Sunday, September 30, 2018

महान जोडपं / दाम्पत्य - साधी राहणी , उच्च विसर सरणी

महान जोडपं / दाम्पत्य - साधी राहणी , उच्च विसर सरणी
महान जोडपं / दाम्पत्य , डॉक्टर श्री प्रकाश बाबा आमटे व डॉक्टर सौ.मंदाताई प्रकाश आमटे हे नुकतेच महानायक श्री. अमिताभ बच्चन सादर करीत असलेल्या कौन बनेगा करोडपती ( KBC ) मधील कर्मवीर च्या पहिल्या भागात होते.
सुदैवाने आज , रविवार , ३० सप्टेंबर, २०१८ रोजी , सकाळी त्या महान जोडप्याचं सानिध्य लाभलं . प्रकाशभाऊ गप्पा मारताना म्हणाले  कि आज त्यांनी जे कपडे घातले आहेत तेच त्यांनी KBC मध्ये घातले होते. त्यांची एकदम साधी चप्पल पाहून मी त्यांना विचारलं कि हीच चप्पल त्यांनी घातली होती का ? त्याचे उत्तर हो असे आले . त्यावर मी त्यांचे छायाचित्र टिपण्याची परवानगी घेतली व ते येथे देत आहे . आपणाला या छायाचित्रात त्याची साधी चप्पल जी टायर पासून आनंदवनात तयार केली जाणारी चप्पल दिसेल .
एवढे महान काम करणारे महान जोडपं / दाम्पत्य किती साधं राहतात हे जगाला कळावं म्हणून हि दोन छायाचित्र येथे देत आहे .
त्या KBC कर्यक्रमानंतर काहींनी अशी अफवा पसरवली होती कि त्यांना प्रश्न व उत्तरे अगोदरच सांगितली होती म्हणजे त्यांना KBC जिंकता येईल , पण सत्य असे आहे कि असे काहीच झाले नव्हते . अफवा पसरविणाऱ्यांनो , स्वतः काहीच समाजकार्य न करता , फक्त अफवा पसरवू नकात .
अफवा पसरवणे हे काही समाज कार्य नव्हे , ते तर समाज विघातक कार्य आहे.


Friday, September 28, 2018

श्वान दंश रुग्ण वाढतेच - एक भयानक वास्तविकता

श्वान दंश रुग्ण वाढतेच - एक भयानक वास्तविकता

महाराष्ट्र टाईम्स - ता. २९ सप्टेंबर, २०१८


एक यशस्वी लढाई - श्री. संजय केळकर - एक समाजकारणी , सुशिक्षित , सुसंसुकृत आमदार

एक यशस्वी लढाई
" ठाणे " शहरातील एक समाजकारणी , समाजोपयोगी कामे करणारे , सुशिक्षित , सुसंसुकृत आमदार .
ठाणे घोडबंदर रोड येथील हवेचे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध १० वर्षे चाललेली माझी लढाई फक्त आणि फक्त श्री. संजय केळकर या एका समाजकारणी व्यक्तीमुळे यशस्वी झाली . गम्मत म्हणजे एवढी मोठी लढाई यशस्वी झाल्यावर देखील त्यांनी ठाणे शहरात ना एकही अनधिकृत , अधिकृत फलक लावून श्रेय घेतले .
ठाणे शहराला अश्याच लोकप्रतिनिधींची नितांत गरज आहे.







Thursday, September 27, 2018

" जागतिक रेबीज दिवस " - २८ सप्टेंबर


" जागतिक रेबीज दिवस " 
जगभर २८ सप्टेंबर हा  जागतिक रेबीज दिवस  म्हणून पाळला जातो .  

हा दिवस रेबीज नावाच्या एका  महाभयंकर आजार होऊ नये म्हणून सावधानता घेण्यासाठी हा महाभयंकर आजार दूर करण्यासाठी प्रयत्नांमध्ये जी प्रगती  होत आहेत त्याबद्दल माहिती होण्यासाठी पाळला जातोआपल्या देशात मात्र श्वान दंशाच्या घटनांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये अनिर्बंध अशी वाढ होताना आढळून येते

" भारत " नावाच्या देशात सन २०१६ मध्ये ,३७० मानव प्राण्यांना रेबीज नावाच्या अत्यंत भयानक रोगाने जीव गमवावा लागला .त्याच वर्षात जगभरात १३,३४० मानव प्राण्यांना रेबीज नावाच्या अत्यंत भयानक रोगाने जीव गमवावा लागला होता . म्हणजेच सन २०१६ मध्ये  जगातील रेबीज मुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी / मृत्यू  हे फक्त भारत या देशात झाले होतेहि माहिती  Global Burden of Disease Study  या संस्थेने  प्रसिद्ध केली होती

" भारत " नावाच्या देशात एप्रिल, २०१७ ते मार्च २०१८ या काळात ,१९१ मानव प्राण्यांचा मृत्यू प्राणी दंश साप , विंचू यांच्या दंशामुळे झाला आहे. हि संख्या गेल्या वर्षातील सर्वाधिक आहे. हे उत्तर    The Ministry of Health and Family Welfare  यांनी  माहितीच्या अधिकारात विचारलेल्या उत्तरात दिले आहे. यातील बहुतांश मृत्यू हे श्वान दंशाने झाले आहेत . त्यानंतर सर्पदंश माकड दंशाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या आहे

आपल्या माहितीसाठी खाली थोडी आकडेवारी देत आहे 

श्वान दंशाची थोडीशी आकडेवारी :

ठाणे महानगर पालिका हद्दीत दर रोज अंदाजे ६० ते ७०  निरपराध मानव प्राण्यांना  भटका कुत्रा चावतो.
नागपूर या शहरात रोज अंदाजे ७० ते ८०   निरपराध मानव प्राण्यांना  भटका कुत्रा चावतो.
महाराष्ट्र राज्यात  दर रोज अंदाजे ,०० ते ९,०००   निरपराध मानव प्राण्यांना   भटका कुत्रा चावतो.
- " 
भारत " या महासत्ता बनू पाहणाऱ्या देशात दर रोज अंदाजे ,५०,०० ( एक लाख , पन्नास  हजार  ) निरपराध मानव प्राण्यांना  भटका कुत्रा चावतो.
श्वान दंशाच्या एकूण घटनांपैकी अंदाजे ८०घटनांमध्ये  ते या वयोगटातील बालके सापडतात

भटक्या कुत्र्यांच्या संख्येची थोडीशी आकडेवारी :

कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत अंदाजे ,००० ते ४०,००० भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे .
ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत अंदाजे ( कमीत कमी ) ८०,००० ते ,०००  भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे .
नागपूर शहर  नागपूर ग्रामीण या मध्ये मिळून अंदाजे ९५,००० ते ,००,००० भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे .
जर हेच प्रमाण धरले तर " भारत " या देशात अंदाजे २५ ते २७ कोटी भटके कुत्रे असण्याची दाट  शक्यता आहे

उल्हासनगर येथील प्रेमनगर परिसरात नुकताच एका कुत्र्याने घराबाहेर खेळणाऱ्या एका चिमुकलीवर जीवघेणा हल्ला करत तिच्या नाकाला चावा घेतला . त्याच कुत्र्याने गेल्या तीन ते चार दिवसांत पाच नागरिकांना चावा घेतला होता.  या व अश्याच प्रकारच्या घटना मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यातील  प्रत्येक शहरात , प्रत्येक गावात  , प्रत्येक खेड्यात , प्रत्येक पाड्यात , प्रत्येक गल्लीत , प्रत्येक बोळात पदोपदी घडत असतात . अनेक निरपराध नागरिक जखमी होत असतात . 

महाराष्ट्र   राज्यात त्याच प्रमाणे भारत या देशात दिवसें दिवस भटक्या कुत्र्यांची संख्या अनेक पटीने वाढत आहे . 

या अतिवेगाने वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्ये विरुद्ध त्याचप्रमाणे श्वान दंशाच्या वाढणाऱ्या घटनांविरुद्ध मी गेली अंदाजे १० वर्षे गल्ली ते दिल्ली लढतोय , पण परिस्थितीत सुधारणा होण्या ऐवजी परिस्थिती चिघळतच  चालली आहे.