Wednesday, January 14, 2015

रस्ता सुरक्षा सप्ताह , २०१५ - एक विसंगती

रस्ता सुरक्षा सप्ताह , २०१५ हा रविवार , ११ जानेवारी , २०१५ ते शनिवार , १७ जानेवारी  २०१५ या कालावधी मध्ये साजरा केला जात आहे .

हा खरच प्रशंसनिय  उपक्रम आहे .

पण , बुधवार , १४ जानेवारी रोजी एक विसंगती आढळून आली ( अशी विसंगती नेहेमीच आढळून येते ) व त्याचे फोटो हि मी घेतले कारण भारतात पुराव्याशिवाय काहीच होत नाही.

सकाळ पासून ३ ते ४ पोलिसांना ( दुचाकीवर चालवीत  असतांना ) हेल्मेट नाही घातले म्हणून त्यांना हेल्मेट घालण्याची विनंती केली . प्रत्येकाने घाईत होतो, चूक झाली अशी नित्य नियमाची कारणे सांगितली पण प्रत्येकाने हेल्मेट घालतो असे सांगितले याच अर्थ सगळ्यांना हेल्मेट घातले पाहिजे हे माहित होते.

गम्मत म्हणजे पोलिसांच्या दु चाकी लगेच ओळखू येतात कारण ते परवानगी नसतांना देखील एक वर्तुळाकार STICKER ज्यावर पोलिस लिहिले आहे तो लावतात.

असो , जेल रोड, ठाणे  हून कळवा येथे जाणाऱ्या चोव्कात एक वाहतूक पोलिस दुसऱ्या वाहतूक पोलिसाबरोबर ( दुसरा दुचाकीवर , HELMET न घालता होता )  काही बोलत उभा होता. तेथून तो दुचाकीस्वार वाहतूक पोलिस , कळव्याच्या दिशेने गेला , तेथून तो विटावा गावाच्या दिशेने गेला . गम्मत म्हणजे , तो HELMET न  घालता  अगदी बिनधास्त दु चाकी चालवत होता . कळवा चोव्कात तो बाकी गाड्यांबरोबर सिग्नल ला उभा होता तेव्हा बाकी दुचाकीस्वारांनी HELMET घातले होते पण या या वाहतूक पोलिसाने हेल्मेट नव्हते घातले . हा एक अतिशय दयनीय विरोधाभास  होता .

माजी DCP TRAFFIC, THANE  DR  SHRIKANT PAROPKARI यांनी एक पत्रक काढून सगळ्या पोलिसांना हेल्मेट घालण्याबद्दल आदेश दिले होते व POLICE असे अनधिकृत STICKERS न लावण्याबद्दल हि आदेश दिले होते .

एवढे असूनही जर अजूनही POLICE दुचाकीवर  STICKER लावतात , हेल्मेट घालत नाहीत , SEAT BELT लावत नाहीत , अनेक पोलिसांच्या गाड्यांना काळ्या काचा असतात याला काय म्हणाव ?

जर नियम बनविणारे , म्हणजेच पोलिस, नेते, राजकारणी , VIP , VVIP या सगळ्यांनी नियमांना पायदळी तुडविल्यावर जनतेकडून नियम पाळण्याची कशी काय अपेक्षा केली जाते ?

माझ्या माहितीप्रमाणे भारत देशामध्ये नियम हे सगळ्यांना समान असतात व सगळ्यांना सारखेच लागू असतात.

या विषयावर मी गेली अनेक महिने वेगवेगळ्या स्तरांवर माहिती , पुरावे , फोटो पाठवत आहे .

कोणत्याही देशात यथा राजा तथा प्रजा असा कारभार असतो .

मी सगळ्या आदरणीय , माननीय , वंदनीय सदस्यांना हा विषय तातडीने घेवून यावर त्वरित अंमलबजावणी करावी हि विनंती करीत आहे.

नेहमीप्रमाणे या बरोबर काही फोटो पाठवीत आहे .

माझी पक्की खात्री आहे कि  दिवशी पोलिस, नेते, राजकारणी , VIP , VVIP हे सगळे नियम पाळू लागतील , तेव्हा आपोआप जनताही नियम पळू लागेल .

चला "स्वच्छ भारत" या  अभियाना   बरोबर " सगळ्यांनी नियम पाळा "  हा एक उपक्रम   भारतीयांनो   राबवूया .

भारताला एक शिस्तप्रिय देश बनवूया .







No comments:

Post a Comment