Monday, December 19, 2016

भटक्या कुत्र्याचा मुलाला चावा , वर्षभरात चार हजार जणांना श्वानदंश , अंबरनाथमध्ये कुत्रा चावल्याने मुलगा जखमी

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,
" भटक्या कुत्र्याचा मुलाला चावा " - महाराष्ट्र टाईम्स - १९. १२. २०१६
" वर्षभरात चार हजार जणांना श्वानदंश " - महाराष्ट्र टाईम्स - १९. १२. २०१६
" अंबरनाथमध्ये कुत्रा चावल्याने मुलगा जखमी " -  नवा काळ -  १९. १२. २०१६
अश्या तीन वेगवेगळ्या मथळ्याखाली आजच्या . म्हणजे , सोमवार , १९. १२. २०१६ च्या " महाराष्ट्र टाईम्स " व " नवा काळ " या वृत्तपत्रातील वेग वेगळ्या बातम्या येथे देत आहे.
हे असे फक्त काही अंबरनाथ येथेच घडत नाही , तर "महाराष्ट्" राज्यात , त्याचप्रमाणे "भारत" देशात अनेकांना दररोज श्वान दंश होतो.
जरा खालील माहिती वाचा "

- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७७० व्यक्तींना श्वान दंश होतो.
- त्याचप्रमाणे भारत देशात दररोज अंदाजे १,४१,९६०  व्यक्तींना श्वान दंश होतो.
- मुंबई मध्ये १९९४ ते नोव्हेंबर , २०१५ पर्यंत , १३ लाख ७० हजार ४७७ जणांना श्वान दंश झाला आहे. त्या मध्ये कुत्रा चावल्याने झालेल्या रेबीज रोगाने ४३४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
- प्राण्यांच्या दंशाची तीव्रता ( फोर्से ) : PSI (Pound per Square Inch).मध्ये मोजतात. 
प्रौढ माणसाच्या चावण्याची तीव्रता १५० PSI असते.
पण कुत्रा या प्राण्याच्या दंशाची तीव्रता ५५६  PSI एवढी असते . म्हणजेच अंदाजे माणसाच्या पेक्ष्या ४ पतीने जास्त असते.
- गेल्या १० महिन्यात ठाणे महानगर पालिका हद्दीत एकाही भटक्या कुत्र्याची निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया झालेली नाही. थोड्या फार प्रमाणात ,

काय म्हणता , तुम्हाला , तुमच्या मुलांना , तुमच्या घरच्यांना , तुमच्या आप्तेष्टांना श्वान दंश होईपर्यंत तुम्ही या गंभीर प्रश्नावर गप्प बसणार आहात.

मी एवढाच म्हणू शकेल

नागरिक गप्प
        शासन ठप्प

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet




No comments:

Post a Comment