Tuesday, June 2, 2015

उच्च रक्त दाब च्या रुग्णांसाठी " अच्छे दिन " आले नाहीत

उच्च रक्त दाब च्या रुग्णांसाठी " अच्छे दिन " आले नाहीत
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान " अच्छे दिन आयेंगे " या घोषणेमुळे भारतीय नागरीकांसारखा मी एक अति सामान्य भारतीय नागरिकही सुखावलो होतो.
निवडणुका झाल्या , आणि माझी रोजची सकाळ " अच्छे दिन " येतील या आशेवर सुरु होत होती व संपत होती. त्यातच मला डिसेंबर , २०१४ ला एक धक्का बसला . जरा सविस्तर पणे सांगतो.
मी स्वतः एक उच्च रक्त दाब या आजाराचा रोगी आहे. मला ALPHADOPA २५० नावाचे औषध दिवसातून ३ वेळा १ - १ गोळी अशी घ्यावी लागते. अंदाजे डिसेंबर , २०१४ पासून मला हे औषध कोणत्याच औषधाच्या दुकानात मिळेनासे झाले. मी अगदी नाशिक, वडोदरा येथे व्यवसाया निमित्त गेलो असताना तेथे देखील मिळाले नाही. सरतेशेवटी मी २५ जानेवारी , २०१५ ला बनविणाऱ्या Medibios Laboratories Pvt. Ltd. या कंपनीला ई-मेल टाकला . त्याचे उत्तर नाही आले म्हणून २९ , जानेवारी , २०१५ ला दुसरा ई-मेल टाकला. त्याचे हि उत्तर नाही आले म्हणून मग त्यांच्या कार्यालयात दूरध्वनी केला तेव्हा मला एक धक्का दायक माहिती मिळाली . ती म्हणजे या औषधामध्ये म्हणे त्यांना कमी नफा मिळतो म्हणून त्यांनी हे औषध बंद केले . जेव्हा मी त्यांना विचारले कि मग आमच्या सारख्या रुग्णांनी काय करायचे ? तर त्यांनी सांगितलं कि ALPHADOPA ५०० हि अर्धी गोळी दिवसातून तीनदा घ्यायची. जेव्हा मी औषधाच्या दुकानात गेलो तेव्हा परत मला एक मोठा धक्का बसला. ALPHADOPA ५०० या औषधाच्या १० गोळ्यांच्या पाकिटाची किंमत १६० रुपये . म्हणजे एका गोळीची किंमत १६ रुपये , आणि अर्ध्या गोळीची किंमत ८ रुपये . पण ALPHADOPA २५० च्या १० गोळ्यांच्या पाकिटाची किंमत होती २४=८० पैसे . म्हणजे एका गोळीची किंमत होती २=४८ रुपये. याचा सरळ सरळ अर्थ होतो कि या अगोदर मला दिवसाला ७=४४ रुपयाच्या गोळ्या लागायच्या पण आता हाच खर्च दिवसाला २४ रुपये , म्हणजे २२२ टक्क्यांनी माझा या औषधाचा खर्च वाढला. पुरावा म्हणून दोन्ही औषधांच्या पाकिटाचे छायाचित्र जोडले आहे.
भारतात उच्च रक्तदाब हा आजार अनेकांना होतो . या आजारात जर औषध वेळेवर नाही घेतलं तर त्याचे तब्येतीवर अतिशय वाईट परिणाम होतात. या आजारात औषध हि एक गरज होवून बसली आहे. भारतात असे किती नागरिक २२२ टक्क्यांनी वाढलेला खर्च सहजच करू शकतात ? माझ्या साठी तर " अच्छे दिन " न येता " मेहेंगे दिन " आले आहेत .
माझी शासनाला कळकळीची विनंती आहे कि शेवटी माझ्या सारखे अनेक मतदार नागरिक नाही जगले तर तुम्हाला मते तरी कोण देणार ?
" ठाणे वैभव " च्या ३ जुने, २०१५ च्या अंकात देखील हि बातमी आली आहे.



No comments:

Post a Comment