Saturday, July 25, 2015

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिस , राजकारण्यांवर ठाणे वाहतूक पोलिसांची कारवाई

आपल्याला  माहित असेल कि मी मार्च, २०१३ पासून  , ठाणे येथील पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण ( HELMET ) घालावे यासाठी अनेक पातळीवर लढत आहे. त्याचा थोडाफार परिणाम म्हणजे , गेल्या काही महिन्यांमध्ये अंदाजे २०० च्या आसपास  पोलिसांना दुचाकीवर शिरस्त्राण नाही घातले म्हणून दंड झाला आहे. भले हा  दंड रुपये १०० असेल पण आज पर्यंत जे घडले नाही ( म्हणजे पोलिसांना दंड )  हे घडून आले.  MOTOR VEHICLE ACT MVA १२९/१७७ च्या अंतर्गत दुचाकीवर शिरस्त्राण ( HELMET ) घालणे हे सगळ्याच भारतीयांना  बंधनकारक आहे.

यासोबत दोन छायाचित्रे जोडत आहे . त्यातील पहिल्या छायाचित्रात आपण पाहू शकाल कि त्या लाल वाहनाला , जी पोलिसाची आहे , त्याला सुद्धा ज्यामर लावला आहे व त्या वाहनाच्या चालकाकडून / मालकाकडून  ठाणे वाहतूक पोलिसांनी दंड देखील वसूल केला आहे. दुसऱ्या छायाचित्रातील गाडीला ज्यामर लावला गेला आहे. ती गाडी  आहे अंबरनाथ येथील नगराध्यक्ष यांची. त्यांच्या गाडीला देखील ज्यामर लावला गेला. त्यांच्या वाहनाच्या चालकाकडून / मालकाकडून  देखील  वाहतूक पोलिसांनी दंड वसूल केला आहे. हि छायाचित्रे  मला  ठाण्याच्या DCP TRAFFIC DR . रश्मी जी करंदीकर यांनी whatsapp वर पाठविली आहेत.

२ / ३ दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मंत्री श्री. दिवाकर  रावते जी यांनी पोलिसांनी शिरस्त्राण नाही घातले म्हणून त्याची जी झाडा झडती घेतली हे कौतुकास्पद आहे. मी मंत्री श्री. दिवाकर रावते जी यांना त्यांच्या भ्रमणध्वनी वर ( MOBILE ) संपर्क साधला व त्यांना माझ्या या लढाई बद्दल सांगितलं. त्यांना असेही सांगितलं कि या पुढे मी पोलिस व राजकारणी यांनी आसन पट्टा ( SEAT BELT ) लावावा या साठी देखील लढाई चालू करणार आहे . मंत्री श्री. दिवाकर रावते जी यांनी पोलिस व राजकारणी यांनी वाहतुकीचे सगळे नियम पाळले पाहिजेत या माझ्या मागणीला सहमती दर्शविली. त्यांनी मला एवढेही सांगितले कि त्यांच्या ४ चाकी वाहनाला काळ्या काचा नाही आहेत.
हे सगळ सांगण्याचा एकच उद्देश आहे की मला आपल्या सगळ्यांना हे दाखवून द्यायचे आहे की माझ्या सारखा एक अति साम्मान्य नागरिक देखील या समाजात फार मोठ्ठा बदल घडवून आणू शकतो
या प्रयत्नांना आताशी थोडे फार यश आले आहे. अजूनही अनेक पोलिस शिरस्त्राण घालात नाहीत, वाहनातील आसन पट्टा ( SEAT BELT ) लावत नाहीत . काळ्या कुट्ट काचां असलेल्या गाड्या वापरतात. देव नागरी मध्ये लिहिलेले , अथवा दादा , राम , असे काही तरी लिहिलेले वाहनाचे क्रमांक असतात , लाल सिग्नल ला थांबत नाहीत , NO PARKING मध्ये गाड्या लावतात , एकेरी मार्ग असतानादेखील गाडी त्यान घुसावितात. अश्या अनेक प्रकारे नियमांचे उल्लंघन करतात.
यथा राजा तथा प्रजा हि म्हण खरीच आहे. जर नेते , राजकारणी , पोलिस नियम पाळत नाहीत तर मग नागरिक कशाला नियम पाळतील ?   
आत्ता तुम्ही म्हणाल कि पोलिस,  राजकारणी , नेते यांना नियम पाळले पाहिजेत हे सांगायची काय गरज ? त्यांनी स्वतः हून नियम पाळले पाहिजेत. जर तस सगळ सुरळीत होत असत तर मग पंतप्रधान नरेंद्र मोडी यांना स्वछ भारत अभियान राबवायची काय गरज होती ? ज्या भारत नामक देशात स्वच्छता ठेवा असे सांगितले जाते त्याच भारत या देशात पोलिस , राजकारणी , नेते यांना नियम पाळले पाहिजेत हे सांगायची गरज निर्माण झाली आहे.
माझ्या सारखा एक अति सामन्य नागरिक करून करून किती  प्रयत्न करणार ? त्याचप्रमाणे किती नागरिकांपर्यंत पोहोचणार ? तुम्हा  सगळ्यांच्या   मदतीची जर  जोड मिळाली तर अशक्य ते शक्य घडू शकेल. 
जर सगळ्या प्रकारच्या प्रसार माध्यमांनी माझी हि लढाई सामन्य नागरिकांपर्यंत नेली तर नागरिकांमधून काही माझ्या सारखे पुढे येउन वाहतुकीचे नियम सगळ्यांनी पाळले पाह्जेत यासाठी पोलिस, राजकारणी , नेते यांच्यावर दबाव टाकू शकतील.  
विचार करा जर एखाद्या अति सामान्य माणसाच्या प्रयत्नाने देखील समाजात थोडा फार बदल होतो तर अनेकांनी केलेल्या प्रयत्नांनी तर समाजात किती मोठ्ठा बदल होऊ शकेल ?

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet






STRICT ACTION by THANE TRAFFIC POLICE on POLITICIANS, POLICE personnel for violating Traffic Rules.

Hello,
Please go through the following photos. In one photo you can see a red car which belongs to a POLICE. It is appreciable that THANE TRAFFIC POLICE put JAMER to this CAR and challaned the driver / car owner.
In the second photo , that car belongs to a NAGARADHYAKSH of Ambernath Nagarpalika. Local Traffic Police put JAMER to this CAR and challaned the driver / car owner.
I received these photos through whatsapp from DR.Rashmi Karandikar - DCP TRAFFIC , THANE . With her permission only , I am sharing these photos.
My only intention of informing all of you is , A COMMON MAN like me also can bring changes in the system.
for last 3 years , on various levels I am fighting on the issue that why POLICE are not wearing helmet on 2 wheeler as well why they are not using seat belts in 4 wheelers. Literally daily I send photos of police not wearing helmet through whatsapp to the DCP Traffic, Thane. She acknowledges the receipt and later on informs about action taken on those police personnel.
In last few months many police were challaned for not wearing helmet. Through RTI reply I received this information.
With this I have posted RTI reply copy as well as copy of notice addressed to POLICE for wearing helmets by the then DCP TRAFFIC, THANE Dr. Shrikant Paropkari.
It has been noticed that many people post on facebook that do something about this, do something about that . it is like sitting in the home , to comment that Sachin Tendulkar should have played like this. If such people existed in the history , then just by sitting at home ( without going to BATTLEFIELD ) , they would have fought WAR and later cursed that they lost WAR.
Please just by commenting not a single issue will be solved. But if you try toward it majority of the problems faced by INDIA will be solved.
Come on please become an alert CITIZEN.
In case you need any guidance, do mail to me on satyajitshah64@gmail.com

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet





Thursday, July 23, 2015

Fight for POLICE and POLITICIANS also should strictly follow all traffic rules

नमस्कार ,
आपल्यापैकी काही जणांना माहित असेल कि मी गेली ३ वर्षे , ठाणे येथील पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण ( HELMET ) घालावे यासाठी अनेक पातळीवर लढत आहे. त्याचा थोडाफार परिणाम म्हणजे , गेल्या काही महिन्यांमध्ये अंदाजे २०० पोलिसांना दुचाकीवर शिरस्त्राण नाही घातले म्हणून दंड झाला आहे.
आता, हि TIMES OF INDIA , २१.०७.२०१५ च्या अंकात आलेली हि बातमी पहा. हीच बातमी मी २० जुलै, २०१५ ला संध्याकाळी वृत्तवाहिनीवर ( NEWS CHANNEL ) पाहिली होती. बातमी पाहिल्या पाहिल्या मी मंत्री श्री. दिवाकर रावते जी यांना त्यांच्या भ्रमणध्वनी वर ( MOBILE ) संपर्क साधला व त्यांना माझ्या या लढाई बद्दल सांगितलं. त्यांना असेही सांगितलं कि या पुढे मी पोलिस व राजकारणी यांनी आसन पट्टा ( SEAT BELT ) लावावा या साठी देखील लढाई चालू करणार आहे . मंत्री श्री. दिवाकर रावते जी यांनी पोलिस व राजकारणी यांनी वाहतुकीचे सगळे नियम पाळले पाहिजेत या माझ्या मागणीला सहमती दर्शविली. त्यांनी मला एवढेही सांगितले कि त्यांच्या ४ चाकी वाहनाला काळ्या काचा नाही आहेत.
मी देखील तुम्हा सारखाच एक सामान्य माणूस आहे. जगण्यासाठी व्यवसाय करतो. फरक एवढाच आहे कि मी फक्त प्रतिक्रिया न देता क्रिया करण्यावर भर देतो.
विचार करा जर एखाद्या माणसाच्या प्रयत्नाने समाजात थोडा फार बदल होतो तर अनेकांनी केलेल्या प्रयत्नांनी तर समाजात फार मोठ्ठा बदल होऊ शकेल.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet







Saturday, July 18, 2015

Killing of a F O B ( Foot Over Bridge ) - “एका पादचारी पुलाची भ्रूण हत्या”

नमस्कार ,

कृपया दोन मिनिटे शांत पणे उभे राहून  भ्रूण  हत्या झालेल्या या तत्वद्यान विद्यापीठ जवळील  " पादचारी पुलाला " श्रद्धांजली वाहून आम्हा ठाणेकर नागरिकांच्या दुखः आत सह्बागी व्हा.

मी "ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रसिध्द होणाऱ्या दैनिकाने हि बातमी रविवार , १९ जुलै , २०१५ च्या अंकात छापून आणून सगळ्या वाचकांपर्यंत नेल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.

आपण हे वाचा म्हणजे आणि हि हत्या समजून घ्या.

पुरावा म्हणून मी छायाचित्रे सुद्धा जोडत आहे.

“एका पादचारी पुलाची भ्रूण हत्या”

आजतागायत आपण मानवी भ्रूण हत्येच्या घटनांन  बद्दल  ऐकले होते . म्हणजेच मानवी जीव जन्माला यायच्या आतंच मातेच्या उदरात मारून टाकलेले ऐकले , वाचले असेल. पण निर्जीव " वस्तूची "   माफ करा " वास्तूची " भ्रूण हत्या झालेली कधी ऐकली आहे ? काय म्हणता हे शक्य नाही ? अहो भारत नामक देशात अशक्य असे काय आहे ? मी काही विनोद करीत नाही , हे जरा वाचा .

घोडबंदर रोड , हा ठाणे पश्चिम ( महाराष्ट्र , भारत ) येथील एक महत्वाचा महामार्ग ( HIGHWAY ) आहे. हा महामार्ग ठाणे , कळवा, नवी मुंबई , भिवंडी , मुंबई  येथून बोरीवली , वसई , डहाणू , पालघर  , त्याचप्रमाणे गुजरात येथे जाण्यासाठी फार सोयीचा आहे. हा एक महामार्ग असल्यामुळे ४ X ४ अश्या मार्गिका ( LANE ) वाहनांसाठी आहेत. या महामार्गावरून दुचाकी पासून अजस्त्र असे TRAILER अश्या सगळ्या प्रकारच्या वाहनांची सतत ये जा असते.  या महामार्गाच्या दुतर्फा अनेक व्यावसायिक इमारती , MALL , दुकाने , शैक्षणिक संस्था , रहिवासी संकुले उभी राहिली आहेत. आनंदनगर चेक  पोस्ट ते अगदी कासार वडवली , ओवळा च्याही पार पुढे पर्यंत म्हणजे अंदाजे १८ ते २२ किलोमीटर च्या या महामर्गावर पादचाऱ्यांना हा महामार्ग ओलांडण्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ एक व लुईसवाडी येथे एक असे २ पादचारी पूल ( F O B ) सध्या आहेत . आणि नितीन जंक्शन येथे एक भुयारी मार्ग आहे.  पण बाकी ठिकाणी हा महामार्ग ओलांडणे म्हणजे पादचाऱ्यां साठी जीव धोक्यात घालून केलेली रोजची कसरत असते. पादचारी पूल नसल्यामुळे आजतागायत अनेक नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला . त्याचप्रमाणे अनेक नागरिक अपघातग्रस्त होवून जखमी झाले आहेत.

आता थोडीशी आकडेवारी देतो.

२०१० / २०११ साली ठाणे येथील प्रशासनाने / MSRDC यांनी  १० पादचारी पूल घोडबंदर रोड येथे उभारण्याचे जाहीर केले .
२०१२ , जानेवारी नंतर काम चालू होणार होते.

त्यानंतर काहीच झाले नाही.

२२ नोव्हेंबर , २०१० पासून मी घोडबंदर रोड येथे पादचारी पूल हवे आहेत या साठी TMC चे कमिशनर यांच्याकडे पाठ पुरावा  केला होता. अनेकवेळा पाठपुरावा करून काहीही नाही हलले म्हणून मी ४५० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन ऑक्टोंबर , २०१३ च्या शेवटच्या आठवड्यात TMC चे श्री. K D LALA - CHIEF ENGINEER ( तत्कालीन ) यांना दिले. त्यावेळेस त्यांनी असे आश्वासन दिले कि ६ पाठ्चारी पुलांसाठी मान्यता मिळाली आहे. त्यातील ४ साठी tender मागविले आहेत व आनंद नगर आणि ज्युपिटर रुग्णालय येथील WORK ORDER दिली आहे . त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकी अगोदर घाई घाई मध्ये काही पादचारी पुलांचे भूमिपूजन , ठाणे येथील अनेक प्रतिष्ठित माननीय, आदरणीय, वंदनीय , पूजनीय अश्या राजकीय व्यक्ती  , नेते यांच्या शुभ हस्ते वाजत गाजत पार पडले . सगळ्या प्रकारच्या प्रसार माध्यमांद्वारे भूमिपूजनाची बातमी पसरली. आज त्या भूमिपूजनाच्या घटनेला काही महिने झाले आहेत . निवडणुका झाल्या आहेत. राजकारणी व्यक्ती , नेते कधीच चालत रस्ता ओलांडत नाहीत . ते तरं परदेशी बनावटीच्या अद्ययावत अश्या गाड्यांमध्ये फिरतात. त्यामुळे सध्या सगळीकडे या विषयावर साम सम दिसून येते आहे.

मी याद्वारे काही छायाचित्रे जोडत आहे. दोन  छायाचित्रात ( Before 1 & Bofore 2 ) जी १० ते १२ दिवसांपूर्वी घेतली होती, त्यात तत्वद्यान विद्यापीठा जवळील पादचारी पुलासाठी जे भूमिपूजन केले होते ते स्पष्ट दिसत आहे . आता    दुसरी दोन  छायाचित्रे ( Now 1 & Now 2 )  निरखून पहा , त्या भूमिपूजन केलेल्या जागेवर नुकतेच सिमेंट टाकून ती जागा पूर्ववत केली गेली आहे.

यावरून या तत्वाद्यान विद्यापीठ जवळील जन्माला येणाऱ्या पादचारी पुलाची भ्रूण हत्या झाली अशी दाट शंका येते. बाकी पादचारी पुलाबद्दल मला काही माहित नाही.

आता बहुतेक पुढील निवडणुकीपर्यंत वाट पहावी लागेल असे वाटते. पण त्यावेळी देखील परत त्याच ठिकाणी भूमिपूजन होईल व काही महिन्यांनी ती जागा सिमेंट लावून पुर्वव्रत केली जाईल. आणि अजून एक भ्रूण हत्या होईल .

म्हणा मेरा भारत महा.......................न.

  
Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 









Thursday, July 16, 2015

FUNNY CAR PARKING IN INDIA

नमस्कार ,
हे छायाचित्र मी नुकतेच ( १६ जुलै, २०१५, संध्याकाळी ७.२० वाजता ) नाशिक येथील HOTEL VITS च्या माझ्या खोलीतून काढले आहे. या HOTEL ने चारचाकी वाहने ओळीने ठेवण्यासाठी ( PARKING ) करण्यासाठी व्यवस्थित पणे रेषा आखून दिल्या आहेत. तरीही माझ्या प्रत्येक मुक्कामात मी अश्या प्रकारचे अति विनोदी गाडी ठेवणे ( WRONG PARKING ) पाहतो.
या सद्गृहस्थाने तीन गाड्यांची जागा गिळंकृत केली आहे.
थोड्या फार फरकाने भारत नामक देशात हे दृश्य बऱ्याच ठिकाणी पहायला मिळते.
दुखः याचे वाटते कि भारतातील लोकांचे उत्पन्न वाढत आहे पण स्वयंशिस्त कमी होत चालली आहे. मला कोण अडविणार, मला कोण विचारणार हि प्रवृत्ती वाढत आहे.
मेरा भारत महान !


DAILY APPROXIMATELY 30 cases of STRAY DOG BITE in THANE , MAHARASHTRA, INDIA

नमस्कार,
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर ९९.९९ % भारतीय शांत बसले आहेत. श्वान दंश जणू देवाचा प्रसाद म्हणून आनंदाने सहन करीत आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या रात्री अपरात्रीच्या भुंकण्याचा या ९९.९९ % सहनशील भारतीयांना त्रास होत नाही उलट त्यांना हे भुंकणे म्हणजे अंगाई गीत आहे असेच वाटते. . दुचाकीची आसने कुत्र्यांनी फाडलेली त्यांना चालतात. दुचाकीच्या मागे कुत्रे धावून त्याने अपघात होतात हे त्यांना चालते . लहान मुलांना कुत्रे चावतात हे चालते. सगळीकडे कुत्रे नैसर्गिक विधी करून घाण करतात हे त्यांना चालते. गेल्या वर्षी पुणे येथील १२ मानव प्राणी श्वान दंश झाल्यामुळे रेबीस ने जग सोडून गेले हे सहन करतात.
कशी गम्मत आहे ना , उंदीर नावाचा प्राणी मारण्यासाठी नगरपालिका, महानगर पालिका नागरिकांना पैसे देते , पण भटक्या कुत्र्याला साधे हाड जरी म्हटलं तरी या SO CALLED प्राणी मित्रांच्या तक्रारीवर मानव प्राण्याला कोठडीत टाकते.
जरा हि बातमी वाचा. भारतीय नागरिकांनो आता तरी सोंग घेतलेल्या झोपेतून जागे व्हा .
FB वर स्वतःचे PROFILE PICTURE बदलणे जरा कमी करा . भटक्या कुत्र्यांच्या होणाऱ्या अनिर्बंध वाढीवर आवाज उठवा. या भटक्या कुत्र्यांमुळे मानव प्राण्याला होणाऱ्या त्रासावर आवाज उठवा .
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet


Monday, July 13, 2015

News in PUDHARI - STRAY DOG MENACE

नमस्कार , आणि सुंदर सकाळ ,

आज , म्हणजे १४ जुलै, २०१५ च्या " पुढारी " या वर्तमान पत्राने हि बातमी दिली आहे.

मला येथे आवर्जून सांगावेसे वाटते कि या भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर बहुतेक वर्तमान पत्रांनी अनेक वेळा लिहिले आहे  व वृत्त वाहिन्यांनी ( NEWS CHANNELS ) देखील या प्रश्नावर कार्यक्रम केले आहेत , व चर्चा देखील घडवून आणली आहे.

मला अनेक पत्रकार मित्रांनी , त्याच बरोबर वृत्त वाहिन्याच्या निवेदक , निवेदिका यांनी सांगितलं आहे कि त्यांना तर हा भटक्या कुत्र्यांचा त्रास अनेक वेळा होतो. रात्री अपरात्री घरी जाताना कुत्रे मागे लागतात, दुचाकी वरून प्रवास करतांना  देखील भटके कुत्रे मागे लागतात . हाच भयानक अनुभव अनेक पोलिसांना देखील आला आहे.

माझ्या कडे या प्रश्नावर एवढी माहिती आहे कि मला खरच PhD  मिळू शकेल . ( सध्या काही प्रतिष्ठित व्यक्ती मिळवितात तशी नाही ) . त्यात्तील थोडीशी  माहिती सांगतो ज्याने तुमची झोप उडवेल. " प्रत्येक  कुत्री एका वेळेला १२ पिल्लांना जन्म देते. त्यातील निम्मी जगतात.  कुत्री हि दरवर्षी पिल्लांना जन्म देवू शकते. " . विचार करा किती भयानक वेगाने भटक्या कुत्र्यांची संख्या तुमच्या आमच्या , प्रत्येकाच्या गावात , शहरात, राज्यात , देशात वाढत आहे.

तुम्हा सर्व सुजाण नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे कि , चला उठा, जागे व्हा , " जागरूक नागरिक " बना . या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवा . तुम्हाला , अथवा तुमच्या प्रियजनांना भटका कुत्रा चावण्याची वाट बघू नका .

आपण मानव प्राणी विसरून गेलो आहोत कि आपल्याला देखील सुखा समाधानाने जगण्याचा या देशात हक्क आहे .

चला या भटक्या कुत्र्यांचा दहशती खाली न जगता , या प्रश्नावर मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य यांना एक ई मेल पाठवा. काही माहिती हवी असेल तर मला  satyajitshah64@gmail.com   या ई मेल वर संपर्क साधा.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet





Sunday, July 12, 2015

Issue of Stray Dog Menace - भटक्या कुत्र्यांचा हाताबाहेर जात चाललेला प्रश्न

नमस्कार ,
हि काही वर्तमान पत्रातील कात्रणे पहा .
केरळ या राज्यात गेल्या ६ महिन्यात ७०,००० नागरिकांना श्वान दंश झाला म्हणून त्यांनी सर्व पक्षीय बैठक तातडीने बोलावली आहे.
पण आपल्या महाराष्ट्र नावाच्या राज्यात तालुका , ग्राम पंचायत , पालिका , नगरपालिका , महानगर पालिका त्याचप्रमाणे राज्य शासन या सगळ्या पातळीवर या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर निष्क्रियता आठळून येते.
भटक्या कुत्र्यांच्या हाताबाहेर जात असलेल्या जन्म दराबद्दल त्याच बरोबर भटक्या कुत्र्यांमुळे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना होत असलेल्या अनेक प्रकारच्या त्रासांबद्दल मी गेली काही वर्षे महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्य मंत्र्यानसमोर अनेक वेळा ई मेल द्वारे गाऱ्हाणे मांडले होते. आज सुद्धा मी देवेंद्र जी फडणवीस यांना एक ई मेल पाठविला आहे.
या सोबत नवा काळ व लोकसत्ता या दैनिकात १२ जुलै, २०१५ आलेली व अंगाचा थरकाप उडविणारी बातमी जोडली आहे. " चाळीसगाव या महाराष्ट्र राज्यातील एका तालुक्यात पिसाळ लेल्या कुत्र्याने १९ निरपराध नागरिकांचे लचके तोडले ." यातील तिघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. यावर कडी म्हणजे तेथील रुग्णालयात रेबीस ची लस शिल्लक नसल्याने जखमींची लस विकत घेण्यासाठी धावपळ करावी लागली.
" ठाणे " महानगर पालिकेच्या हद्दीत रोज अंदाजे ३० नागरिकांना श्वान दंश होतो . याचाच अर्थ फक्त " ठाणे " महानगर पालिकेच्या हद्दीत दर वर्षी अंदाजे ११,००० नागरिकांना श्वान दंश होतो. हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने डोंबिवली , अंबरनाथ , टिटवाळा , उल्हासनगर, पनवेल , मुंबई , नवी मुंबई , औरंगाबाद, पुणे , सोलापूर , कोल्हापूर, कल्याण , अ अश्या इतर अनेक गावां मध्ये आहे . २०१२ - २०१३ मध्ये नागपूर मध्ये २०,००० नागरिकांना श्वानदंश झाला . वर्धा येथे १०,००० नागरिकांना श्वानदंश झाला , मुंबई येथे ८०,००० नागरिकांना श्वानदंश झाला.
आपले दुर्दैव म्हणजे आपल्या नगरसेवकांना , आमदारांना , खासदारांना या प्रश्नावर लढणे हे महत्वाचे वाटत नाही. त्याच प्रमाणे नागरिकांनाही या प्रश्नावर आवाज उठवणे हे गरजेच वाटत नाही.
माझ्या प्रमाणे डोंबिवली येथील Dr आनंद हर्डीकर , बांद्रा येथील ललित जी केंकरे - वय ८३ वर्षे ( कैलासवासी दामू केंकरे यांच्या पत्नी ) , ठाणे येथील निलेश आंबेकर, ठाणे येथील चन्द्रहांस तावडे हे असे काही मोजकेच नागरिक या प्रश्नवर सदैव लढत आहेत.
माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे हि आपल्या पैकी कोणाला अथवा आपल्या जवळच्या व्यक्तींना श्वान दंश होई पर्यंत थांबू नका . आपण हि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याना ई मेल टाका.
त्यांचा ई मेल नाही हे कारण देऊ नकात. मला satyajitshah64@gmail.com या ई मेल वर संपर्क करा मी आपणाला सगळी माहिती देऊ शकतो.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet