Tuesday, May 5, 2015

नवा काळ ५ मे, २०१५ खेड मध्ये वर्षात ७२३ जणांना श्वान दंश - 723 Stray Dog Bites in KHED in a year

" नवा काळ " या मराठी दैनिकातील ५ मे, २०१५ च्या अंकात आलेली हि बातमी वाचा .
माझ्या मते हा जो आकडा आहे तो फक्त शासकीय दवाखाने , रुग्णालये येथे औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांचाच आहे. खाजगी दवाखाने , रुग्णालये येथे औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा यात धरला तर तो बराच वाढू शकेल.
ठाणे या शहरात रोज अंदाजे ३० जनांना श्वान दंश होतो.
श्वान दान्शातील ८० % व्यक्ती या ३ ते ८ या वयोगटातील असतात .
भटक्या कुत्र्यांची वाढत जाणारी संख्या व त्याचप्रमाणे श्वानदंशाच्या वाढत जाणाऱ्या घटना हि एक फार गंभीर समस्या आहे. दुर्दैव असे आहे कि शासन या बाबत अजूनही गंभीर झालेले नाही.
एका दवाखान्यात लावलेली पाटी वाचा . यावरून कळेल कि कुत्र्याचे चावणे ( श्वान दंश ) अथवा त्याच्या नखांचे ओरखडे हे मानवी प्राण्याला किती घातक ठरू शकतात.
या विरुद्ध भारतीय नागरिकांनी आताच आवाज नाही उठविला तर काही वर्षात भटक्या कुत्र्यांची संख्या मानवी लोकसंख्ये एवढी होईल व बाळ जन्मल्यापासून त्याला आयुष्भर रेबीस होवू नये म्हणून लस टोचून घ्यावी लागेल.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet





No comments:

Post a Comment