Tuesday, March 27, 2018

धक्कादायक! वर्षभरात १ लाख मुंबईकरांना कुत्र्यांचा चावा

धक्कादायक! वर्षभरात १ लाख मुंबईकरांना कुत्र्यांचा चावा

मुंबईतील पालिका दवाखान्यात गेल्या दोन वर्षांत श्वानदंशाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीये. पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१५-२०१७ या वर्षात पालिका दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या ६४,९३४ मुंबईकरांना कुत्रा चावल्याची घटना समोर आली होती. यात शहरातील ११,४६२ जणांना कुत्र्याने चावा घेतला होता. तर पश्चिम उपनगरात ३१,२९३ लोकांना आणि पूर्व उपनगरातील २२,१७९ जणांना कुत्रा चावल्यानं त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

मुंबई पालिका रुग्णालयांच्या आकडेवारीनुसार,
  • मार्च २०१५ ते फेब्रुवारी २०१६ वर्षांमध्ये ८० हजार ९३४ जणांना कुत्र्याचा चावा
  • मार्च २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ८२ हजार ५४६ जणांना कुत्रा चावला
  • तर मार्च २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या वर्षांमध्ये या प्रकऱणांमध्ये वाढ होऊन ही संख्या १ लाख ९ हजार ५६३ वर पोहोचलीये
ही आकडेवारी फार धक्कादायक असून यावर नागरिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. नागरिक संघटनेच्या म्हणण्यानुसार, “देशात दररोज जवळपास १,४१,९६० व्यक्तींना श्वान दंश होतो. यातील वर्षाला साधारणतः वीस हजार जणांचा मृत्यू होतो. तर महाराष्ट्रात दररोज अंदाजे ७,७७७ जणांना कुत्रा चावण्याच्या घटना घडतात. विशेषतः श्वान दंश झालेल्यांपैकी ८० टक्के रुग्ण हे ३ ते ८ या वयोगटातील असतात. “
इतकंच नाही तर मुंबई सह महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाटय़ाने वाढतेय. यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा यांनी सांगितलं की, “कुत्रा चावल्यामुळे मृत्यू होणाऱ्या संख्येत वाढ होताना दिसून येतेय. कुत्रा चावल्यानंतर वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावतो. मुंबईत साधारणतः दरवर्षी अंदाजे ८० हजार नागरिकांना कुत्रा चावतो होतो. तर ठाण्यात श्वानांची संख्या ४५ हजाराहून अधिक असून दरवर्षी ११ हजार कुत्र्याने चावा घेतल्याची प्रकरण समोर येतात.”
मुंबईत उघडय़ावरील कचऱ्यामुळे रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना होणाऱ्या श्वानदंशात वाढ होतेय. काही दिवसांपूर्वी सहा वर्षांच्या मुलाचा कुत्रा चावल्यानं मृत्यू झालाय. ही एकच घटना नसून वारंवार अशा घटना घडत असतात असंही शहा यांनी सांगितलंय.
शहा पुढे म्हणाले “रेबीजमुळे मृत्यू होणाऱ्या घटनांमध्ये आशिया खंडात भारताचा पहिला क्रमांक लागतो. यासाठी भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पालिका प्रयत्न करतेय मात्र तरीही ही प्रकरण वाढतायत. उच्च न्यायालयाने प्राण्यांसाठी शेल्टर होम बांधण्याचे आदेश दिले होते. परंतु अजूनही याबाबत कुठल्याही प्रकारची पावलं उचलण्यात आलेली नाहीत.”

दरम्यान राज्य़ाचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणं आवश्यक असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन धोरण निश्चित केलं जाईल असं सांगितलं होतं.
या बातमीची साखळी ( LINK ) :  http://www.mymedicalmantra.com/marathi/dog-bites-total-one-lack-people-in-mumbai/

No comments:

Post a Comment