. या कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती उपकरणे बसवावीत, हाच आमचा आग्रह असल्याचे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.

Saturday, July 18, 2009



In this photo you can see Shri. A D Mohekar - Regional Offier - Maharashtra Pollution Control Board, Regional Office , Thane , who came down from his office to whom Shri. Sanjay Kelkarji handed over appeal letter from RESIDENTS OF GHODBUNDER ROAD. Kelkar saheb explained Mohekar Saheb about the current position of pollution at these two companies ( i.e. Ravi Steel and Shanti Textiles ) and asked him to take very strct action against these industries. Shri. Mohekar Saheb promised to take serious action ( Filing of a police complaint against these indsutries ) .

After insistence to give written promise from Shri. Sanjay Kelkarji, Shri. Mohekar Saheb agreed to give the written assurance within half an hour.

Good number of press and T.V. reporters were present for this DHARANA ANDOLAN.

Dharand Andolan on 18th July, 2009




On Saturday, 18th July, 2009, we residents of GHODBUNDER ROAD, THANE ( Who are affected by AIR POLLUTION CREATED BY FEW INDUSTIRES ) staged DHARANA ANDOLAN in front of the Regional office of Maharashtra Pollution Control Board, Thane under the leadershiop of Honorable Shri Sanjay Kelkar - M.L.C. - Maharashtra State.

Many residents including senior citizens, ladies, school going boys from following affected housing societies

1.)Hyde Park , Ghodbunder Road, Thane (W) - 400 607 , affected by Shanti Textiles

2.)Shruti Park, Kolshet Road , Thane (W) - 400 607 - Affected by Shanti Textiles

3.)Runwal Regency , Majiwada , Thane (W) - 400 607. - affected by Ravi Steel.

4.)Orchid Complex, Bougan Villa, Majiwada Village, Thane West - 400 607 - affected by Ravi Steel.

5.)Parameshwari Paradise C.H.S., Majiwada , Thane (W) - 400 607. - affected by Ravi Steel.

6.)Oswal Park , Pokhran Road no.2 , Thane (W) - 400 607. - affected by Ravi Steel.

7.)Urvi Park , Pokhran Road no.2 , Thane (W) - 400 607. - affected by Ravi Steel.

Many of the senior dignitaries from THANE BJP unit like Dyputy Mayor, Waghole Sahed , Milind Patankar Saheb, were present on this occassion.


Honorable Shri Sanjay Kelkarji elaborated about the reason behind DHARANA ANDOLAN . Few residents expressed their problems because of the pollution.

Thursday, July 16, 2009

News about Dharana Andolan in Loksatta dt. 17th July, 2009

प्रदूषणाविरोधातील लढाईसाठी आमदार केळकर सरसावले
शनिवारी घोडबंदरवासीयांचे धरणे आंदोलन
ठाणे/प्रतिनिधी
राज्याचे पर्यावरण सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या गणेश नाईक यांचे त्यांच्याच जिल्ह्यातील प्रदूषणाकडे लक्ष नसून, विषारी धूर ओकणाऱ्या कारखान्यांमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य


धोक्यात आले आहे. याचा जाब विचारण्यासाठी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली घोडबंदर परिसरातील रहिवाशांतर्फे प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर येत्या १८ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
‘ठाणे वृत्तान्त’ ने या संबंधी वेळोवेळी आवाज उठविला होता. आमदार केळकर यांनीही या प्रश्नात काही महिन्यांपासून लक्ष घालण्यास सुरुवात केली असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करणारी नरेंद्र सिल्क मिल ही कंपनी बंद करण्यात आली. घोडबंदर परिसरात सध्या मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहात आहेत. मात्र या भागातील काही कारखान्यांमधून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असून, त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रवी स्टील, शांती टेक्सटाइल या कंपन्यांमधून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे. कंपन्या ओकणाऱ्या धुरामुळे कापूरबावडी, कोलशेत तसेच घोडबंदर भागातील विविध गृहसंकुलात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही हे कारखाने प्रदूषण करीत असल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र केवळ सरकारच्या दबावामुळे आणि पर्यावरणमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे या कंपन्या रहिवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला.
ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या भागात प्रदूषणात वाढ होत असूनही पर्यावरणमंत्री आणि त्यांचा प्रदूषण नियंत्रण विभाग काहीच कार्यवाही करीत नाही. त्यामुळे १८ जुलै रोजी प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून, त्यात घोडबंदर परिसरातील रहिवासी सहभागी होणार आहेत, अशी माहिती केळकर यांनी दिली.

Article in Thane Vrutant of 16th July, 2009 of LOKSATTA.

शापित घोडबंदर वासीयांना उ:शाप कधी?
अजून नाही सरल्या आशा..
राजीव कुळकर्णी
ठाणे रेल्वे स्थानकापासून फक्त पाच किमी अंतर.. निसर्गरम्य वातावरण.. प्रशस्त रस्ते.. हाकेच्या अंतरावर शाळा, बँका अन् रुग्णालय.. लॅण्डस्केप गार्डन आणि स्विमिंग पूल.. अशी वैशिष्टय़े

असणाऱ्या जाहिरातींना भुलून घोडबंदर रोड, कोलशेत रोड, ढोकाळी, माजिवडा येथे हजारो रहिवाशांनी फ्लॅट्स घेतले खरे! पण दहा वर्षांपूर्वी येथील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आजही तशाच आहेत. किंबहुना त्यात भरच पडत आहे. जगण्यासाठी फक्त स्वच्छ हवा द्या, ही साधी मागणीही महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पूर्ण करू शकलेले नाहीत!
टी. चंद्रशेखर हे पालिका आयुक्त असताना घोडबंदर रोडच्या दुतर्फा आलिशान व टोलेजंग गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. शहराच्या तुलनेत येथील फ्लॅटचे दर खूपच कमी असल्याने काही वर्षांतच येथील वनराई नष्ट होऊन सिमेंट-काँक्रिटचे जंगल उभे राहिले. या भागात बऱ्याच कंपन्याही होत्या. जागांना सोन्याचा भाव येऊ लागल्याने मग अनेक कंपन्या हळूहळू बंद झाल्या. नशीबवान असलेल्या काही कामगारांना आपली कायदेशीर देणी मिळाली, पण हजारो जण देशोधडीला लागले.
जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेच्या रेटय़ात अजूनही कारखाने तग धरून आहेत. कारखाने चालू राहावेत, लोकांचा रोजगारही कायम राहावा, हीच या भागातील रहिवाशांची इच्छा असली, तरी आपल्या कारखान्यातील रासायनिक पदार्थ, तसेच बाहेर पडणारा उग्र दर्पाचा वायू यासाठी प्रदूषण नियंत्रित करणारी यंत्रणा बसविण्याची तसदी कंपनी मालक घेत नाहीत. हीच या भागातील रहिवाशांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. कारखान्यातून बाहेर फेकला जाणारा काळाकुट्ट धूर, कोळशाचे सूक्ष्म कण, डोके भणाणून टाकणारा रसायनांचा वास यामुळे येथील नागरिकांना श्वसन तसेच त्वचाविकाराचा त्रास सुरूआहे. महापालिका तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने यादृष्टीने पावले उचलावीत, यासाठी रहिवाशांनी अनेकदा निवेदने दिली. आयुक्त नंदकुमार जंत्रे, महापौर स्मिता इंदुलकर, मनीषा प्रधान आदींच्या भेटी घेतल्या, पण थातूरमातूर उपाययोजनांपलीकडे काहीच प्रगती झाली नाही.
हाईड पार्क सोसायटीतील सत्यजित शहा हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या संकटातून घोडबंदरवासीयांना मुक्त करावे म्हणून संघर्षरत आहेत. त्यांच्या सोसायटीतील अनेकांनी त्यांना पाठिंबा व सहकार्य दिल्याने एका कंपनीवर कारवाई झाली. थोडेसे यश मिळाल्याने शंकर तलवार (श्रुती पार्क), सत्यजित आहेर (रुणवाल रिजन्सी), सुहास पोतनीस (ऑर्किड), मैथिली चेंदवणकर (ओसवाल पार्क), दीपाली पाटील (ऊर्वी पार्क), सुनील बारहाते (परमेश्वरी पॅरेडाईज) यासारखे काही जागरुक नागरिक त्यांच्यासमवेत या लढय़ात आता उतरले आहेत. स्वाक्षऱ्या गोळा करण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे. प्रताप सरनाईकांपासून सुधाकर चव्हाण आणि हणमंत जगदाळेंपासून इंदिसे यांच्यापर्यंत अनेकांना ओवळा-माजिवडा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीची कोंडी, टीएमटीचा अनागोंदी कारभार, दररोज होणारे अपघात, पाणी टंचाई या प्रश्नांबरोबरच वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येकडेही या नेत्यांना लक्ष द्यावे लागेल. कापूरबावडी उड्डाणपुलाचे श्रेय लाटण्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चढाओढ लागली असली, तरी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडेच पर्यावरण खाते आहे, हेही या नेत्यांनी ध्यानात घेतल्यास बरे होईल. कारण प्रदूषण पसरविणाऱ्या या कारखान्यांबद्दल धोरण स्पष्ट करा व मगच मते मागायला या, अशी ठाम भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे.
प्रदूषणाविरोधातील या लढय़ात सहभागी होण्यासाठी संपर्क- ९८२११ ५०८५८.

DHARANA ANDOLAN against AIR POLLUTION


I request all residents of GHODBUNDER ROAD, Thane West to participate in the DHARANA ANDOLAN against AIR POLLUTION created by few factories in RESIDENTIAL AREAS on GHODBUNDER ROAD, under the leadership of Honorable Shri Sanjay Kelkar - M.L.C. - Maharashtra State.

Date : 18th July, 2009 , Saturday
Time : 10.30 a.m.
Place : Maharashtra Pollution Control Board - Regional Office Thane
Office Complex Building , Plot No. P 30 ,
Junction of LBS MARG & Wagle Esate Road,
Mulund Check Naka , Thane - 400 604.


It is our right to get fresh AIR TO BREATH .

Press Conference of Shri. Sanjay Kelkar - M.L.C.


This photo is of Shri. Sanjay Kelkar of a press conference on 14th July, 2009,in which he declared about Dharana Andolan on against 18th July, 2009 in fornt of Thane Regional office of Maharashtra Pollution Control Board against Air Pollution created by few industries on Ghodbunder Road, Thane.

Monday, June 29, 2009

Visit of Shri. Sanjay Kelkar - MLC to affected area


On 20th June, 2009 Shri. Sanjay Kelkar - M.L.C. Maharashtra State visited Oswal Park , Runwal Regency and discussed with affected residents becasue of Air Pollution caused by Ravi Steel, Majiwada, Thane West, Maharashtra . Residents from Orchid Complex, Bougan Villa, Majiwada Village, Parameshwari Paradise C.H.S., Urvi Park , Pokhran Road no.2 were present. Residents shared there issues related to pollution with Shri. Sanjay Kelkar.

Thursday, June 18, 2009

ROAD CONDITIONS AT KALWA - VITAVA SUBWAY



This photo was clicked by me on 14th June, 2009 @ 7.50 a.m. of a horrible road @ Kalwa - Vitava Subway.

Traffic jam at this junction is a regular feature.

Basic reason for this traffic jam is water which is leaking from a under ground water pipe . This water damages the top surface of the road at this location.

This situation is there 365 days a year. This is the biggest culprit to spoil the road in the subway.

In the photo you can easily see pot holes inspite of no rain . If now this is the condition of the road, then what will happen in the Monsoon ?

On Saturday, March 28, 2009 I had mailed to The Commissioner - TMC as this is to be undertaken by TMC.


In between some temperary patch works was done, but you can see the present condition of the road.

It is quite shocking that all MPs, MLAs, travel from this road, no body is serious to solve this problem once for all. Can't local corporators see this situation ?

Where common man should go for a solution for this problem ?

Heavy Air Pollution by Ravi Steel , Majiwada, Thane



This photo of polluting chimney of a Ravi Steel, Majiwada, Ghodbunder Road, Thane West, Maharashtra, India was clicked by me on 18th June, 2009 @ 7.30 a.m .

Such things only happen in INDIA only. Since 2002 I am fightening against this air pollution in residential area. Knocke the doors of all the concerned authorities including HON. President of INDIA. Since last one year, Shri. Sanjay Kulkari - MLC - Maharshtra State is keenly trying his level best for stopping such serious air pollution, but this is the current position on the month of June in which world celebrated ENVIRONMENT DAY . I am trying to put facts in front of INDIAN citizens.

Wednesday, June 17, 2009

Pollution at Hyde Park



This is a photo of Shri. Sanjay Kelkar - M.L.C. - Maharashtra State during his visit to Hyde Park in Aug. 2008 to see pollution created by Narendra Silk Mills .

Friday, June 12, 2009

Pollution in Residetial Area on World Environment Day


This photo of a polluting chimney of one of the polluting factory in the highly popullated residential area on Ghodbunder Road, Thane West was clicked from my bedroom @ 8.00 a.m On World Environment Day - 5th June, 2009 .

Please note that this industry is polluting day and night in the dense residential area of Ghodbunder Road, Thane West , Maharashtra .

Such kind of realities are only possible in INDIA only.

In spite of fight against pollution for last 7/8 years, day by day amount of pollution increases and not decreases.

For us Breathing Fresh Air will be a dream .

Friday, May 22, 2009

News in Hindustan Times

LOKSATTA
Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९


जगण्यासाठी शुद्ध हवा मिळेल का?घोडबंदरवरील रहिवाशांचा आक्रोशठाणे/प्रतिनिधी घोडबंदर रोडवर दुतर्फा नवनवीन गृहनिर्माण संकुलांची उभारणी होत असताना निवासी भागातील कंपन्यांमधून सोडला जाणारा उग्र दर्प असणारा वायू, तसेच रसायनमिश्रित पाण्यामुळे ‘आम्हाला स्वच्छ व ताजी हवा मिळेल का?’ असा आक्रोश करण्याची वेळ त्या भागातील अनेक रहिवाशांवर आली आहे. घोडबंदर रोडवरील ‘हाईड पार्क’ तसेच लगतच्या काही सोसायटय़ांमधील रहिवासी एका कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे हैराण झाले होते. महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्राचे पर्यावरण खाते यांच्याकडे दाद मागूनही त्यांचा प्रश्न सुटला नव्हता. ‘ठाणे वृत्तान्त’ने या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर संबंधित यंत्रणा कामाला लागली. महापौर स्मिता इंदुलकर , आमदार संजय केळकर यांनीही या गंभीर समस्येत लक्ष घातल्याने हा प्रश्न मार्गी लागला.

(सविस्तर वृत्त)
जगण्यासाठी शुद्ध हवा मिळेल का?घोडबंदरवरील रहिवाशांचा आक्रोशठाणे/प्रतिनिधी घोडबंदर रोडवर दुतर्फा नवनवीन गृहनिर्माण संकुलांची उभारणी होत असताना निवासी भागातील कंपन्यांमधून सोडला जाणारा उग्र दर्प असणारा वायू, तसेच रसायनमिश्रित पाण्यामुळे ‘आम्हाला स्वच्छ व ताजी हवा मिळेल का?’ असा आक्रोश करण्याची वेळ त्या भागातील अनेक रहिवाशांवर आली आहे.घोडबंदर रोडवरील ‘हाईड पार्क’ तसेच लगतच्या काही सोसायटय़ांमधील रहिवासी एका कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे हैराण झाले होते. महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्राचे पर्यावरण खाते यांच्याकडे दाद मागूनही त्यांचा प्रश्न सुटला नव्हता. ‘ठाणे वृत्तान्त’ने या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर संबंधित यंत्रणा कामाला लागली. महापौर स्मिता इंदुलकर , आमदार संजय केळकर यांनीही या गंभीर समस्येत लक्ष घातल्याने हा प्रश्न मार्गी लागला.आता पुन्हा अन्य काही कंपन्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा धूर, रसायनमिश्रित पाण्यामुळे घोडबंदर रोडवरील अनेक रहिवाशांना त्रास सुरू झाला आहे. डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायूमुळे अन्नावरील वासना उडणे अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. सत्यजित शहा (हाईड पार्क), शंकर तलवार (श्रुती पार्क, कोलशेत रोड), सत्यजित आहेर (रुणवाल रिजन्सी, माजिवडा), सुहास पोतनीस (ऑर्किड, माजिवडा), मैथिली चेंदवणकर (ओस्वाल पार्क, पोखरण-२) आदी जागरूक रहिवाशांनी घोडबंदर रोडवरील प्रदूषणाविरोधात लढा सुरू केला आहे. प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांमुळे कसा त्रास होतो आहे, यासाठी आपापल्या सोसायटय़ांमधून स्वाक्षऱ्या गोळा करण्याची मोहीम या रहिवाशांनी सुरू केली आहे. ‘शुद्ध हवा हवी ’ असा या मंडळींचा नारा आहे.घोडबंदर रोडवरील कंपन्या अनेक वर्षांंपासून अस्तित्वात आहेत. गेल्या दहा वर्षांंत हा भाग झपाटय़ाने विकसित होऊ लागल्याने, नामांकित बिल्डरांनी येथे कोटय़वधींच्या जमिनी विकत घेतल्या. त्यावर मोठमोठे टॉवर्स व टोलेजंग सोसायटय़ा उभ्या राहिल्या. कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या धुरामुळे रहिवाशांना भविष्यात त्रास होऊ शकतो, याची कल्पना असूनही महापालिकेने कंपन्यांलगत निवासी संकुले उभारण्याची परवानगी कशी दिली, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. आलिशान गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेतील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी व प्रदूषणाच्या विळख्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ठाणे + कोकण, मटा फोकस

लढा शुद्घ हवेचा21 May 2009, 0215 hrs IST
- मुंबई टाइम्स टीम, ठाणे
घोडबंदर रोड परिसरातील नागरिकांना तिथे असणाऱ्या कारखान्यांमुळे शुद्ध हवा मिळवण्यासाठी झगडावं लागत आहे. घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्घ हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून इथे काँक्रिटचं जंगल उभं राहिलं. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग टॉवर उभे राहिले. या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्घ हवेसाठी झगडावं लागत आहे. निवासी भागातील कंपन्यांमधून सोडला जाणारा वायू आणि रसायनमिश्रित पाणी यामुळे इथल्या लोकांचं जगणं असह्य झालं आहे. त्यामुळेच तिथल्या लोकांना चक्क शुद्घ हवेसाठी लढा उभारावा लागतोय. घोडबंदर रोड परिसरात पूवीर् अनेक कंपन्या होत्या. त्यातल्या बहुसंख्य कंपन्यांना टाळं लागल्यानंतर त्या जागी निवासी संकुलं उभी राहिली असली, तरी आजही या परिसरात अनेक कारखाने सुरू आहेत. त्या कंपन्यांच्या चिमण्यांमधून उत्सजिर्त होणाऱ्या वायुमुळे घोडबंदर रोडवरील अनेक रहिवाशांना त्रास सुरू झाला आहे. डोळे चुरचुरणं, मळमळणं, उग्र दर्पाच्या वायुमुळे अन्नावरील वासना उडणं अशा अनेक तक्रारी या भागातले रहिवासी करू लागले आहेत. हाइड पार्क सोसायटीतल्या रहिवाशांना असाच त्रास भेडसावत होता. महापालिका, पर्यावरण खातं, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सत्यजित शहा या जागरुक नागरीकाने ही समस्या मागीर् लावली आहे. हाइड पार्कची समस्या सुटली असली, तरी कोलशेत रोड इथल्या श्रुती पार्क, माजिवडामधील रुणवाल रिजन्सी आणि ऑकिर्ड, पोखरण रोड नं. २ इथली ओस्वाल पार्क अशा अनेक सोसायट्या या वायू प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स उभी राहण्यापूवीर् या कंपन्या तिथे अस्तित्वात होत्या. त्यामुळे त्यांनी या भागातून स्थलांतर करावं, अशी आमची मागणी नाही. परंतु, कंपन्यांमध्ये प्रदूषणासंबंधित नियमांची पायमल्ली होत असल्याने रहिवाशांना त्याचा भुर्दंड सोसावा लागतोय. या कंपन्यांमधून प्रदूषित हवा आणि रासायनिक पदार्थांचं उत्सर्जन होणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यावी एवढीच आमची अपेक्षा असल्याचं शुद्ध हवेच्या लढ्याचे प्रणेते सत्यजित शहा यांचं म्हणणं आहे. योग्य नियमांचं पालन केलं आणि प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण खात्याने त्यांच्यावर अंकुश ठेवला तर ते सहज शक्य आहे. परंतु, हे विभाग आणि ठाणे महापालिका कमालीची उदासीन असल्याने रहिवाशांचा त्रास संपत नसल्याचा आरोप शहा यांनी केला आहे. तसंच, या कंपन्यांमधून बाहेर पडणारी प्रदूषित हवा रोखणं अशक्य असेल, तर त्या कंपन्यांशेजारी निवासी संकुलांना पालिकेने परवानगी कशी काय दिली असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे. बेकायदेशीररित्या परवानगी दिली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही इथल्या रहिवाशांनी केली आहे. ...... एकजुटीचं आवाहन प्रदूषित हवेपासून मुक्तता मिळवण्यासाठी घोडबंदरवासीयांचा एकत्रित लढा उभारण्यास इथल्या काही जागरुक लोकांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सोसायट्यांमधून स्वाक्षऱ्या गोळा करण्याची मोहीम सध्या राबवली जात आहे. प्रदूषणाने त्रासलेल्या लोकांना आपल्या प्रतिक्रिया आणि समस्या नोंदवण्यासाठी http:/fightofacommonmanblogspot.com हा ब्लॉगही सुरू करण्यात आला आहे. या लढ्यात सहभागी होण्यासाठी ९८२११५०८५८ या क्रमांकावर किंवा satyajitshah64@gmail.com या इमेलवर संपर्क साधण्याचज् आवाहन करण्यात आल आहे.

Friday, January 16, 2009

Polluting Chimney


This is another chimney of one factory which is polluting very badly. Fact is nobody bothers to take this issue seriously and fight for eliminating air pollution from the residential ares.

Friday, January 2, 2009

Fight against air pollution in residential area



I am a resident of INDIA , a common man staying in THANE. Since 2002 I am fightening against AIR POLLUTION CREATED BY FEW INDUSTRIES IN THE RESIDENTIAL AREAS. I have written to various government authorities. It is very difficult for a common man even to fight for any social cause.

Systems in INDIA needs drastic changes , improvement to compete with the developed world.