Thursday, May 26, 2016

श्वानदंश झाल्यावर त्यावर उपाय न केल्यास रुग्ण १०० % दगावतो

नमस्कार ,

श्वानदंश झाल्यावर त्यावर उपाय न केल्यास रुग्ण १०० % दगावतो


२५.०५.२०१६ च्या महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रातील हा प्रत्येक भारतीयांसाठी  महत्वाचा असलेला हा लेख कृपया वाचा , कारण  ज्या भयावह वेगाने भटक्या कुत्र्यांची संख्या " भारत " देशात वाढत आहे त्याच प्रमाणे  ज्या पद्धतीने श्वान दंशाच्या घटना " भारत " देशात घटत आहेत , तो दिवस दूर नाही कि तुम्हाला , तुमच्या मुला बाळांना , तुमच्या जीवन साथीदाराला, तुमच्या आई , वडिलांना , सासू सासऱ्यांना , नातेवाईकांना श्वान दंश होण्याची दाट शक्यता आहे.


Sunday, May 22, 2016

डोंबिवली करांना असह्य होणारा भटक्या कुत्र्यांचा उच्छाद / STRAY DOG MENACE SPREADS PANIC AMONG RESIDENTS OF DOMBIVALI

नमस्कार , आणि सुंदर संध्याकाळ ,

डोंबिवली करांना असह्य होणारा भटक्या कुत्र्यांचा उच्छाद / STRAY DOG MENACE SPREADS PANIC AMONG RESIDENTS OF DOMBIVALI

" HINDUSTAN TIMES " मधील हि बातमी वाचा , झोपेचे सोंग घेतलेल्या भारतीय मानव प्राण्यांनो अजूनही तुम्हाला वाटते कि भारत या देशात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद नाही ?

- ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत अंदाजे ६०,००० ते ७०,००० भटके कुत्रे असण्याही शक्यता आहे .
- या बातमीप्रमाणे कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अंदाजे २५,००० भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे.
- जर हेच प्रमाण धरले तर " महाराष्ट्र " नावाच्या एका पुरोगामी राज्यात अंदाजे एक ते दीड कोटी भटके कुत्रे असण्याची दाट शक्यता आहे.
- " भारत " या देशात अंदाजे २४ ते २६ कोटी भटके कुत्रे असण्याची दाट शक्यता आहे.

या भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकारणावर एक तुफान विनोदी मालिका बनू शकते. असं ऐकण्यात आले आहे कि एका महानगर पालिकेने म्हणे भटक्या कुत्र्यांच्या संख्ये पेक्ष्या जास्त कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले असे दाखवून तेवढा खर्च मंजूर केला , पण तरीही भटक्या कुत्र्यांची पिल्लावळ जागो जागी दिसते म्हणे.

असो , माझे काम आहे झोपेचे सोंग घेतलेल्या भारतीय नागरिकाला झोपेतून जागे करणे.

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Saturday, May 21, 2016

Activist raises questions over TMC claim of sterlising 4,648 dogs in a year

Activist raises questions over TMC claim of sterlising 4,648 dogs in a year

Thursday, 21 May 2015 - 2:51pm IST |   Vinaya Patil


An RTI reply with regard to the dog sterlisation surgeries conducted by Thane Municipal Corporation (TMC) has disturbed activists as it revealed that the civic body has sterlised 4,648 dogs between April 1, 2014 and March 31, 2015.

Thane activist Satyajit Shah has raised questions over the sterlisation as he said, “I got to know that they work for 250 days a year from 11 am to 5 pm every day. Considering the number of days and work hours they put in, it seems unlikely that so many dogs would have been sterlised in the time frame mentioned. In addition to this, the TMC has only one dog catcher van which was bought in 2006. Sterilising one dog takes four days and it is not a short process.”

Shah also said that on an average 30 people are bitten by stray dogs every day in Thane city alone.

However, Plant and Animal Welfare's Society founder Nilesh Banage supported the TMC figures saying that the civic body had a leproscopy technique used to sterilise dogs. It makes their work easier.




Friday, May 20, 2016

नागपूर ग्रामीण भागात तीन महिन्यात साडेपाच हजार निरपराध मानव प्राण्यांना भटक्या कुत्र्यांचा चावा 5,500 STRAY DOG BITES in Three Months

नमस्कार , आणि सुंदर सकाळ ,

" नागपूर ग्रामीण भागात तीन महिन्यात साडेपाच हजार निरपराध मानव प्राण्यांना भटक्या कुत्र्यांचा चावा "

या सोबत २१ मे, २०१६ च्या " ठाणे वैभव " या वृत्त पत्रातील बातमी देत आहे. नागपूर

नागपूर च्या जवळील ग्रामीण भागातील  हि संख्या आहे. लक्ष्यात घ्या कि श्वान दंश झाल्यावर अनेकदा रुग्ण खाजगी दवाखाने अथवा खाजगी रुग्णालये येथे उपचार घेतात . व अश्या श्वान दंशाच्या रुग्णाची माहिती शासनाकडे नसते. याचाच अर्थ  प्रत्याक्ष्यात हि श्वान दंश  झालेल्यांची संख्या अंदाजे अकरा हजार च्या आसपास असण्याची दाट शक्यता आहे.

विचार करा जर ३ महिन्यात ११,००० श्वान दंश म्हणजे दररोज १२२ नागरिकांना श्वान दंश होतो व वर्षभरात अंदाजे ४४,००० निरपराध मानव प्राण्यांना भटका कुत्रा चावतो. अगोदर सांगितल्याप्रमाणे  हि आकडेवारी नागपूरच्या ग्रामीण भागातील आहे.

नागपूर शहरात अंदाजे ९०,००० ते १,००,००० एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर शहरात दर वर्षी अंदाजे २५,००० ते ३०,००० व्यक्तींना श्वान दंश होतो .

श्वान दंशाच्या ज्या काही घटना होतात त्यातील ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.

ही  झाली  फक्त महाराष्ट्र नावाच्या एका पुरोगामी राज्याच्या उप राजधानीतील  श्वान दंशाची आकडेवारी. महाराष्ट्रातील इतर गावात , तालुक्यात , जिल्ह्यात , शहरात देखील याच प्रमाणे श्वान दंशाचे प्रमाण भरपूर आहे.

" महाराष्ट्र राज्यात " दररोज अंदाजे अंदाजे ७,७०० व्यक्तींना श्वान दंश होतो.

" भारत " या महासत्ता बनू पाहणाऱ्या देशात दररोज अंदाजे १ ,४१ ,९६० ( एक लाख एक्केचाळीस हजार नउशे साठ )  व्यक्तींना श्वान दंश होतो.

एक सत्य असे आहे कि भारतातील  प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी ( ज्यातील अनेक प्राणी मित्र  मांसाहार मात्र चापून चोपून हाणतात / खातात ) त्यांचे  फक्त भटक्या कुत्र्यान्वरच  प्रेम आहे . आणि त्या प्राणी मित्रांना माहीतच नाही कि एवढ्या मोठ्या प्रमाणात श्वान दंशाच्या घटना भारतात दररोज घडत आहेत. हा प्राणी मित्रांचा अतिरेक सगळ्याच भारतीयांना महाग पडणार आहे.

काय तुम्हाला , तुमच्या मुला बाळांना , नातेवाईकांना अजूनही  श्वान दंश झाला नाही ? काळजी करू नका कधीही , कोठेही , सगळ्या भारतीयांना आयष्यात एकदा , अनेकदा  श्वान दंश होऊ शकतो कारण एवढ्या भयानक वेगाने भटक्या कुत्र्यांची संख्या " भारत " नामक देशात वाढत आहे.

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !






Sunday, May 8, 2016

कविता - मातृ दिन , पितृ दिन ( MOTHER 'S DAY , FATHER 'S DAY )

नमस्कार , आणि सुंदर सकाळ   ,

कविता - मातृ दिन , पितृ दिन  (  MOTHER 'S DAY , FATHER 'S DAY )

8 मे ,  जागतिक मातृ दिन  , आई दिवस ( म्हणजेच आजच्या शुद्ध मराठीत MOTHER 's  DAY ) आहे . फेसबुक वर फक्त याच दिवसाबद्दल अनेकांनी लिहिले आहे.

या सोबत मी स्वतः लिहिलेली  मातृ दिन , पितृ दिन  (  MOTHER 'S DAY , FATHER 'S DAY )   हि कविता पाठवीत आहे. ( मी येथे नमूद करू इच्छितो कि हि कविता मी कोणाचीही चोरलेली नाही व स्वतः लिहिलेली आहे ) .

असे अनेक दिन आज-काल साजरा करण्याची व पाश्चात्यांचे अनुकरण करण्याची भारतीयांना एक वाईट सवय लागली आहे.

यातले किती  भारतीय , रोज आपल्या जन्मदात्यांच्या पाया पडतात ?

यातले किती  भारतीय , रोज महिलांना मानाने वागवितात ?


या सगळ्या ढोंगी पणाचा राग ( सौम्य स्वरुपात )   या कवितेत व्यक्त झाला आहे. 


Thursday, May 5, 2016

१० / १२ वर्षांनतर हि कोपरी पूल अजूनही नियोजित

नमस्कार ,

५ मे , २०१४ च्या " पुढारी " या वृत्तपत्रातील हि बातमी वाचा .


मला सांगण्यास आतिशय दुखः होत आहे कि हा कोपरी पूल अजूनही अधांतरीच आहे . याच्या रुंदीकरणाला / विस्तारीकरणाला परवानगी मिळून अंदाजे १० ते १२ वर्षे झाली आहेत, पण आज तागायत एकही वीट नवीन चढविली गेली नाही.

या रस्ता रुंदीकरणाला पूर्वी रुपये ९ कोटी खर्च अपेक्षित होता , तो सध्या अंदाजे रुपये १०० कोटी पर्यंत पोहोचला असेल . आणि याच वेगाने हे रस्ता रुंदीकरण चौल राहिले तर  काही वर्षात हा खर्च रुपये ५०० कोटी पर्यंत पोहोचू शकेल.

खूप दुखः होते कारण

ठाणेकर गप्प
       शासन ठप्प
कोपरी पुलावर
      वाहतूक रोजच ठप्प

Evil Triumphs When Good People Sit Quiet


Stand up for what is right , Even if you’re standing alone !