Monday, June 24, 2019

" सॅटीस " चा रेनकोट


" सॅटीस " चा रेनकोट


" सॅटीस " ठाणे शहरातील जगप्रसिद्ध असे वास्तुशिल्प ( हे एक उपहासात्मक वाक्य आहे ) . पावसाळा जवळ आला  म्हणून बहुतेक त्या वास्तुशिल्पाला गळू नये म्हणून प्लॅस्टिकच्या भल्या मोठ्ठ्या आवरणाच्या मलमपट्टीची गरज पडली असेल असे भासते . ( हे पाहून रेनकोट घालून शाळेत जाणारे बाल विद्यार्थी मला आठवले . )

अहो एवढे मोठ्ठे वस्तूशिल्प म्हणजे पावसात गळणारच ना ? लगेचच त्याच्या बांधकामाच्या प्रतीवर संशय का हो घेता ?
ठीक आहे मुंबईतील अनेक वस्तूशिल्प वर्षानुवर्षे झाली तरीही त्यांना मलमपट्टीची गरज नाही भासत . फक्त ठाण्याचा पाऊस ( जवळच येऊर चे अरण्य असल्यामुळे ) हा तसा गळकाच असतो , नाही का ?

( ता. . हे सर्व उपहासात्मक लिहिलं आहे . सुज्ञास अधिक काही सांगण्याची गरज नाही . )

" महाराष्ट्र टाईम्स " - सिटीझन रिपोर्टर चे हा प्रश्न वाचकांसमोर नेल्याबद्दल धन्यवाद .

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet





No comments:

Post a Comment