Monday, June 29, 2015

नवीन उड्डाण पुलावरील खड्ड्यांची उड्डाणे .

 नवीन उड्डाण पुलावरील खड्ड्यांची  उड्डाणे .

" नवा काळ " या दैनिकाने आज ( सोमवार )  , २९ जून, २०१५ ला दिलेली हि बातमी वाचा त्याचप्रमाणे रविवार, ३ ऑगस्ट, २०१४ ला " नवा काळ " ने छापलेली बातमी वाचा.
तसेच   मी काही छायाचित्रे जोडत आहेत. हि सगळी छायाचित्रे मी  २८ जून, २०१५  रोजी सकाळीच काढली आहेत. या छायाचित्रांद्वारे  आपणाला या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे निदर्शनास आणून द्यायचे आहेत.
हे सगळे  ठाणे घोडबंदर मार्ग येथील कापुरबावडी येधील उड्डाणपुलाच्या नाशिक येथे जाणाऱ्या मार्गीकेवरील खड्डे आहेत.
२४ जुलै, २०१४ रोजी , घाई घाईत या अगोदरच्या राज्यशासनाने या उड्डाणपुलावरील हि नाशिक येथे  जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी चालू केली होती. त्यानंतरच्या पावसात म्हणजे २ / ४ दिवसातच त्या मार्गिकेवर  बरेच खड्डे पडले होते. व ते खड्डे दिवसागणिक मोठ्ठे होत होते.
त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या व इतर अनेक शासकीय अधिकार्यांना त्या खड्ड्यांबद्दल मी अनेक वेळा ई मेल द्वारे कळविले होते .  त्यावेळी भर पावसातच जुजबी  , तकलादू काम करून नव्या कोऱ्या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे बुझविले गेले होते.

सरकार बदलले , जून, २०१५ चा पाउस सुरु झाला आणि, मागच्याच वर्षी घाईत वाहतुकीसाठी सुरु केलेल्या या नाशिक येथे जाणाऱ्या कापुरबावडी येथील उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे पडले आहेत. यातील एक खड्डा तर अंदाजे २ मीटर लांब , १ / २ मीटर रुंद व अंदाजे ६ ते ८ इंच खोल आहे.

या छायाचित्रावरून आपल्याला असे कळेल कि हे खड्डे काही विशिष्ट प्रकारच्या विटा भरून बुजविले आहेत. पण तरीही काही ठिकाणी त्या विटा बाहेर पडून खड्डा जसाच्या तसा आहे.

सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे नवीन उड्डाणपुलावर असे खड्डे पडतातच कसे ? याचा अर्थ या उड्डाण पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे असेच म्हणावे लागेल.  यात भरीस भर म्हणजे या संपूर्ण उड्डाण पुलावर काही ठिकाणी धोकादायक अशी वळणे व अपघात होवू शकतील अशी काही ठिकाणे आहेत.

मुख्यमंत्री साहेब शासन या खड्ड्यांमुळे एखादा मोठ्ठा अपघात झाल्यावरच हालचाल करणार आहेत का ?

या उड्डाणपुलावरील मी पाहिलेल्या खालील काही गोष्टींबद्दल मी आपले लक्ष्य वेधू इच्छितो.

१. ) विजेच्या खांबां खालील पोकळी / जागा गेले वर्ष भर उघडीच आहे.
२. ) २५ अथवा २६ वा खांब गेले वर्षभर गायबच आहे.
३. ) खड्ड्यात टाकलेल्या काही विटा रस्त्यावर विखुरलेल्या आहेत , त्याने अपघात होऊ शकतो.
४. ) विजेच्या खांबावरील WIRES , अनेक ठिकाणी लोंबकळत  आहेत.
५. ) धोकादायक वळणावर वाळूसदृष्य खडी पडलेली आहे. त्यामुळे वाहने घसरू शकतात.

या अगोदर   ही मी मुख्यमंत्र्यांना या उड्डाण पुलावरील काही धोकादायक गोष्टींबद्दल कळविले होते.  या उड्डाण पुलावरून आतापर्यंत काही अपघात झाले आहेत.

मी २८ जून, २०१५ ला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना ई मेल द्वारे हे सगळ , छायाचित्रांसकट कळविले आहे.

आपणही हा अपघाताला आमंत्रण देणारा उड्डाण पूल वापरताना अतिशय काळजी घ्या . जर काही दुर्घटना झाली तर शासन काहीच मदत करणार नाही.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet













No comments:

Post a Comment