Showing posts with label Fight againt Air Pollution in Residential Area on Ghodbunder Road Thane. Show all posts
Showing posts with label Fight againt Air Pollution in Residential Area on Ghodbunder Road Thane. Show all posts

Monday, March 12, 2012

fight Against Air Pollution in the residential area.

Following article published on 12th March , 2012 in Hello Thane of Lokmat .

This is just for your ready reference and to update everybody about the current situation.
Air Pollution not yet stopped even after a fight of 10 years.

This happens only in INDIA.



Sunday, October 9, 2011

Air Pollution in the Residential Area

Please go through following photos photographs of Chimney of Shanti Textiles, clicked on DUSSARA i.e. on 6th Oct. 2011 at around 7.00 a.m.


This is just as a PROOF to show the kind of Air Pollution Created by one factory who uses coal as a fuel fro BOILER situated at Kolshet Raod, behind Ghodbunder Road, Thane Maharashtra, INDIA.

In fact lot of black smoke is also seen in the night.

It is not possible to take photographs of Air Pollution in the night.

According to me daily consuming very small quantity of position is also harmful against consumption of good amount of position at a time.

Daily Air Pollution , let it be in the night also, is very harmful to humans.

In INDIA, Govt. Authorities doesn’t care dam about HUMANS, whereas because of fear of animal lovers, DOGS are being treated better than HUMANS.

It is a fact that Air Pollution is one of the reason for LUNGS CANCER.

Inspite of my fight against this air pollution for last 9 years, this is the TREU , REAL fact existing in Thane, INDIA.

Still we are forced to say MERA BHARAT MAHAAN.




With this mail, I am attaching photographs of Chimney of Shanti Textiles, clicked on DUSSARA i.e. on 6th Oct. 2011 at around 7.00 a.m.

Monday, April 11, 2011

Today's condition on the Death Anniv. of Mother.

Please go through following few photographs clicked in the today morning of a polluting Chimney of Shree. Shanti Processors ,Mohan Mill Compound , Kolshet Road, Thane West, Maharashtra, INDIA.

Today is 8th DEATH ANNIV. of my mother, who expired because of LUNG CANCER .




This is the REALITY on DEATH ANNIV. of my mother in spite of my fight against this air pollution created by few factories in the residential area on Ghodbunder Road.




This is the situation after Tightening against AIR POLLUTION since 2002/2003.


Sunday, April 10, 2011

Dr. Ram Manohar Lohiya Vyakhyanmala

Following photographs are from Dr. Ram Manohar Lohiya Vyakhyanmala clicked @ Marathi Granth Sangrahalaya, Thane on 20th Dec. 2009 .

Shri. Sanjay Mango gave me a chance to put forward issue of Air Pollution in the residential area on Ghodbunder Road, Thane .




Thursday, March 31, 2011

News in PUDHARI dt. 13th March, 2011

Following news was published in Pudhari dt. 13th March, 2011.

I would like to clearly admit that all press reporters of Thane are really helpful to me in the fight.

One serious thing which hurt me which is that majority of other residents of Ghodbunder Road Thane are not at all bothered about this serious issue which has direct impact on HUMAN HEALTH.

Wednesday, March 30, 2011

News Published in Maharashtra Times dt. 31st March, 2011

Following news was published in Maharashtra Times .

In this news following photo of one Shree. Shanti Processors ,Mohan Mill Compound , Kolshet Road, Thane West was published.

As on date this factory is still polluting.

Also another 3 factories are there in Thane Municipal Corporation limits, which use COAL as a fuel for their boilers.

Type of Air Pollution because of Coal Fired Boilers is known to everybody.

Let’s see when we residents of Ghodbunder Road will get FRESH AIR TO BREATH .


ठाणे + कोकण


शुद्ध हवेच्या लढ्याला यश
31 Mar 2011, 0433 hrs IST




म. टा. प्रतिनिधी


घोडबंदर रोड येथील रवी स्टील आणि शांती प्रोसेशन या प्रदूषणकारी कंपन्यांच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. रवी स्टील या कंपनीने आपला गाशा या भागातून गुंडाळून भिवंडीला स्थलांतर केले आहे. शांती प्रोसेशन या कंपनीतील प्रदूषण मात्र सुरूच असून ते कमी करण्यासाठी आता रहिवाशांचे प्रयत्न सुरू आहेत.



घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्घ हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून येथे काँक्रिटचे जंगल उभे राहिले. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग इमारती थाटल्या गेल्या. परंतु, या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्ध हवेसाठी झगडावे लागत आहे. निवासी भागातील कंपन्यांमधून सोडला जाणारा वायू आणि रसायनमिश्रीत पाणी यामुळे येथील लोकांचे जगणे असह्य झाले होते. कंपन्यांच्या चिमण्यांमधून उत्सजिर्त होणाऱ्या वायूमुळे डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायूमुळे अन्नावरील वासना उडणे अशा अनंत तक्रारी या भागातील रहिवासी करीत होते. सरकारी यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सत्यजीत शहा या जागरुक नागरिकाच्या नेतृत्वाखाली कोलशेत रोड येथील श्रुती पार्क, माजिवडा येथिल रुणवाल रिजन्सी आणि ऑकिर्ड, पोखरण रोड नं. २ येथील ओस्वाल पार्क अशा अनेक सोसायट्यांनी शुद्ध हवेसाठी लढा उभारला होता.

प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन, कामगार उपायुक्त कार्यालयापासून ते थेट पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्यापर्यंत तक्रारींचा पाढा, आ. संजय केळकर यांच्या सहकार्यांने विधिमंडळात उठविलेला आवाज असे विविध मार्ग अवलंबून स्थानिकांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून या कंपन्यांना नोटिसाही धाडण्यात आल्या होत्या. गेल्या आठवड्यात अचानक रवी स्टील या कंपनीतील प्रदूषण बंद झाल्याने रहिवाशांना सुखद धक्का बसला. सत्यजीत शहा यांनी त्याबाबत चौकशी केल्यानंतर रवी स्टील या कंपनीने भिवंडीत स्थलांतर केल्याची माहिती पुढे आली आहे. 'रवी स्टीलमधून होणाऱ्या प्रदूषणातून आमची मुक्तता झाली असली तरी शांती प्रोसेशन या कंपनीच्या प्रदूषणाचा आजही आम्हाला त्रास होत आहे. ही कंपनी बंद व्हावी अशी आमची इच्छा नसून त्यांनी योग्य ती खबरदारी घेत प्रदूषण नियंत्रणात ठेवावे', असे मत सत्यजीत शहा यांनी व्यक्त केले आहे.

Closure of Polluting Ravi Steel , Majiwada, Thane

Following news was published in LOKMAT dt. 30th March, 2011

Lets hope that now Air Pollution on Ghodbunder Road will be slightly reduced.

Still there are 4 factories in the Municipal Limits of Thane, which use Coal as a Fuel for their Boilers.

Kind of Air Pollution Created by Coal Based Boilers is known to Everybody.


Wednesday, March 23, 2011

News in Prahaar Dt. 23rd March , 2011

Following news was published in PRAHAAR on 23rd March, 2011 about our fight. By mistake my name was published as Satyajit Singh in stead of Satyajit Shah.

It is a shock that news about Air Pollution is never a Breaking News. In short Authorities are not bothered for this serious issue.

I don;t know when we residents of Ghodbunder Road, Thane will get Fresh Air to Breath ?


घोडबंदर रोडची घुसमट
23 March, 2011 05:50:00 AM स्वप्नाली ढवळे
फॉन्ट साईज

एकेकाळी औद्योगिक वसाहतींमुळे ठाण्याचे नाव राज्यातच नव्हे; तर आशिया खंडात अग्रेसर होते. गेल्या काही वर्षात येथील कारखाने बंद पडत गेले. घोडबंदर रोड परिसरातील कारखाने आणि उद्योगांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. सध्या काही कारखाने सुरू आहेत. त्यांच्या चिमण्यांतून बाहेर पडणा-या रासायनिक वायूंनी घोडबंदर रोड परिसरातील कोलशेत, माजिवडा भागातील रहिवाशांच्या आरोग्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.






मुंबई- ठाण्यातील वेगाने विकसित होत असलेल्या घोडबंदर परिसरातील रहिवासी वाढत्या प्रदूषणामुळे त्रस्त झाले आहेत. शहरापासून थोडे दूर निसर्गाच्या सान्निध्यात आणि स्वच्छ परिसरात राहण्याची स्वप्ने पाहात येथे स्थायिक झालेल्यांना धूळ, धूर आणि दूषित वायूंमुळे होणारी घुसमट सहन करावी लागत आहे.


एकेकाळी औद्योगिक वसाहतींमुळे ठाण्याचे नाव राज्यातच नव्हे; तर आशिया खंडात अग्रेसर होते. गेल्या काही वर्षात येथील कारखाने बंद पडत गेले. घोडबंदर रोड परिसरातील कारखाने आणि उद्योगांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. सध्या काही कारखाने सुरू आहेत. त्यांच्या चिमण्यांतून बाहेर पडणा-या रासायनिक वायूंनी घोडबंदर रोड परिसरातील कोलशेत, माजिवडा भागातील रहिवाशांच्या आरोग्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. येथील पाच कंपन्यांच्या बॉयलरमध्ये ज्वलनशील पदार्थ म्हणून कोळशाचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यांच्यातून बाहेर पडणा-या काळ्या धुरामुळे वायुप्रदूषण होते. त्या कारखान्यांच्या चिमण्या कमी उंचीच्या आहेत. त्यामुळे इमारतींच्या भिंतीदेखील काळवंडल्या आहेत. विकासाच्या वाढत्या गतीबरोबर निसर्गाचे सान्निध्य दुरावू लागले आहे. अनेक गृहसंकुलांच्या रूपाने सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे राहिले आहे. येथील जागांचे भाव प्रचंड वाढल्यामुळे काही कारखानदार येथेच ठाण मांडून बसले आहेत.

येथील रहिवासी सत्यजित सिंग आणि त्यांच्या सहका-यांनी येथील प्रदूषणाच्या समस्यांबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्री, राज्याचे पर्यावरणमंत्री, पर्यावरण राज्यमंत्री, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय अधिकारी, त्याचबरोबर ठाणे महापालिका आयुक्त अशा सर्व सरकारी यंत्रणांकडे तक्रारी केल्या आहेत. संबंधित यंत्रणांनी त्याकडे लक्ष देऊन घोडबंदर परिसर प्रदूषणमुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वायुप्रदूषणामुळे तेथील रहिवाशांना वारंवार सर्दी-पडसे, श्वसनाचे विकार होतात. त्याचबरोबर त्वचाविकार, फुप्फुसांचे आजार, डोळे चुरचुरणे असे त्रासही होतात.- स्नेहल ठक्कर, स्थानिक डॉक्टर

कारखान्यांतून बाहेर पडणा-या धुरामुळे वायू प्रदूषण तर होत आहेच. शिवाय येथून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे जलप्रदूषणाची समस्याही भेडसावू लागली आहे.- सत्यजित सिंग, रहिवासी

Thursday, March 10, 2011

News in LOKSATTA dt. 11th March, 2011 about Air Pollution on Ghodbunder Road

Folloiwng news article was published in Thane Vrutant of LOKSATTA dt. 11th March, 2011.

I would like to really thank all the friends from m PRINT and T.V. media for supporting our this fight and taking this fight to the readers , viewers.

In case you also feel the this issue is serious and the cause is genuine , then please join in our this fight against Air Pollution on Ghodbunder Road, Thane.




घोडबंदरवासियांचा आता प्रदूषणाविरुद्ध लढा

ठाणे/प्रतिनिधी, शुक्रवार, ११ मार्च २०११

निसर्गरम्य वातावरणाचा हवाला देऊन घोडबंदर रोडलगत वेगाने विकसीत होत असलेल्या नव्या ठाण्यातील रहिवासी तेथील काही कंपन्यांमधून सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विषारी धुराविरुद्ध आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार पुराव्यानिशी तक्रार करूनही दोषी कारखान्यांविरुद्ध कारवाई करण्यात कुचराई होऊ लागल्याने या रहिवाशांनी आता हे आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिकडेच घोडबंदर परिसरात प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांचे रितसर व्हिडीओ चित्रीकरण करून त्याच्या प्रती पुरावा म्हणून वितरीत करण्यात आल्या आहेत.
ठाण्याच्या या भागात पूर्वी औद्योगिक वसाहती होत्या, हे वास्तव असले तरी आता या भागात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. किंबहुना ठाण्याचा विस्तार प्राधान्याने याच भागात होत आहे. आता नवीन ठाणे म्हणून हा परिसर ओळखला जातो. या बदलत्या परिस्थितीतही कोळशाचा इंधन म्हणून मोठय़ा प्रमाणात वापर होणारे काही कारखाने इथे अजूनही अस्तित्वात आहेत. फुफ्फुसाचा कॅन्सर उद्भविण्यास हवेतील प्रदूषण हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे या कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यास भाग पाडावे, यासाठी घोडबंदर रोड परिसरात राहणारे काही नागरिक आग्रही आहेत. त्यात भारत कदम, दीपाली पाटील, महेश जोशी, मैथिली चेंदवणकर, प्रांजल राऊत, आर.आर.जाधव, सत्यजित अहेर, शंकर तलवार, सुहास पोतनीस, सुनील बारहाते, तांबे, सत्यजित शहा आदींचा त्यात समावेश आहे. सत्यजीत शहा यांनी माहितीच्या अधिकारात कोळशाचा इंधन म्हणून वापर करणाऱ्या कारखान्यांची माहिती मागविली. त्यातून उघड झालेल्या माहितीनुसार ठाण्यात माजिवडा, कोलशेत रोड, बाळकूम आणि आझादनगर येथे कोळशाच्या इंधन म्हणून वापर करणारे पाच कारखाने असल्याचे उघड झाले आहे. घोडबंदर परिसरात पूर्वी तीन कारखाने होते. आता दोन कंपन्या कार्यरत आहेत. आमचा कंपन्यांना विरोध नसून त्या करीत असलेल्या प्रदूषणास आहे. त्यांनी प्रदूषण नियंत्रित ठेवून उत्पादन काढावे, त्याला आमची हरकत असणार नाही, असे शहा यांनी ‘वृत्तान्त'शी बोलताना सांगितले. कोळशाचा इंधन म्हणून वापर करणारे तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ३४ कारखाने आहेत तर तलासरी, डहाणू आणि पालघरमध्ये आठ कारखाने आहेत, अशी माहितीही शहा यांना मिळाली आहे. अनेकदा पहाटे सर्व रहिवासी झोपेत असताना या कारखान्यांमधून मोठय़ा प्रमाणात धूर सोडला जातो. देशातील एक आदर्श शहर म्हणून नावारुपास येणाऱ्या ठाणे शहरात सर्व नियम धाब्यावर बसवून केले जाणारे प्रदूषण येथील रहिवाशांच्या आरोग्यास घातक आहे. तेव्हा येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एक तर हे कारखाने अन्यत्र स्थलांतरीत करावेत, किंवा त्यांना प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास भाग पाडावे, अशी घोडबंदरवासियांची मागणी आहे.

Saturday, January 1, 2011

Happy New Year WIth lot of AIR POLLUTION

Namskar ,

Please go through few photos clicked on 01-01-2011 ( on the first day of New Year 2011 ) OF polluting chimney which is visible from my bed room.







Our new year was started with breathing such polluted air.

It is very pity that not a single authority is interested in solving this serious issue which has direct impact on HUMAN HEALTH.

Wishing You All Very Happy Near Year with Lot OF Air Pollution.

Please help me in fightening for this issue.

Satyajit A Shah - Thane
Cell : 9821150858
e-mail : satyajitshah64@gmail.com

Friday, July 16, 2010

News in LOKMAT 16th July, 2010

News appeared in LOKSATTA dt.15th July, 2010

घोडबंदरवासीयांना केव्हा मिळणार मोकळा श्वास?
राजीव कुळकर्णी, गुरुवार, १५ जुलै २०१०
rajeev.kulkarnee@expressindia.com
ठाणे स्थानकापासून पाच कि.मी. अंतरावर निसर्गरम्य वातावरण, घराजवळच शाळा, रुग्णालये, शॉपिंगसाठी मॉल, विविध बँकांच्या शाखा अशा आकर्षक जाहिरातबाजीला भुलून हजारो कुटुंबांनी घोडबंदर रोड, माजिवडा, कोलशेत रोड, ब्रह्मांड, बाळकुम परिसरात फ्लॅट घेतले. पण निवासी परिसरात भीषण वायू प्रदूषण पसरविणाऱ्या काही कंपन्या आहेत, हे समजल्यानंतर गेली सात वर्षे या भागातील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले व त्यानंतर या वायू प्रदूषणाविरोधात लढाई सुरू केली. पण प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अन्य सरकारी यंत्रणांकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने हा संघर्ष किती काळ चालेल, हे सांगणे मात्र अवघड आहे.
घोडबंदर रोड व त्या पट्टय़ातील काही भागांत प्रदूषणाच्या विळख्याने सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही कंपन्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा काळाकुट्ट धूर, सूक्ष्मकण आणि श्वास घेणे अवघड करणारा उग्र दर्प यामुळे अनेक सोसायटय़ांमधील रहिवासी अस्वस्थ झाले आहेत. यातून काहींना श्वसनाचे तर काहींना त्वचाविकार जडले आहेत. रोजचे जगणे अवघड करणाऱ्या या कंपन्यांविरोधात सुरुवातीस तत्कालीन पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. पण त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलेच नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांच्याकडे त्रस्त रहिवासी गेले. एक-दोन वेळा त्यांनी प्रदूषणाची पातळी मोजणारी यंत्रे घेऊन पाहणी केली. मग वाढत्या दबावामुळे नरेंद्र सिल्क मिल या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. पण तरीही उग्र दर्पाचा वायू व काळ्याकुट्ट धुरापासून रहिवाशांची सुटका होत नव्हती.
हाइड पार्क सोसायटीतील जागरूक रहिवासी सत्यजित शहा यांनी मग हा लढा तीव्र केला. श्रुती पार्क, ओस्वाल पार्क, रुणवाल रिजन्सी, ऊर्वी पार्क, परमेश्वरी पॅरेडाइज, ऑर्किड्स आदी सोसायटय़ांमधील मैथिली चेंदवणकर, दीपाली पाटील, सत्यजित आहेर, सुहास पोतनीस, शंकर तलवार, सुनील बारहाते यांसारखे सहकारी त्यांना मिळाल्याने संघर्षांला धार आली. भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली गतवर्षी प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी आंदोलन झाले. या आंदोलनात महिला व मुलेही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ‘शुद्ध स्वच्छ हवा, मिळणार आम्हाला केव्हा’, ‘घोडबंदर रोड भोपाळ होण्यापासून वाचवा’, ‘प्रदूषणाचा लागला फास, केव्हा मिळणार मोकळा श्वास’ असे फलक या आंदोलनात झळकले होते.
अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नरेंद्र सिल्क मिलवर कारवाई केली. ही कंपनी बंद झाली तरी अन्य दोन ते तीन कंपन्या अव्याहतपणे प्रदूषण फैलावण्याचे काम करीत आहेत. कंपन्या बंद करून कामगार देशोधडीला लागू नयेत, अशीच आमची इच्छा आहे. या कारखान्यांची प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती सामुग्री बसवावी व जनसामान्यांना स्वच्छ हवा मिळू द्यावी, यासाठीच आम्ही लढत असल्याचे सत्यजित शहा यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.

Tuesday, July 13, 2010

See Pollution with your own eyes

Please go through the following small Video clicked from my bedroom on 12th July, 2010 @ 7.00 a.m. of a polluting chimney of M/s. Shree Shanti Processors , Kolshet Road, Thane WEST .

Monday, July 5, 2010

Proof of Continuing Air Pollution in the residential area created by few industries.

Please go through few photos of Air Pollution created by M/s. Shree Shanti Processors , Kolshet Road, Thane WEST , clicked by me from my bedroom on 4th and 5th July, 2010.

By looking at these photos, cann't you see the kind / type / quantum of Air Pollution created by this factory.

Please note that by drinking 2/3 dops of POISON a person will die after few years , where as by drinking a glass of POISON at a time, that person will die on the stop.

Same way , by daily breathing such polluted air, we will die in few years, where as in BHOPAL, thousands persons, died on the spot.








Since 2002/2003 , I am at regular intervals, giving proofs of air pollution by these ind.ustries to various Govt. Authorites, but still no action is being taken on these industries and till date they are polluting without any fear from any govt. regulations.

We want to BREATH FRESH AIR

Saturday, April 3, 2010

Tuesday, March 30, 2010

News in Maharashtra Times dt. 31st March 2010

Following news was published in Maharashtra Times dt. 31st March 2010.


प्रदूषण इथले संपत नाही
31 Mar 2010, 0218 hrs IST


- म. टा. प्रतिनिधी


प्रशासनाने घोडबंदरवरील कंपन्यांना प्रदूषणावर नियंत्रण यावे यासाठी कोळशाऐवजी नॅचरल गॅसचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नॅचरल गॅस पुरवणे अशक्य झाल्याने या भागातील प्रदुषणाची परिस्थिती 'जैसे थे' आहे.

घोडबंदर येथील रवी स्टील आणि शांती टेक्सटाईल या कंपन्यांमधले प्रदूषण सातत्याने सुरुच असून त्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने येथील रहिवाशी संतापले आहेत. घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्ध हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून येथे काँक्रिटचे जंगल उभे राहिले. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग इमारती थाटल्या गेल्या. परंतु, या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्ध हवेसाठी झगडावे लागत आहे. निवासी भागातील रासायनिक आणि टेक्सटाईल कंपन्यांमधून सोडल्या जाणारा वायू आणि रसायनमिश्रीत पाण्यामुळे या भागातली प्रदुषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायुमुळे अन्नावरील वासना उडणे अशा अनंत तक्रारी या भागातले रहिवासी करू लागले आहेत. त्यामुळेच येथील रहिवाशी तीन वर्षांपासून शुद्घ हवेसाठी लढा देत आहेत.

रवी टेक्सटाईल या कंपनीतल्या प्रदुषणाविरोधात स्थानिक रहिवाशांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यानंतर या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कोर्टात गुन्हे दाखल करण्यात आले. काही दिवस त्याचा परिणाम झाला असला तरी आता पुन्हा येथील प्रदूषण सुरू झाल्याची माहिती शुद्ध हवेसाठी लढा उभारणाऱ्या सत्यजीत शहा यांनी दिली. याबाबत संजय केळकर यांनी मंत्री सुरेश शेट्टी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव पाठक यांची भेट घेऊन ठोस कारवाईची मागणी केली.

जोपर्यंत कोळशाचा वापर सुरू आहे तोपर्यंत प्रदूषण थांबणार नाही हा मुद्दा केळकर यांनी निदर्शनास आणतानाच या कंपन्यांना नैसगिर्क गॅसच्या वापराचे बंधन घालावे अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. हा गॅस उपलब्ध झाल्यानंतर प्रदूषण आटोक्यात येईल असे रहिवाशांना वाटत होते. परंतु, हा गॅसचा पुरवठाच अशक्य असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे येथील लोकांची प्रदुषणाच्या विळख्यातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सरकारी यंत्रणांनी कठोर कारवाई केली तर हे प्रदुषण बंद होईल. परंतु, हे विभाग थातुरमातूर कारवाई करण्यात धन्यता मानत असल्याने ही समस्या चिघळल्याचा आरोपही सत्यजित शहा यांनी केला आहे.


Friday, January 8, 2010

News in PUDHARI dt.7th Jan 2010

Folloewing news article appeared in marathi news paper, PUDHARI dt. 7th Jan. 2010.
We want fresh Air to Breath and it is our birth right.

Tuesday, January 5, 2010

News Appeared in LOKSATTA dt. 6th Jan.2010

Loksatta

6th Jan 2010

प्रदूषण रोखणे व पाणी बचतीसाठी आमदार केळकर यांचा पुढाकार
ठाणे/ प्रतिनिधी
पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊ न प्रचार करताना शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पदवीधर मतदारसंघातील भाजपा आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. घोडबंदर तसेच वागळे इस्टेट परिसरात कारखान्यांच्या प्रदूषणाचा नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल ठाण्यातील नागरिकांनी आंदोलन केले होते. जोपर्यंत कोळशाचा वापर होत राहील, तोपर्यंत प्रदूषण होणार, तसेच ग्लोबल वॉर्मिगला देखील कोळशाच्या ज्वलनाने भर पडते. त्यासाठी नैसर्गिक गॅस कारखान्यांना देखील उपलब्ध करून देण्याची मागणी केळकर यांनी केली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत माहिती देण्यासाठी केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद बोलावली होती. याप्रसंगी माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे भाजपा अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर अ‍ॅड. सुभाष काळे उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर १८ हजारांचे कर्ज आहे. राज्यासाठी सर्वंकष असे गृह, क्रीडा, सांस्कृतिकविषयक धोरण राबवण्याची गरज केळकर यांनी व्यक्त केली. सध्या विविध कामांसाठी जेएनआरयूएमअंतर्गत पैसे पालिकेला मिळतात, मात्र त्या खर्चापैकी अर्धा खर्च पालिकेला करावा लागतो. एवढा खर्च करण्याची तयारी पालिकांची नाही, त्यामुळे हे पैसे अनुदान म्हणून देण्याची मागणी केळकर यांनी शासनाला केली. कोकणात फयानग्रस्त झालेल्या शाळा व महाविद्यालयांना नुकसानभरपाई नव्हती, त्या संदर्भात आवाज उठवल्यावर महसूलमंत्री नारायण राणे यांनी शाळा व महाविद्यालयांच्या इमारतींना नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. विक्रमगड येथील ग्रामीण रुग्णालय सुरू न झाल्याबद्दल अधिवेशनात विचारणा केल्यावर २६ जानेवारीपूर्वी त्याचे उद्घाटन करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले. खेळाडूंना प्रतिदिन फक्त ४० रुपये भत्ता मिळतो, तो वाढवला तर खेळाडू जगतील, याकडे केळकर यांनी शासनाचे लक्ष वेधले. तसेच नागरी संरक्षण दलात काम करणाऱ्यांना होमगार्डच्या प्रमाणात भत्ता व हत्यारे मिळावी अशी मागणी त्यांनी विधिमंडळात केली.