Sunday, April 29, 2018

ठाण्यामध्ये दर १८ मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा चावा / ठाणे करांमध्ये श्वान दहशत


" ठाण्यामध्ये दर १८ मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा चावा " / " ठाणे करांमध्ये श्वान दहशत "

रविवार , २९ एप्रिल, २०१८ च्या " ठाणे वैभव " , " महाराष्ट्र टाईम्स " , " लोकमत " , " पुढारी " या वृत्तपत्रात आलेल्या बातम्या देत आहे .

ठाण्यामध्ये दर १८ मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा चावा हि एक खरोखरच गंभीर बाब आहे .

त्या बातम्यांमध्ये अजून एक गोष्ट दिलेली नाही ती म्हणजे , मला माहितीच्या अधिकारा खाली मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महानगर पालिका हद्दीत दररोज अंदाजे फक्त १४ श्वानांचे निर्बिजीकरण होते , विचार करा आजच्या घडीला ठाणे महानगर पालिका हद्दीत अंदाजे ते .२५ लाख भटके कुत्रे आहेत . एक कुत्री वर्षाला अंदाजे १२ पिल्लाना ( १२ पिल्ले जगतात ) जन्म देते . या अश्या अमर्याद वेगाने भटक्या कुत्र्यांचे प्रजतपादन होत असताना , शासकीय माहितीनुसार दररोज अंदाजे फक्त १४ श्वानांचे निर्बिजीकरण होऊन काय होणार आहे ?

गेली १० ते १२ वर्षे , मी एक सामान्य ठाणेकर , बिचारा , या भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध अश्या वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध श्वान दंशाच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या घटनांविरुद्ध मी गल्ली ते दिल्ली लढत आहे .

- ठाणे महानगर पालिका हद्दीत दररोज अंदाजे ७० ते ८० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .

-
महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ,७७७ मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .

- भारत देशात दररोज अंदाजे ,४२,००० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .

तरीही ९९.९९ % भारतीय नागरिक मात्र चलता असे म्हणून , मुकाट्याने श्वान दंश रुपी प्रसाद ग्रहण करताहेत .

फेसबुक नावाच्या एक प्रभावी सामाजिक माध्यमांद्वारे मी हा प्रश्न अनेक वेळा मांडला .

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !