Saturday, July 30, 2016

ठाण्यात श्वानांची संख्या 55 हजार

नमस्कार ,

" ठाण्यात श्वानांची संख्या 55 हजार "

31 जुलै , 2016 च्या " नवाकाळ " या वृत्तपत्रातील हि बातमी वाचा .
माझ्या मते "ठाणे " महानगर पालिका हद्दीत आजच्या घडीला भटक्या कुत्र्यांची संख्या अंदाजे 80,000 ते 90,000 असण्याची दाट शक्यता आहे . अहो "हिरानंदानी इस्टेट" या एका निवासी संकुलामध्ये अंदाजे 800 ते 1000 भटके कुत्रे आहेत. मी सध्या राहत असलेल्या "हाईड पार्क" या छोट्याशा निवासी संकुलामध्ये अंदाजे 60 ते 80 भटके कुत्रे आहेत. आमच्या लगतच्या परिसरात अंदाजे 200 ते 250 भटके कुत्रे आहेत.

त्याचप्रमाणे नसबंदी चे आकडे हे खरे वाटत नाहीत . जर एवढ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांची नसबंदी झाली असेल तर जागो जागी भटक्या कुत्र्यांची पिल्लावळ कशी काय दिसते ? का यातही परकीय शक्तीचा , अथवा विरोधी पक्षाचा हात आहे ? का बाहेरील कुत्रे ठाण्यात येऊन पिल्लावळी वाढवून परत त्याच्या मूळ गावी जात आहेत ?

दुर्दैव हे आहे कि अजूनही एकाही राजकीय पक्षाला या अति गंभीर प्रश्नावर हालचाल करावीशी वाटत नाही


" अंबरनाथ करांना मोकाट कुत्र्यांची दहशत "

नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

" अंबरनाथ करांना मोकाट कुत्र्यांची दहशत "

31 July,2016 च्या "पुढारी" या वृत्तपत्रातील हि धक्कादायक बातमी वाचा .

हो उठा . आतातरी जागे व्हा . हा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

भारतातील, प्रत्येक शहरात, जिल्हात , तालुक्यात , गावात , गल्लीत , बोळात कमी - जास्त प्रमाणात हेच चित्र दिसून येते.

माझा परीने मी या गहन प्रश्नावर गेली 4 ते 5 वर्षे लढत आहेच.
 
 

Thursday, July 28, 2016

" पिसाळलेला कुत्रा चावल्याने शाळकरी मुलगी गंभीर "


नमस्कार ,

" पिसाळलेला कुत्रा चावल्याने शाळकरी मुलगी गंभीर "

शुक्रवार , २९ जुलै, २०१६ च्या " नवाकाळ " या वृत्तपत्रातील हि बातमी .

हि दुर्दैवी घटना महाराष्ट्र राज्यातील संगमनेर या तालुक्यात घडली आहे .

नेहमीप्रमाणे प्राणी मित्र व प्राणी मैत्रिणी " त्या मुलीने त्या पिसाळलेल्या कुत्र्याला दगड मारला असेल" असे सांगून त्या भटक्या कुत्र्याचे समर्थन करणार.

अश्या वेळी एकही प्राणी मित्र , प्राणी मैत्रीण श्वान दंश ग्रस्त मानव प्राण्याला मदत करण्यास येत नाही .

९९.९९ % नागरिक नेहमीप्रमाणे चुप्प ,
शासन देखील राहणार गप्प .
 
 

Wednesday, July 27, 2016

" राज्यसभेत शिरू पाहणाऱ्या भटक्या कुत्र्याला अडवून हाकलले " - भटक्या कुत्र्याला अपमानास्पद वागणूक "


नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

" राज्यसभेत शिरू पाहणाऱ्या भटक्या कुत्र्याला अडवून हाकलले " - भटक्या कुत्र्याला अपमानास्पद वागणूक "

२७.०७.२०१६ च्या " लोकमत " या वृत्त पत्रातील ही बातमी वाचा

राज्यसभेत लोकनियुक्त प्रतिनिधींनी निवडून दिलेल्या व्यक्ती , त्याचप्रमाणे राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या व्यक्ती खासदार म्हणून जातात.

हे चित्र पाहून तरी केंद्र शासनाला , या भटक्या कुत्र्यांच्या अमर्याद वेगाने वाढत जाणाऱ्या संख्येच्या प्रश्नांची जाण व्हायला हरकत नाही .

पण त्या भटक्या कुत्र्याला सुरक्षा रक्षकांनी तिथून हाकलल्यामुळे त्या भटक्या कुत्र्याचा जो घोर अपमान झाला आहे , या अपमानास्पद वागणुकीविरुद्ध आता " भारत " या देशातील प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी त्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई करतात हे पहावे लागेल .
त्या सुरक्षा रक्षकांना हे माहीत असायला हवं की " भारत " या देशात , " भटका कुत्रा " या प्राण्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे . भटकणे हा भटक्या कुत्र्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे ( त्यांचे नावच " भटका " कुत्रा असे आहे ) त्यामुळे त्याला अशी अपमानास्पद वागणूक देणे हे योग्य नाही . फार फार तर त्या भटक्या कुत्र्याने राज्य सभेत शिरुन असे काय केले असते ? काही वेळ फक्त भुंकला असता , काही खासदारांना फक्त चावला असता , त्यातील काही खासदारांना फक्त रेबीस झाला असता , काही खासदार फक्त जखमी झाले असते , काही खांबांवर फक्त " मूत्र " विसर्जन केले असते , काही ठिकाणी फक्त " मल " विसर्जन केले असते , काही आसने फक्त फाडली असती , काही खासदारांच्या मागे फक्त धावला असता , काही वाहनांच्या मागे फक्त धावला असता , काही दुचाकींच्या मागे फक्त धावला असता , फक्त काही काळ राज्यसभेचे कामकाज फक्त तहकूब झाले असते , काही दिवसांनी त्याने त्याच्या जोडीदाराला ( भटक्या कुत्रीला ) फक्त आणले असते , त्या दोघांची दर सहा महिन्यांनी छान , गोंडस , अशी छोटीशी फक्त 6 ते 12 अशी पिल्ले जन्माला आली असती , त्यातील काही संसदेच्या आवारात फक्त गेली असती .

फक्त एवढयाश्या साध्याश्या , जराश्या कारणांसाठी त्या भटक्या कुत्र्याला असे हाकलून द्यायचे ?

यापुढे भटक्या कुत्र्यांना कोठूनही हाकलून देणे म्हणजे भटक्या कुत्र्यांवर अन्याय आहे.
ता. क . : हे जे काही लिहिले आहे ते फक्त उपहासात्मक ( आजच्या शुद्ध मराठीत SATIRE ) असे लिहिलेले आहे. कोणाच्याही अगदी " भटका कुत्रा , भटका कुत्री  " यांच्या देखील भावना दुखविण्याचा माझा  कोणताही   हेतू नाही . भटक्या कुत्र्यांच्या या भयंकर अश्या प्रश्नावर जनजागृती करण्याचा  हा एक  प्रयत्न आहे. 

Monday, July 25, 2016

Stray dog attack leaves elderly man badly injured in NAGPUR , MAHARASHTRA , INDIA

नमस्कार , आणि सुंदर सकाळ ,

STRAY DOG ATTACK LEAVES SR CITIZEN BADLY INJURED IN ZINGABAI TAKLI

व्यावसायिक कामासाठी ( पोटा पाण्या साठी ) सध्या नागपूर , महाराष्ट्र राज्य येथे आहे. सकाळी THE TIMES OF INDIA , नागपूर आवृत्ती वाचण्यासाठी उघडली आणि दुसऱ्याच पानावर STRAY DOG ATTACK LEAVES SR CITIZEN BADLY INJURED IN ZINGABAI TAKLI ही बातमी वाचली . येथे आल्या पासून अनेक ठिकाणी अनेक भटक्या कुत्र्यांचे थवे च्या थवे बिनधास्त पणे फिरताना पाहिले होते. आणि आत्ता हि बातमी .

यावर प्राणी मित्र, व प्राणी मैत्रिणीचे ठराविक ऊत्तर येणार , " कुत्रा स्वतः कधीच कोणाला चावत नाही " , त्याला त्या 67 वर्षांच्या वयस्कर गृहस्थांनी पहाटे 4.45 वाजता दगड मारला असेल म्हणून कुत्रा त्यांना चावला असेल . ( " भारत " या देशात दररोज अंदाजे 1,41,960 व्यक्तींना श्वान दंश होतो , याचाच अर्थ दररोज एवढ्या नवीन व्यक्ती भटक्या कुत्र्यांना दगड मारतात . प्राणी मित्र व प्राणी मैत्रिणींचे हे असले ऐकावे ते नवलंच . )

दुखः एवढेच वाटते कि नागपूर मधील तमाम " मानव प्राणी " या " भटक्या कुत्र्यांच्या " अनिर्बध वाढणाऱ्या संख्येच्या प्रश्नावर , व त्यामुळे वाढत जाणाऱ्या श्वान दंशाच्या घटनांवर मूग गिळून गप्प बसलेले आहेत. तरी बरं येथे मुगाचे पीक येत नाही .

असो , नागपूरकर तुम्ही एवढ्यांदा जंगलात वाघ पाहण्यासाठे जाता , तेथे तुम्ही जंगली कुत्रे कळपाने फिरताना पाहिले असतीलच . तुम्हाला हे देखील माहीत असेलच कि ज्या भागात जंगली कुत्रे असतात त्याच्या जवळ पास देखील वाघ फिरकत नाही कारण हे जंगली कुत्रे अतिशय हिंस्त्र असतात व वाघाला देखील मारून टाकतात. भटके कुत्रे देखील गावात , शहरात कळपाने फिरतात . लहान मुलांवर हल्ला करतात. ( श्वान दंशाच्या घटनांपैकी अंदाजे 80 % घटनांमध्ये 3 ते 8 या वयोगटातील बालके असतात ) . आणि हे देखील लक्ष्यात ठेवा की भटका कुत्रा ही काही नष्ट होणारी जमात नाही .

मी तर माझ्या परीने गेली 3 ते 4 वर्षे गल्ली ते दिल्ली या प्रश्नावर लढत आहे.

Please read following quoted of William Faulkner :

Never be afraid to raise your voice for honesty and truth and compassion against injustice and lying and greed.

If people all over the world would do this, it would change the earth.

कृपया म्हणू नका की मला चावल्यावरच मी प्रश्नावर आवाज उठविण्याचा प्रयत्न करीन. खार तर श्वान दंशानंतर तुम्ही कोणत्या शारीरिक , मानसिक परिस्थिती असाल हे सांगण्याची गरज नाही .

Stray dog attack leaves elderly man badly injured https://t.co/LhvPc2S7yU via @TOICitiesNews


Stray dog attack leaves elderly man badly injured

| 

Nagpur: On Sunday morning, a few residents of RK Nagar in Zingabai Takli rushed out of their homes on hearing an elderly man crying for help at 4:45am. They saw a 67-year-old man from their locality with deep wounds on his right hand, bleeding profusely after he was bitten by a stray dog. The victim Muzaffaruddin Ahmed was immediately rushed to a private hospital in Ramdaspeth, where he is undergoing treatment for injuries on his right hand and fracture in one of his left hand fingers.
This incident is actually exposing casual approach of the NMC, which is yet to check population of stray dogs by launching animal birth control programme.
The victim's IT professional son Sameer said the dog menace is making everyone's life miserable in RK Nagar. After the incident, RK Nagar residents decided to take remedial measures for the safety of the colony's children and elders.
The residents are also planning to visit the NMC veterinary department and corporators Arun Dawre and Sangeeta Girhe to express growing dissent over increased stray dog menace.
Recalling the incident, Sameer told TOI that the dog attacked his father, a retired officer from NEERI, when he was on his way for morning prayers in a nearby mosque. Sameer said his father is now traumatized.
Moreover, the opening of dumping yard on the banks of Pili river has increased their problems, said a group of miffed residents. "The number of stray dogs in this part of the city has increased menacingly and dog bite cases being reported on a very frequent basis. People insist that approaching the NMC do not yield results and they are forced to find their own ways to deal with the problem," said a resident Raju Thakur.
Residents also claimed that a young boy was bitten by a stray dog recently. Several others too were attacked by strays in the past in this locality. A pack of stray dogs is a source of constant fear to pedestrians here, they added.


Monday, July 11, 2016

कुत्र्याने विष्ठा केली तर ती साफ करण्याची जबाबदारी श्वानप्रेमींची.

नमस्कार , आणि सुंदर दुपार ,

" कुत्र्याने विष्ठा केली तर ती उचलण्याची जबाबदारी श्वान प्रेमींची "

श्वान प्रेमींनो , प्राणी मित्रांनो , प्राणी मैत्रिणींनो , कृपया 5 जुलै , 2016 च्या लोकमत या दैनिकातील ही बातमी कृपया वाचा .

श्वान प्रेमींनो , प्राणी मित्रांनो , प्राणी मैत्रिणींनो , आपल्याला हे माहीत नसेल की " भारत " या देशात दररोज अंदाजे 1,41,960 व्यक्तींना श्वान दंश होतो.

" भारत " या देशात मानव प्राण्यांना देखील जगण्याचा कायद्याने अधिकार आहे.


कृपया ही माहिती वाचा
" डोंबिवली " या शहरात रोज अंदाजे 2.5 TON ( 2268 KILOGRAMS ) एवढी भटक्या कुत्र्यांची विष्ठा रस्त्यावर पडलेली असते . भटक्या कुत्र्यांच्या विष्ठे मुळे देखील लेप्टोचा धोका मानव प्राण्यांना असतो. 
 
 
कुत्रे पाळताय? मग काळजी घेण्याचे नियमही पाळा!
खायला घातले तर खरकटेही गोळा करा : अँनिमल वेल्फेअर बोर्डाची भटक्या कुत्र्यांबाबतही नियमावली जाहीर
खाऊ घालताना यापुढे हे नियम पाळाच


मुंबई : रात्री प्रवासात चोराची भीती कमी, पण भटक्या कुत्र्यांची भीती जास्त अशी परिस्थिती आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील गल्ल्यांमध्ये हजारो भटके कुत्रे आहेत. त्यांना घाबरूनच मुंबईकर प्रवास करतात. पण या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणार्या श्वानप्रेमींना आता त्यांच्या संगोपनाचे नियम पाळावे लागणार आहेत. अँनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने भटक्या कुत्र्यांच्या पालनाची नियमावली तयार केली असून, श्वानप्रेमींना ती पाळणे बंधनकारक असणार आहे.
भटक्या कुत्र्यांचा त्रास मुंबईतील प्रत्येक नागरिकांना आहे. रात्री-अपरात्री घरी परतताना कुत्र्यांना घाबरून सारे प्रवास करतात. आतापर्यंत अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी नागरिकांनी हल्ले केले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या या त्रासावर उपाय म्हणून भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणार्या श्वानप्रेमींवरच जबाबदारी टाकण्यात आली आहे. अँनिमल वेल्फेअर बोर्डाने याबाबतचा निर्णय घेतला असून आता भटक्या कुत्र्यांना सांभाळायचे असेल तर नियम पाळावे लागतील, असे म्हटले आहे. यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढणार नाही याची काळजी श्वानप्रेमींना घ्यावी लागणार आहे. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कुत्र्यांची नसबंदी करणे, आरोग्य तपासणी करणेही श्वानप्रेमींना बंधनकारक राहणार आहे. हे नियम मोडल्यास दंडात्मक रकमेची तरतूदही वेल्फेअरने केली आहे. (प्रतिनिधी) पाळीव कुत्र्यांसाठीही परवाना आवश्यक
अनेकांना कुत्रा पाळायला आवडते. मुंबईसारख्या शहरांमध्ये श्वानप्रेमींचा आकडा लाखोंवर आहे. पण घरात कुत्रा पाळायचा असेल तर त्यासाठीही नियम आहेत. पाळीव कुत्र्यांना लस दिली नाही तर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती अधिक असते. शिवाय पाळीव कुत्र्यांच्या विष्ठेच्या साफसफाईचा अतिरिक्त भार हा महापालिका कर्मचार्यांवर पडतो, असा दावा करीत महापालिकेने मुंबई प्रांतिक अधिनियमाच्या आधारे पाळीव कुत्र्यांसाठी नियम लागू केले आहेत. याआधारे पाळीव कुत्र्यांसाठी परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. एका श्वानासाठी १00 रुपयांचा परवाना शुल्क आकारला जात होता. पण नव्या प्रस्तावानुसार शुल्कामध्ये पाचपट वाढ करून तो ५00 रुपये इतका करण्यात आला आहे. शिवाय बिल्ला, शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. भटके कुत्रे असोत वा पाळीव, नियमांचे पालन केलेचे पाहिजे. श्वानप्रेमींनी तर या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कुत्र्यांना खायला घातले की जबाबदारी संपत नाही, तर त्यांची काळजी आपणच घ्यायला हवी. विशेषत: भटक्या कुत्र्यांबाबत बोलायचे झाल्यास ५0 कुत्र्यांवर खाण्याचा खर्च करण्यापेक्षा फक्त १0 कुत्र्यांच्या संगोपनाचा सगळा खर्च उचला. त्यामुळे कुत्र्यांपासून होणारे आजारही कमी होतील.
- सुनीश कुंजू,
सचिव, प्लान्ट अँण्ड अँनिमल वेल्फेअर सोसायटी
- भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणार्यांना त्यांच्या आरोग्य तपासणी आणि नसबंदीची जबाबदारी घ्यावी लागेल.
- इमारत परिसर, चाळीमध्ये भटक्या कुत्र्यांना आसरा देऊ नका. खेळाची मैदाने आणि लहान मुलांपासून कुत्र्यांना दूरच ठेवा.
- सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालू नका.
- कुत्र्यांना ज्या ठिकाणी खायला घालाल, तेथील शिल्लक उष्टे उचलून टाकणे, खाद्यपदार्थ घालणार्याची जबाबदारी असेल.
- कुत्र्याने विष्ठा केली तर ती साफ करण्याची जबाबदारी श्वानप्रेमींची.

कुत्र्याने विष्ठा केली तर ती साफ करण्याची जबाबदारी श्वानप्रेमींची.

नमस्कार , आणि सुंदर दुपार ,

" कुत्र्याने विष्ठा केली तर ती उचलण्याची जबाबदारी श्वान प्रेमींची "

श्वान प्रेमींनो , प्राणी मित्रांनो , प्राणी मैत्रिणींनो , कृपया 5 जुलै , 2016 च्या लोकमत या दैनिकातील ही बातमी कृपया वाचा .

श्वान प्रेमींनो , प्राणी मित्रांनो , प्राणी मैत्रिणींनो , आपल्याला हे माहीत नसेल की " भारत " या देशात दररोज अंदाजे 1,41,960 व्यक्तींना श्वान दंश होतो.

" भारत " या देशात मानव प्राण्यांना देखील जगण्याचा कायद्याने अधिकार आहे.


कुत्रे पाळताय? मग काळजी घेण्याचे नियमही पाळा!
खायला घातले तर खरकटेही गोळा करा : अँनिमल वेल्फेअर बोर्डाची भटक्या कुत्र्यांबाबतही नियमावली जाहीर
खाऊ घालताना यापुढे हे नियम पाळाच


मुंबई : रात्री प्रवासात चोराची भीती कमी, पण भटक्या कुत्र्यांची भीती जास्त अशी परिस्थिती आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील गल्ल्यांमध्ये हजारो भटके कुत्रे आहेत. त्यांना घाबरूनच मुंबईकर प्रवास करतात. पण या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणार्या श्वानप्रेमींना आता त्यांच्या संगोपनाचे नियम पाळावे लागणार आहेत. अँनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने भटक्या कुत्र्यांच्या पालनाची नियमावली तयार केली असून, श्वानप्रेमींना ती पाळणे बंधनकारक असणार आहे.
भटक्या कुत्र्यांचा त्रास मुंबईतील प्रत्येक नागरिकांना आहे. रात्री-अपरात्री घरी परतताना कुत्र्यांना घाबरून सारे प्रवास करतात. आतापर्यंत अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी नागरिकांनी हल्ले केले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या या त्रासावर उपाय म्हणून भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणार्या श्वानप्रेमींवरच जबाबदारी टाकण्यात आली आहे. अँनिमल वेल्फेअर बोर्डाने याबाबतचा निर्णय घेतला असून आता भटक्या कुत्र्यांना सांभाळायचे असेल तर नियम पाळावे लागतील, असे म्हटले आहे. यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढणार नाही याची काळजी श्वानप्रेमींना घ्यावी लागणार आहे. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कुत्र्यांची नसबंदी करणे, आरोग्य तपासणी करणेही श्वानप्रेमींना बंधनकारक राहणार आहे. हे नियम मोडल्यास दंडात्मक रकमेची तरतूदही वेल्फेअरने केली आहे. (प्रतिनिधी) पाळीव कुत्र्यांसाठीही परवाना आवश्यक
अनेकांना कुत्रा पाळायला आवडते. मुंबईसारख्या शहरांमध्ये श्वानप्रेमींचा आकडा लाखोंवर आहे. पण घरात कुत्रा पाळायचा असेल तर त्यासाठीही नियम आहेत. पाळीव कुत्र्यांना लस दिली नाही तर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती अधिक असते. शिवाय पाळीव कुत्र्यांच्या विष्ठेच्या साफसफाईचा अतिरिक्त भार हा महापालिका कर्मचार्यांवर पडतो, असा दावा करीत महापालिकेने मुंबई प्रांतिक अधिनियमाच्या आधारे पाळीव कुत्र्यांसाठी नियम लागू केले आहेत. याआधारे पाळीव कुत्र्यांसाठी परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. एका श्वानासाठी १00 रुपयांचा परवाना शुल्क आकारला जात होता. पण नव्या प्रस्तावानुसार शुल्कामध्ये पाचपट वाढ करून तो ५00 रुपये इतका करण्यात आला आहे. शिवाय बिल्ला, शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. भटके कुत्रे असोत वा पाळीव, नियमांचे पालन केलेचे पाहिजे. श्वानप्रेमींनी तर या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कुत्र्यांना खायला घातले की जबाबदारी संपत नाही, तर त्यांची काळजी आपणच घ्यायला हवी. विशेषत: भटक्या कुत्र्यांबाबत बोलायचे झाल्यास ५0 कुत्र्यांवर खाण्याचा खर्च करण्यापेक्षा फक्त १0 कुत्र्यांच्या संगोपनाचा सगळा खर्च उचला. त्यामुळे कुत्र्यांपासून होणारे आजारही कमी होतील.
- सुनीश कुंजू,
सचिव, प्लान्ट अँण्ड अँनिमल वेल्फेअर सोसायटी
- भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणार्यांना त्यांच्या आरोग्य तपासणी आणि नसबंदीची जबाबदारी घ्यावी लागेल.
- इमारत परिसर, चाळीमध्ये भटक्या कुत्र्यांना आसरा देऊ नका. खेळाची मैदाने आणि लहान मुलांपासून कुत्र्यांना दूरच ठेवा.
- सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालू नका.
- कुत्र्यांना ज्या ठिकाणी खायला घालाल, तेथील शिल्लक उष्टे उचलून टाकणे, खाद्यपदार्थ घालणार्याची जबाबदारी असेल.
- कुत्र्याने विष्ठा केली तर ती साफ करण्याची जबाबदारी श्वानप्रेमींची.

Saturday, July 2, 2016

भटक्या कुत्र्यांमुळे लेप्टोचा धोका कायम

भटक्या कुत्र्यांमुळे लेप्टोचा धोका कायम

निर्बीजीकरणाचा खर्च पाहता लसीकरणाचा भार पालिकेसाठी खूप जास्त असेल.

प्राजक्ता कासले, मुंबई | July 2, 2016 3:09 AM
- See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/lepto-risk-due-to-nomadic-dog-1260347/#sthash.PzJ9ls7T.dpuf

गुरे, उंदीर यांचा बंदोबस्त करणाऱ्या पालिकेसमोर कुत्र्यांच्या लसीकरणाचा प्रश्न
दरवर्षी मुंबईकरांना बाधणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील गुरे आणि उंदरांचा बंदोबस्त करण्याच्या योजना महापालिकेने आखल्या आहेत. मात्र गुरे आणि उंदरांप्रमाणेच भटकी कुत्रीदेखील लेप्टोच्या प्रसाराला कारणीभूत ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु शहरातील लाखभर भटक्या कुत्र्यांना हटवायचे कसे किंवा त्यांचे लसीकरण कसे करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत लेप्टोचा प्रादुर्भाव रोखणे अशक्य असल्याचेही पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी आलेली लेप्टोची साथ व या वेळी जूनमध्येच आढळलेले सहा रुग्ण यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने लेप्टोविरोधात उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लेप्टोस्पायरोसिस आजाराचे जिवाणू पसरू नयेत यासाठी महानगरपालिकेने या वेळी तबेल्यांवर कारवाई केली. ३२६ तबेल्यांपैकी १७१ तबेल्यांवर कारवाई करण्यात आली. शहरात उंदरांना मारणाऱ्या मूषकनियंत्रकांची कमतरता भरून काढण्यासाठी पालिकेकडून पुन्हा निविदा देण्यात येणार आहेत. मात्र लेप्टोचा तिसरा वाहक असलेल्या कुत्र्यांबाबत मात्र पालिकेकडून अद्याप कोणतेही धोरण ठरवण्यात आलेले नाही. २०१४च्या कुत्र्यांच्या प्रगणनेनुसार शहराच्या वस्त्यांमध्ये ६८,०८७ तर रस्त्यांवर २९,०८५ कुत्रे आढळले. मात्र ही अंदाजे संख्या आहे. यातील २५ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण होणेही बाकी होते. त्यामुळे आजमितीला साधारण एक लाख कुत्रे शहरात असण्याची शक्यता आहे. कुत्र्यांकडून अनेक आजार माणसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे त्यांचे  लसीकरण आवश्यक असते. पाळीव कुत्र्यांचे मालक नियमितपणे लसीकरण करून घेत असले तरी निर्बीजीकरणाचे कामच करताना मेटाकुटीला आलेल्या पालिकेने कुत्र्यांच्या लसीकरणाचा विषयच हाती घेतलेला नाही.
लेप्टोच्या जिवाणूंचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने धडक कार्यवाही करत तबेल्यांवर कारवाई केली व गुरांचे लसीकरण करून घेण्यास लावले.
उंदीर मारण्यासाठीही निविदा काढल्या जाणार आहेत. कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून निर्बीजीकरण केले जात आहे, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या. मात्र निर्बीजीकरणाचा खर्च पाहता लसीकरणाचा भार पालिकेसाठी खूप जास्त असेल.
श्वानप्रेमींनीही त्यासाठी पुढाकार घेतला तर परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, असे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्याने सांगितले.
लेप्टोस्पायरोसिस
  • कुत्रे, उंदीर, गुरे हे लेप्टो जिवाणूंचे वाहक असतात. या जनावरांच्या शरीरात असलेले लेप्टोचे जिवाणू त्यांच्या मलमूत्रावाटे बाहेर पडतात. हे मलमूत्र मिसळलेले पाणी पायाच्या जखमेवाटे (खरचटले असले तरी) शरीरात गेले तर लेप्टोचा संसर्ग होतो. तीव्र ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. योग्य उपचार मिळाले नाहीत तर मूत्रपिंड व यकृतावर परिणाम होऊन प्रसंगी मृत्यूही होऊ शकतो.
  • या वर्षांत आतापर्यंत लेप्टोचे २६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सहा रुग्ण जूनमधील आहेत. गेल्या वर्षी जूनच्या मध्यावर पडलेल्या पावसामुळे आलेल्या लेप्टोच्या साथीत १२ जणांचा बळी गेला होता. यावर्षीही लेप्टोची साथ येण्याची शक्यता आहे. पुराच्या पाण्यातून चालणे टाळावे तसेच लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्यावेत, अशा सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केल्या आहेत.
- See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/lepto-risk-due-to-nomadic-dog-1260347/#sthash.PzJ9ls7T.dpuf