Saturday, September 30, 2017

भटक्या कुत्र्यांची दहशत - महाराष्ट्र टाईम्स - रविवार , १ ऑक्टोबर , २०१७

" भटक्या कुत्र्यांची दहशत "

रविवार , १  ऑक्टोबर , २०१७ रोजी  " महाराष्ट्र टाईम्स " या एका प्रतिष्ठित मराठी दैनिकात सानिका कसूरकर या एका पत्रकार भगिनीने लिहिलेला लेख छापून आला आहे तो येथे देत आहे . 

दुर्दैवाने तिला आकडेवारी  माहित नसावी असे या हा लेख वाचल्यावर  दिसून येते .  

त्याचप्रमाणे या लेखातील डॉक्टर अविनाश दवे यांना देखील बहुतेक सद्य स्थिती माहित नाही असेच जाणवते . 

थोडक्यात हि आकडेवारी वाचा : 

- ठाणे महानगरपालिका हद्दीत दररोज अंदाजे ५० ते ७० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो . 
- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७७७  मानव प्राण्यांना श्वान दंश होतो 
- भारत या देशात दररोज अंदाजे १,४१,९६०  मानव प्राण्यांना श्वान दंश होतो. 

श्वान दंशाच्या घटनांमध्ये ८० % वेळा ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात . 

श्वान दंश काय असतो हे या  सोबत जोडलेल्या छायाचित्रांवरून कळून येते. 

दुर्दैवाने ९९ % भारतीय नागरिक हे कोणत्याही गंभीर प्रश्नावर लढण्याच्या मनस्थिती मध्ये नसतात कारण एकच " माझ्या पिताश्रींचे काय जाते ? " ( आजच्या शुद्ध , प्रचलित मराठीत WHAT GOES MY FATHER"S ) 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !







No comments:

Post a Comment