Wednesday, April 12, 2017

" भटक्या कुत्र्यांना राष्ट्रीय प्राणी घोषित करा " - जन जागृती साठी


नमस्कार , प्रसन्न सकाळ , - " भटक्या कुत्र्यांना राष्ट्रीय प्राणी घोषित करा " - जन जागृती साठी

आपणाला माहीतच असेल कि माझा " भटक्या कुत्र्यांना राष्ट्रीय प्राणी घोषित करा " हा माझा एक लेख " नवा काळ " या दैनिकाच्या ७ एप्रिल, २०१५ च्या अंकात छापून आला होता . 

७ तारखेपासून ते १० एप्रिल, २०१५ पर्यंत मला अंदाजे १०० जणांनी दूरध्वनी करून व ५ जणांनी SMS करून लेख आवडला व या महत्वाच्या विषयाला अश्या अनोख्या पद्धतीने वाचा फोडल्याबद्दल माझे अभिनंदन केले.
अगदी धुळे, नागपूर, सिंधुदुर्ग, नागपूर , बारामती , कोल्हापूर , भुसावळ , पुणे , उरण , चिपळूण अशा अनेक मुंबई पासून दूर असलेल्या ठिकाणानहूनही दूरध्वनी आले . “नवा काळ” अक्षरशः महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सर्वदूर वाचला जातो याचे फारच कौतुक वाटले.
असो , या सर्व दूरध्वनींमुळे असे कळले कि हा भटक्या कुत्र्यांचा त्रास सगळ्या नागरिकांनाच होत आहे आणि सगळ्यांनाच " तोंड दाबून बुक्क्याचा मार " सहन करावा लागात आहे.
आत्ता पर्यंत या भटक्या कुत्र्यांमुळे शेकडो जणांचे प्राण घेतले आहेत व हजारो व्यक्तींना जखमी केले आहे . आपल्या देशात या मृत व्यक्तींच्या घरच्यांची परिस्थिती काय झाली असेल याचे या प्राणी मित्रांना काहीच घेणे नसते . जखमींच्या मदतीसाठी या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था कधी पुढे आलेल्या ऐकिवात नाही. अनेकांनी मला असे सांगितले कि हे प्राणी मित्र फक्त भटक्या कुत्र्यांना खाण्यासाठी घराबाहेर येतात पण भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना जो त्रास होतो त्याबद्दल त्यांना काहीच पर्वा नसते. गम्मत म्हणजे अश्या प्राणी मित्रांना हे भटके कुत्रे कधीच चावत नाहीत कारण त्यांना यांच्या कडून खाणे मिळत असते.
आता या प्रश्नावर फार मोठे जन आंदोलन छेडण्याची नितांत गरज आहे.
Evil Triumphs When Good People Sit Quiet


No comments:

Post a Comment