Tuesday, October 31, 2017

वाड्यात कुत्र्यांचा १७ जणांवर हल्ला

" वाड्यात कुत्र्यांचा १७ जणांवर हल्ला " 

" वाड्यात " म्हणजे कोणाच्या राहत्या वाड्यात नव्हे तर , ठाणे जिल्ह्यातील वाडा या गावात कुत्र्यांचा १७ जणांवर हल्ला . 

" ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रकाशित होणारी एका नावाजलेल्या दैनिकाच्या १ नोव्हेंबर, २०१७ च्या अंकात हि बातमी छापून आली आहे. 

भारत देशा चे दुर्दैव असे आहे कि या अश्या मानव प्राण्यांवर भटक्या कुत्र्यांच्या  होणाऱ्या हल्ल्याच्या घटना नाही शासन कर्त्यांना ला दिसत , नाही राज्य कर्त्यांना दिसत , नाही प्राणी मित्रांना दिसत , नाही प्राणी मैत्रिणींना दिसत , नाही पोलिसांना दिसत . 

हे तुम्हाला माहित आहे का , कि जर तुमच्यावर भटका कुत्रा , भटके कुत्रे हल्ला करायला आले आणि तुम्ही स्व-सौरक्षणासाठी जर त्या भटक्या कुत्र्याला , भटक्या कुत्र्यांना दगड अथवा काठी फेकून मारली आणि एखाद्या प्राणी मित्राने , प्राणी मैत्रिणीने जर पोलिसात तक्रार नोंदवली तर तुम्हाला अटक देखील होऊ शकते . अश्या घटना घडलेल्या आहेत. 

अश्या वेळी मानव प्राण्याने " आ कुत्ते , मुझे काट " ( एक नवीन , आधुनिक म्हण ) असे फक्त म्हणायचे असते . 

नवीन , आधुनिक म्हण " माणूस मरो , पण भटका कुत्रा जगो " . 

बोला " मेरा भारत महान " . 


Thursday, October 26, 2017

अग्रलेखांचे बादशहा श्री. नीलकंठ खाडिलकर यांच्याकडून " फुकट " या माझ्या कवितेचे कौतुक .

अग्रलेखांचे बादशहा श्री. नीलकंठ खाडिलकर यांच्याकडून " फुकट " या माझ्या कवितेचे कौतुक .
गुरुवार , २६ ऑक्टोबर , २०१७ च्या " नवाकाळ " या एक सुप्रसिद्ध दैनिका मध्ये मी लिहिलेली "फुकट " या शीर्षकाची कविता छापून आली .
आज , गुरुवार , २६. १०. १७ रोजी दुपारी १२.५६ वाजता , श्री. निलकंठ खाडिलकर जी , म्हणजेच अग्रलेखांचे बादशहा यांनी माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून , आज नवाकाळ मध्ये छापून आलेली माझी " फुकट " आवडल्याबद्दल कळविले . ते म्हणाले कि योग्य पद्धतीने मांडणी केली आहे.
त्यांच्या या कौतुका च्या थापेने ने मला " आभाळ ठेंगणे झाले " म्हणजे काय याचा अर्थ आज कळला .
मी अजूनही तसा हवेतच आहे.


Wednesday, October 25, 2017

Stray dog forces flight to abort take-off



Stray dog forces flight to abort take-off

 | Oct 24, 2017, 03:46 IST
Representative image
Panaji: A stray dog sprinted across the runway of the Goa International Airport at Dabolim, just as IndiGo flight 6E 458 was taking off for Mumbai forcing the pilot to abort the takeoff, sending the plane skidding as the pilot struggled to regain control.

The pilot managed to bring the aircraft to a halt but as a precaution the aircraft had to be turned back to the parking bay for some tyres to be replaced, Goa 
airport officials said.

The 100-odd passengers aboard the aircraft had a lucky escape as no further mishap occured, though the 
flight was delayed for nearly two and a half hours.

"There was a dog on the runway because of which an IndiGo flight had to abort the takeoff," an Airports Authority of India official said. "The pilot alerted the ground staff and engineer and all passengers were informed of the situation and then deplaned."

The IndiGo aircraft operating flight 6E-468 started its takeoff roll around 5.30pm, when the dog strayed on to the runway.

"The pilot braked violently, we went right and left but finally stopped. We were brought back to the tarmac and they told us that the rear tyres had given up," a senior executive with a corporate firm said.


Officials said that the aircraft suffered no structural damage and that the aircraft engineers had inspected the aircraft and cleared it for takeoff.

LATEST COMMENT

Dogs, cows and everybody else seems to be having a good time in Goa and in the process innocent passengers get into trouble be it at the airport or on the roads. Welcome to Goavinod kumar

"Dogs keep coming onto the apron. Security has been increased to prevent such incidents from happening," the AAI official said.


The aircraft finally departed at 8.08 pm and landed in Mumbai at 9:38 pm.



Sunday, October 22, 2017

दोन महिन्यांच्या मुलाचे कुत्र्याने तोडले लचके

दोन महिन्यांच्या मुलाचे कुत्र्याने तोडले लचके

" दोन महिन्यांच्या मुलाचे कुत्र्याने तोडले लचके "
सोमवार , २३ ऑक्टोबर , २०१७ च्या " नवाकाळ " या एका सुप्रसिद्ध दैनिकाच्या मुखपृष्ठावरील बातमी येथे देत आहे .
" त्याचं काय आहे माहित आहे का ? खरं तर त्या दोन महिन्याच्या मुला ची चूक असणार . कारण त्या मुला ने त्या भटक्या कुत्र्याला दगड मारला असेल अथवा काठीने मारलं असेल , म्हणूनच तो भटका कुत्रा त्या दोन महिन्याच्या मुलाला चावला असेल .
त्याच असं आहे कि भटके कुत्रे कधीही , कोणावर स्वतःहून हल्ला करीत नाहीत , स्वतःहून चावत नाहीत ."
हे असं तुम्हाला प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी यांच्या कडून सदैव ऐकायला मिळेल .
याचाच अर्थ " भारत " या देशात दररोज , अंदाजे १,४१,९६० व्यक्तीं भटक्या कुत्र्यांना दगड मारतात , काठीने मारतात , कारण " भारत " या देशात दररोज , अंदाजे १,४१,९६० व्यक्तींना श्वान दंश होतो .
तुम्हाला प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी यांनी दिलेले हे स्पष्टीकरण योग्य वाटते ? दोन महिन्याचा मुलगा कुत्र्याला दगड मारू शकतो ?
" मेरा भारत महा . . . . . न !


भटक्या श्वानांना भोजन दान - हसू का रडू ?

" भटक्या श्वानांना भोजन दान " - हसू का रडू ? 

शनिवार , २१ ऑक्टोबर , २०१७ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध दैनीकामधील एक बातमी येथे देत आहे .
हि बातमी वाचून मला फक्त खालील माहिती आठवली.

- नागपूर शहरात अंदाजे ९०,००० ते १,००,००० एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता आहे.

- त्याचप्रमाणे नागपूर शहरात दर वर्षी अंदाजे २५,००० ते ३०,००० व्यक्तींना श्वान दंश होतो .

- श्वान दंशाच्या ज्या काही घटना होतात त्यातील ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.

- ही झाली फक्त महाराष्ट्र नावाच्या एका पुरोगामी राज्याच्या उप राजधानीतील श्वान दंशाची आकडेवारी. महाराष्ट्रातील इतर गावात , तालुक्यात , जिल्ह्यात , शहरात देखील याच प्रमाणे श्वान दंशाचे प्रमाण भरपूर आहे.

- " महाराष्ट्र राज्यात " दररोज अंदाजे अंदाजे ७,७०० व्यक्तींना श्वान दंश होतो.

- " भारत " या महासत्ता बनू पाहणाऱ्या देशात दररोज अंदाजे १ ,४१ ,९६० ( एक लाख एक्केचाळीस हजार नउशे साठ ) व्यक्तींना श्वान दंश होतो.

त्याचप्रमाणे " HINDUSTAN TIMES " मधील एक बातमी देखील या ई मेल सोबत जोडत आहे .

- या बातमीप्रमाणे कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अंदाजे २५,००० भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे.

- ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत अंदाजे ६०,००० ते ७०,००० भटके कुत्रे असण्याही शक्यता आहे .

- जर हेच प्रमाण धरले तर " महाराष्ट्र " नावाच्या एका पुरोगामी राज्यात अंदाजे एक ते दीड कोटी भटके कुत्रे असण्याची दाट शक्यता आहे.

- " भारत " या देशात अंदाजे २४ ते २६ कोटी भटके कुत्रे असण्याची दाट शक्यता आहे.


केल्याने होत आहे रे

केल्याने होत आहे रे , माझे करणेच चालू आहेच रे !
सर्व प्रथम दीपावली च्या उशिराने हार्दिक शुभेच्छा !
येणारे नवीन वर्ष आपणाला , आपल्या कुटुंबियांना श्वान दंश विरहित व निरोगी जाओ !
असो , मुद्द्याला हात घालतो .
- तुम्ही कितीही लढा , आदळ आपट करा , आपल्या देशात काहीच बदल होणार नाहीत .
- मीच फक्त का या विरुद्ध लढू ? तो नाही लढत , ती नाही लढत , ते नाही लढत . मग मीच का ?
- हे सुधारवण्याचं काम शासन कर्त्यांचं आहे . त्यांनीच यावर उपाय शोधावा
- मी कर भरून सुद्धा या विरुद्ध का म्हणून लढू ? मला सगळं व्यवस्थित मिळालं पाहिजे .
- मला , माझ्या जोडीदाराला ( LIFE PARTNER ला ) , माझ्या मुलांना अजूनही श्वान दंश नाही झाला . मग मी का त्याविरुद्ध लढू ?
- मी लढलो असतो , पण मला वेळच नाही . ( FB वर नेहमी PROFILE PICTURE बदलायला यांना वेळ असतो , whatsapp वर यांना भरपूर वेळ असतो , दारूच्या पार्ट्यांना यांना वेळ असतो . . . . यांना लढायला वेळ नसतो )
अशी व याच आशयाची अनेक वाक्य आपणाला , आपल्या अवती भवती सदा ऐकू येत असतात . त्याचप्रमाणे जो लढत असतो त्याचे खच्चीकरण करण्याचं काम व्यवस्थितपणे अशी वाक्ये ऐकवणारे नेहमीच करीत असतात.
असो , पुन्हा मुद्याला वळतो .
या ई मेल सोबत " महाराष्ट्र टाईम्स " या एका नावाजलेल्या वृत्तपत्रातील २२ ऑक्टोबर , २०१७ च्या अंकात आलेली एक बातमी देत आहे .
तुम्हाला नाही का वाटत कि " केल्याने होत आहे रे " .
आपणाला माहीतच असेल कि गेली अनेक वर्षे मी अश्या प्रकारच्या अनेक सामाजिक प्रश्नांवर लढत आहे .
मी मार्च, २०१३ पासून पोलिसांनी , दुचाकीवर घातले पाहिजे या साठी माझ्या पद्धतीने गल्ली ते लढतोय . ज्याला बऱ्यापैकी यश येताना दिसत आहे .
दुर्दैव म्हणजे बहुतांश भारतीयांना , राजकारण्यांना , प्रतिष्ठीत व्यक्तींना , श्रीमंत व्यक्तींना अनेक नियम पाळणे हे कमीपणाचे वाटते ( BELOW DIGNITY ) . पण माझे ठाम मत आहे की ज्या देशात प्रत्येक व्यक्ती
नियमांचे पालन करण्याचा काटेकोर पणे प्रयत्न करते , त्या देशातील अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटतात.

पहा तुम्हाला जमलं तर , झोपेचे सोंग घेऊन " प्रतिक्रिया" वादी भारतीय नागरिकाला " क्रिया " वादी व जागरूक भारतीय नागरिक बनविता आलं तर.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet


Friday, October 6, 2017

वाचावे ते नवलचं

" वाचावे  ते नवलचं  " 

नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश .

नवाकाळ , ६  ऑक्टोबर  , २०१७  

आहे कि नाही गम्मत ? 

ज्या वाघांची संख्या अतिशय कमी आहे , त्यातील एका वाघिणीला ठार मारण्याचा आदेश दिला जातो , आणि दररोज अंदाजे १,४१,९६० मानव प्राण्यांना दंश करणाऱ्या भटक्या कुत्र्यांना मात्र मानव प्राणी स्व-सौरक्षणासाठी मानव प्राणी साधा दगड देखील मारू शकत नाही , काठीने मारू सुद्धा शकत नाही. 

या वाघिणीच्या रक्षणासाठी प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी कसे  काय आले नाहीत याचे आश्चर्य वाटते . 

भारत या देशाचे एक वैशिष्ट्य आहे कि " मानव प्राणी मरो , पण भटका कुत्रा जगो " 

" मेरा भारत महा  ...... न ! "  


Thursday, October 5, 2017

" ठाणे - SMART CITY" मधील " SMART पुरस्कार नव्हे शिफारसी पुरस्कार "


" ठाणे - SMART CITY" मधील " SMART पुरस्कार नव्हे शिफारसी पुरस्कार

" महाराष्ट्र टाईम्स " या एक नावाजलेल्या दैनिकातील या आशयाची एक बातमी बुधवार, ऑक्टोबर , २०१७ च्या अंकात छापून आले आहे ती येथे देत आहे

अश्याच आशयाची बातमी " लोकमत " या दैनिकात देखील आली आहे

आजपर्यंत नोकरी साठी शिफारस , शाळा प्रवेशासाठी शिफारस , महाविद्यालय प्रवेशासाठी शिफारस , नोकरीत बढतीसाठी शिफारस  , नोकरीत बदलीसाठी शिफारस  , या अश्या इतर अनेक प्रकारच्या  शिफारसींबद्दल माहित होत , पण या अश्या नवीन शिफारसींबद्दल वाचल्यावर महा आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही 

असे शिफारसी पुरस्कार  पदरात पडून घेण्यात  " ठाणेकरांना

- कसे  काय हो  "भूषणवाटते

- असा कसा  हो " गौरव " झाला असे वाटते

हे मला आजतागायत कळलेले नाही

त्याचप्रमाणे " ठाणे - SMART CITY " मध्ये जर एवढे " गुणीजन " असते तर 
- ठाणे शहरातील परिवहन सेवा एवढी डबघाईला आली नसती
- ठाणे  शहरातील मैदाने गायब नसती झाली
- ठाणे शहरातील तलाव इतिहासजमा नसते झाले
- ठाणे शहरात एवढी अनधिकृत बांधकामे नसती झाली
- ठाणे शहरात एवढी अस्वछता नसली दिसली
ठाणे शहरात वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांची संख्या नगण्य झाली असती
- ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा एवढा बोजवारा उडाला नसता  , 
- ठाण्यातील नाले हे गटार नसते झाले
-  ठाणे शहरातील घोडबंदर  रोड वर पादचारी पुलांसाठी एवढी वाट पहावी नसती लागली
- ठाणे शहरातील गल्ली बोळात ( जागोजागी ) अनधिकृत फलक ( HOARDINGS ) नसते दिसले 
- ठाण्यात  सार्वजनिक स्वछता गृहांची वानवा नसती भासली
- ठाणे येथील येऊर या नैसर्गिक अरण्यात एवढे अनधिकृत बंगले  बांधले नसते गेले
- ठाणे येथील रस्ते , पादचारी पूल , अनधिकृत फेरीवाल्यानी  नसते अडवले
- ठाणे शहरात सण , उत्सवांसाठी रस्ते अडवले नसते गेले
- ठाणे शहरात सण , उत्सवांसाठी रस्त्यांवर खड्डे नसते पाडले गेले
- ठाण्यातील नाल्यावर अनधिकृत बांधकामे नसती  झाली
- ठाणे शहरात जागो जागी वाहन तळ उभारले गेले असते
- ठाणे शहरातील डोंगरावर , डोंगर अक्षरशः कापून अनधिकृत वस्त्या नसत्या उभारल्या गेल्या
- ठाणे शहरात अनधिकृत नळ जोडण्या नसत्या झाल्या
- ठाणे शहरातील पदपथांवर फेरीवाले नसते दिसले
- ठाणे शहरातील पदपथांवर अनधिकृत टपऱ्या नसत्या दिसल्या ,  
- ठाणे शहरातील सुविधा भूखंडांवर अनधिकृत बांधकामे नसती दिसली
- ठाणे शहरात अनधिकृत रिक्षांचा , अनधिकृत बसेस चा सुळसुळाट नसता दिसला
- ठाण्यातील शासकीय रुग्णालये , आरोग्य सेवा सेवा  यांचा बोजवारा नसता वाजला / यांची एवढी वाताहत नसती झाली
- ठाणे शहरातील नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी एवढा वेळ नसता  लागला
- ठाणे शहरातील बालकांना खेळाच्या मैदानाची  वानवा नसती भासली
- ठाणे शहरातील प्रत्येक शाळा , महाविद्यालये यांना खेळाची मैदाने असती
- ठाणे शहरातील रस्त्यावर , रस्ता कमीखड्डे जास्त अशी परिस्थिती नसती दिसली
- ठाणे शहरातील कोपरी पूल एवढी वर्षे नसता रखडला
- ठाणे शहरातील अपघाताला आमंत्रण देणारा माजिवाडा येथील वेडा वाकडा उड्डाण पूल नसता बांधला  गेला .  
- ठाणे शहरातील अक्षरशः प्रत्येक प्रकल्प पूर्ण व्हायला असे अनेक वर्षे उशीर नसता झाला
ठाणे शहरातील अक्षरशः प्रत्येक प्रकल्प पूर्ण व्हायला अवाढव्य असा खर्च ( COST OVER RUN ) नसता  आला
ठाणे शहरातील श्वान निर्बीजीकरणाची प्रक्रिया हि एक विनोदाचा विषय नसता झाला


ऐकावे ते नवलच नव्हे वाचावे ते नवलच

" ठाणे " येथे काय उणे

सत्यजित शाह - ०९८२११५०८५८ 
ठाणे 


Evil Triumphs When Good People Sit Quiet 


Stand up for what is right , Even if you’re standing alone !