Sunday, January 25, 2015

भटक्या कुत्र्यांचा हैदोस

आजच्या दिवशी भात्क्याकुत्र्यांनी तर सगळ्या हद्दी ओलांडल्या.

१. )  आज महेश जाधव या ६ वर्षाच्या मुलाचा , जालना , महाराष्ट्र ,  भारत  येथे , भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला .

२. )  भारताच्या राजधानीत आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मानवंदना देण्याचा जो कार्यक्रम झाला त्यात एका भटक्या कुत्र्याने उपस्थिती लावून गोंधळ माजवून दिला . त्याला हाकलताना सुरक्षा अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

पहिल्या घटनेला काय म्हणाव ? मी नेहमी म्हणत असतो कि भारतात मानव प्राण्या पेक्ष्या भटक्या कुत्र्यांना जास्त मान दिला जातो.

ठाण्याचे उदाहरण घ्या , गेल्या अनेक महिन्यात कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची काय वस्तुस्थिती आहे हे कळायला मार्ग नाही, जसा CANCER  वेगात  वाढतो त्याप्रमाणे ठाण्यात सगळीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपणाला हे माहित नसेल , पण प्रत्यक कुत्री दर वर्षी  १२ पिल्लांना जन्म देते. त्यातील अंदाजे ६ जगतात. विचार करा किती वेगात भटक्या कुत्रांची संख्या वाढत आहे..

माझ्या अनुमानाप्रमाणे सध्या ठाण्यात अंदाजे ६०,०००  ते ७०,००० भटके कुत्रे आहेत. अशा वेगात त्यांची उत्पत्ती जर वाढली तर २०२१ साले त्यांची ठाण्यातील संख्या अंदाजे २७ लाख इतकी होणार आहे. त्यावेळेला ठाण्याची लोकसंख्या अंदाजे ३० लाख असेल.

ठाण्याची हि स्थिती तर मग आपण महाराष्ट्राती इतर गावांची , भारतातील अनेक गाव, शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या काय असेल  ह्याचा विचार करा.

ठाण्यात रोज अंदाजे १० च्या वर लोकांना भटके कुत्रे चावतात. ( हि माहिती पूर्ण नाही . भटके कुत्रे चावणार्ऱ्यांची संख्या जास्त असू शकते ) . जर ठाण्यात रोज १० जनांना भटका कुत्रा चावतो मग विचार करा कि भारतात रोज किती जणांना भटके  कुत्रे चावत असतील.

आता दुसरी घटना - जर एवधी अभेद्य  सुरक्षा व्यवस्था भेदून  भटका कुत्रा जर मानवन्द्नेच्या  ठिकाणी जावू  शकतो तर विचार करा , भविष्यात भटक्या कुत्र्यांची संख्या  हाताबाहेर गेल्यावर हे भटके कुत्रे सहजपणे EXPRESS WAY , HIGHWAY , RAILWAY , AIRPORT RUNWAY अश्या अनेक ठिकाणी प्रवेशु शकतात व अश्या ठिकाणी जर अपघात झाले तर विचार करा किती मानव प्राण्याचे जीव जातील.

परत सांगतो भारतातील मानव प्राण्याचे दुर्दैव असे कि भारतात भटक्या कुत्र्यांना मानव प्राण्यापेक्षा चांगली वागणूक मिळते.

मानव प्राणी मेला  तरी चालेल पण भटक्या कुत्र्यांबद्दल ब्र देखील नाही काढायचा .

कोठे चालला आहे भारत आपला ?

Stop Feeding Stray Dogs, Rather Adopt Them .

Make Thane – A City Free From Stray Dogs.

http://fightofacommonman.blogspot.in/





No comments:

Post a Comment