Saturday, May 19, 2018

नागरिकांकडूनच पर्यावरणाचा ऱ्हास


नागरिकांकडूनच पर्यावरणाचा ऱ्हास “

नमस्कार

काही दिवसांपूर्वी मला  पर्यावरण दक्षता मंच ठाणे जिल्हाधिकारी ( COLLECTORATE  ) कार्यालय यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या ठाणे खाडीतून पक्षी निरीक्षणासाठी छोट्या  होडीतून भ्रमण करण्याची संधी   मिळाली होती

त्या दरम्यान हे छायाचित्र टिपलं आहे . त्यात  प्लास्टिक च्या पिशवीत निर्माल्य दिसत आहे . अश्या अनेक पिशव्या मी त्या खाडी भ्रमणादरम्यान पाहिल्या

अश्या शेकडो , हजारो पिशव्याभरून दररोज खाडी , नाले , नदी , समुद्र यात टाकले जातेअश्याने सगळीकडे ' मिठी ' नदी सारखी पुरपरिस्थिती उदभवायला कितीसा वेळ लागेल ? 

प्रत्येक वेळी शासनाच्या नावे बोटं मोडण्यात काहीही मोठेपणा नसतो

नागरिकांनी वेळीच ' जागरुक / सजग   ' होण्याची नितांत आवश्यकता आहे

कसा काय भारत देश जगातील महासत्ता बनू पाहतोय हेच कळत नाही . 

या विरुद्ध जनजागृती करण्याची नितांत गरज आहे . 

सत्यजित अ शाह - ठाणे 



No comments:

Post a Comment