Sunday, March 25, 2018

भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले, सहावर्षीय साहिलचा उपचारादरम्यान मृत्यू - हिंजवडी जवळील घटना


भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले, सहावर्षीय साहिलचा उपचारादरम्यान मृत्यू
हिंजवडी जवळील घटना
पिंपरी-चिंचवड | Updated: March 25, 2018 11:57 AM
कोठे गेले प्राणी मित्र ?
कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ?
तुम्ही , तुमच्यावर , तुमच्या आप्तेष्टांवर असा दुर्धर प्रसंग येईपर्यंत गप्प बसणार ?




सुमारे चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने एका सहा वर्षीय मुलाचा मुत्यू झाला. ही घटना हिंजवडी लगत असलेल्या माण गावात आज (दि.२५) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. साहिल अन्सारी असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे.
साहिल हा आज सकाळी सहाच्या सुमारास घरासमोर खेळत असताना अचानक चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या कुत्र्यांनी साहिलच्या अंगाचे लचके तोडले. यात साहिल गंभीर जखमी झाला. सुरूवातीला त्याला माण गावात उपचार करण्यात आले. पण नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चिमुकल्या साहिलचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच एका बालकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये रोष असल्याचे दिसून येत आहे.


No comments:

Post a Comment