Thursday, July 27, 2017

भटका कुत्रा चावल्याने वाडा येथील शिवाजीनगर मधील , प्रणित मुकेश पाटील या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

भटका कुत्रा चावल्याने वाडा येथील शिवाजीनगर मधील , प्रणित मुकेश पाटील या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू " .

कोठे गेले प्राणी मित्र ? कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ? 

२८ जुलै, २०१७ च्या " ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्रातील हृदयद्रावक बातमी वाचा. 

अनेक भारतीय व्यक्ती जे फक्त उंटावर बसून फक्त आणि फक्त शेळ्या हाकतात , म्हणजेच फेसबुक वरून स्वतः काहीही  " क्रिया " न करता , भटक्या कुत्र्यांमुळे मानव प्राण्यांना  होणाऱ्या त्रासाबद्दल  काहीही  माहिती न घेता " Bhaktya kutryani tumche Kay bighdwal " ..हा असा एक शेरा फेसबुकवरील माझ्या माहितीवर ( POST वर ) लिहिला होता / मारला होता .

गम्मत म्हणजे हा असा शेरा मारणारी व्यक्ती " पुणे " नावाच्या एका शहरात राहते . 

असा हा  शेरा / प्रतिक्रिया देणाऱ्या   निरागस , अज्ञानी  पण वयाने प्रौढ असलेल्या व्यक्तींची मला किंव येते .
खालील आकडेवारी कृपया वाचा :
- "महाराष्ट्र " या राज्यात दररोज अंदाजे ७,७७७ मानव प्राण्यांना श्वान दंश होतो
- "भारत" या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- श्वानदंशाच्या घटनांमधील अंदाजे ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात. 
- कुत्रीला वर्षातून दोनदा पिल्ले होऊ शकतात . 
- कुत्री एका वेळी अंदाजे १२ पिल्ले देते . म्हणजे दरवर्षी अंदाजे २४ पिल्ले जन्माला घालते . त्यातील फॆ निम्मी पिल्लेच जगतात . म्हणजे एक कुत्री दरवर्षी अंदाजे १२ पिल्ले जन्माला घालते . व या प्रकारे भटक्या कुत्र्यांची संख्या हि भरमसाठ वेगाने वाढत जात आहे. 
माझी प्रत्येक " भारतीयाला " नम्र विनंती आहे कि स्वतःला , स्वतःच्या कुटुंबियांना , स्वतःच्या आप्तेष्टांना श्वानदंश होण्याची वाट पाहू नकात .  



No comments:

Post a Comment