Wednesday, January 28, 2015

आपणाला भटक्या कुत्र्यांचा त्रास हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही का ?

भटक्या कुत्र्यांचा त्रास हा जवळपास सगळ्या भारतीयांना होत आहे. फक्त नेहमीप्रमाणे भारतीय गप्प बसून सहन करीत आहेत.
उंटावरून शेळ्या राखणाऱ्या काही मोजक्या प्राणी मित्रांमुळे शासन हि गप्प बसले आहे. जो पर्यंत राजकीय नेत्याला , किंवा एखाद्या अभिनेत्यला व अभिनेत्रीला भटका कुत्रा चावत नाही, तो पर्यंत शासन हालचाल करणार नाही.
आपणाला एक धक्कादायक बाब माहित आहे का ? या SO CALLED प्राणी मित्रांपैकी काही जण मांसाहार करी असतील . मांसाहार करण्यासाठी कोंबडी , बकरा , मासे यांना ठार मारव लागत. मला नाही वाटत कि या प्राण्यांच्या नैसर्गिक मृत्युनंतर त्यांना खाल्ल जात. जर मांसाहारासाठी हेच प्राणी मित्र प्राण्यांची हत्या करतात तर यांना फक्त कुत्र्यांवर प्रेम का आहे ? हे अगदी दुत्तापी धोरण नाही का ?
सहा वर्षाच्या मुलाला कुत्र्यांनी ठार मारलं तरीही चालेल , कारण तो त्यांचा मुलगा नव्हता . यालाच म्हणतात उंटावरून शेळ्या राखण .
ठाण्यात तर हा त्रास फारच झाला आहे.
गेले ३ / ४ वर्षे मी मुख्यमंत्र्यांपासून ते , ठाणे महानगर पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांपर्यंत हि बाब नेली आहे.
आजच्या "सकाळ" या मराठी वर्तमान पत्रामध्ये आलेली बातमी पहा . मी सकाळ च्या श्री. राजेश मोरे यांचे अत्यंत आभार मानतो कारण त्यांनी या प्रःनाला वाचकांपर्यंत नेल.
या सोबत मी २ फोटो टाकत आहे ज्यात आपण बघू शकता कि ठाण्यात हे भटके कुत्रे किती आरामात फिरत आहेत.
माझे प्रामाणिक मत आहे कि या SO CALLED प्राणी मित्रांनी या भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्याव व स्वतःच्या घरी नेवून सांभाळाव.
आपणाला भटक्या कुत्र्यांचा त्रास हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही का ?
Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stop Feeding Stray Dogs, Rather Adopt Them .

http://fightofacommonman.blogspot.in/





 

No comments:

Post a Comment