Friday, August 31, 2012

Fight Against Air Pollution in the Residential Area on Ghodbunder Road, Thane , Maharashtra, INDIA




Polluting industries shift base from residential area

  • 1 Sep 2012
  • Hindustan Times (Mumbai)

BREATHER FOR RESIDENTS A textile factory has closed down its unit on Kolshet road

THANE: Ten years of battle by the residents of Kolshet road against pollution have finally yielded results. The last coalfired company on this road has finally decided to relocate from the area on the outskirts. This is the fifth company in the residential area to close down in the last two years.


Shree Shanti Processors, a textile factory in the Mohan Mills compound at Dokali Naka, has finally decided to shift base from the area. Thane resident Satyajit Shah was mainly responsible for this victory against polluting industries. Shah has been persistently fighting against the companies leading to air pollution on Ghodbunder road for the last 10 years.
NH Shivangi, regional officer of Maharashtra Pollution Control board said, “In the month of June, we had issued a notice to the company to relocate in six months. The company had time till November to relocate. However, they have decided to close shop without informing us. I had send my representatives to the company who said that it is shut down and planning to shift base.”
Shivangi expressed that the MPCB had taken action whenever the company had flouted the pollution norms in the past. “They did try to abide by the pollution norms, however the buildings in the area are higher than the height of their chimney. The company uses boilers which lead to pollution in the nearby areas. We thought in case the company flouts the pollution norms or even there is some accident, it would lead to lot of damage in the residential area and thus asked them to relocate,” Shivangi added.
Shah said, “My fight against pollution began 10 years ago after my mother died of lung cancer. I approached everyone from the MPCB to the central ministry in Delhi. I had filed RTI applications and also researched on the pollution levels affecting the residential areas. With the help of residents from the area we had staged protests and demonstrations many times. Our efforts have finally paid off. We can now breathe clean and fresh air.” The closure of this unit will come as a relief to the residents of Hyde Park , Shruti Park, Runwal Regency , Orchid Complex, Parameshwari Paradise, and Oswal Park.

Thursday, August 30, 2012

Fight by Parshvanath College of Engineering.



आमचं कॉलेज वाचवा


Aug 31, 2012, 01.22AM IST

Maharashtra Times

संदीप शिंदे

कल्याणच्या कोळसेवाडीत राहणारा विश्वास आव्हाड पार्श्वनाथ कॉलेजात मॅकॅनिकल इंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षात शिकतोय . विश्वासचे वडिल कल्याण रेल्वे स्टेशनजवळ भाजी विकून दिवसाकाळी कसेबसे शे सव्वाशे रुपये कमावतात . मात्र , मुलाच्या इंजिनीअरसाठी त्यांनी कष्ट उपसून पैसा उभा केला . गेल्या वर्षीची शिल्लक ३० हजार आणि यंदाची ६९ हजार अशा विश्वासची एक लाख रुपये फिचा डोंगर आजही त्यांच्या डोक्यावर आहे . हे पैसे कसेबसे जमवू . मग वर्षभरात मुलगा इंजिनीअर होईल . त्याला चांगली नोकरी लागेल आणि आपले हाल कायमचे संपतील अशी स्वप्न आव्हाड कुटुंब रंगवतंय . मात्र , आता या कॉलेजची मान्यता रद्द करण्याचा निर्णय आल्याने त्यांना जबर हादरा बसलाय . कॉलेजची मान्यता रद्द व्हावी की नाही हा वादाचा विषय असला तरी त्यात बिच्चाऱ् या विश्वासची काय चुक ? रक्ताचं पाणी करून मुलाच्या शिक्षणासाठी पै पै गोळा करणारे वडिल आणि पोटाला चिमटा काढून घर चालविणाऱ् या विश्वासच्या आईनं कोणतं पाप केलंय ... ही व्यथा केवळ विश्वासच्या कुटुंबाची नाही . त्याच्यासारखीच या कॉलेजातील तीनचारशे गोरगरीब मुलं अक्षरशः रडकुंडीला आलीत .



१७ वर्षांपुर्वी इंजिनीअरिंग , फार्मसी आणि पॉलिटेक्निक अशा तीन अभ्यासक्रमांचा समावेश असलेले पार्श्वनाथ कॉलेज ठाण्यातील घोडबंदर रोडवर सुरू झाले . मात्र , माजी ट्रस्टींच्या अभद्र कारभारामुळे इथल्या शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला . विद्यार्थी आणि शिक्षकांनी निकराने लढा देत या वादग्रस्त ट्रस्ट्रींना हद्दपार करून कॉलेजच्या कारभाराला शिस्त लावण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू केले . मात्र , कॉलेजच्या इमारतीला भोगवाटा प्रमामपत्र ( ओसी ) नाही . जमिनीची मालकी व्यवस्थापनाकडे नाही असे अशैक्षणिक मुद्दे उपस्थित करून २०१० साली आयसीईटीने कॉलेजती मान्यता रद्द करण्याचे फर्मान काढले . न्यायालयीन लढाईत हाय कोर्टानेही गेल्या आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब केले . इथल्या सुमारे १४०० विद्यार्थ्यांना अन्य इंजिनीअरींग कॉलेजमध्ये प्रवेश देऊन हे कॉलेज बंद करा असे निर्देष कोर्टाने युनिव्हर्सिटी आणि डीटींना दिले आहेत . मात्र , ही स्थलांतराची प्रक्रीया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आता ती हाती घेतली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते . तसेच , पार्श्वनाथच्या निर्णयाचा आधार घेत जर कुणी राज्यातील ओसी नसलेल्या आणि जमिन मालकीचा वाद असलेल्या कॉलेजांवर बंदी घालण्याची मागणी केली तर अनेक कॉलेजांवर बंदीचे संकट ओढावण्याची भितीही शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे .



गेल्या वर्षी पार्श्वनाथच्या पॉलिटेक्नीक आणि फार्मसी कॉलेजची मान्यता रद्द झाली होती . मात्र , एक वर्ष संपुन दुसरे सुरू होण्यापुर्वी हे आदेश आले होते . त्यामुळे विभागांमधल्या ६८० विद्यार्थ्यांना अन्य कॉलेजांमध्ये प्रवेश देणे सोईचे झाले . मात्र , प्रवेश प्रक्रीया पुर्ण करून १६ जुलै रोजी इंजिनीअरींग कॉलेज सुरू झाले आहे . आता इथल्या 1400 विद्यार्थ्यांचे अन्य कॉलेजांमध्ये स्थलांतर करायचे म्हंटल्यास किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल . त्या प्रक्रियेत पहिल्या टर्मच्या अभ्यासाचा बट्याबोळ होऊ शकतो . तसेच , शेवटच्या वर्षाला शिकणा ऱ् या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टसाठी तयार केलेले ग्रुप फुटून हे विद्यार्थी अडचणीत येऊ शकतात . एआयसीटीईने कॉलेजची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांची अन्य कॉलेजांमध्ये सोय करण्याची जबाबदारी युनिव्हर्सिटी आणि डीटींवर येऊन पडणार आहे . विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत अंधेरीतले चिनॉय कॉलेज सरकारने मॅनेजमेंटला बंद करू दिले नाही . मग , पार्श्वनाथ कॉलेज चालविण्यास मॅनेजमेंट तयार असताना इथल्या विद्यार्थ्यांचे हित सरकारला कळत नाही का , असा सवाल उपस्थित केला जातोय . एआयसीटीई ही केंद्रिय स्तरावरची संस्था असली तरी मुंबई युनिव्हर्सिटी आणि डीटींनी या विषयातले गांभीर्य ओळखून विद्यार्थ्यांची बाजू कोर्टासमोर प्रभावीपणे मांडली नाही असाही आक्षेप नोंदवला जातोय .



ज्या इमारतीला ओसी नाही असा ठपका एआयसीटीईने ठेवला आहे तिथे २००८ साली कॉलेजचे स्थलांतर झाले होते . त्यानंतर २००९ साली कोणतेही आढेवेढे न घेता एआयसीटीईनेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांची इनटेक क्षमता २८० वरून ३६० इतकी वाढवली . त्याशिवाय सिव्हिल इंजिनीअरींगची नवी शाखाही सुरू करण्याचीसुध्दा अनुमती दिली . तेव्हाच ओसीचा मुद्दा उपस्थित करून कॉलेजची मान्यता रद्द केली असती तर आज हा गदारोळ माजलाच नसता . तसेच , गेली दोन्ही वर्षे इंजिनीअरींग प्रवेशाच्या आदल्या दिवसापर्यंत पार्श्वनाथचे नाव कॅप राऊंडमध्ये असायचे . ऐनवेळी ते गाळले गेले . त्याशिवाय डीटी आणि एआयसीटीईच्या यंदाच्या अहवाल पत्रांतल्या मान्यताप्राप्त कॉलेजांच्या यादित पार्श्वनाथचे नाव आहे . तर , त्यातून विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यात धुळफेक झाली त्याला जबाबदार कोण ? २०१० पुर्वी जेव्हा एका इमारतीत तीन - तीन कॉलेज भरवली जायची . माजी ट्रस्टी मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशासाठी पाच - पाच लाख रुपयांचे डोनेशन उकळत होते . अन्यायग्रस्त विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या हक्कांसाठी आंदोलनं करत होते . तेव्हा एआयसीटीईला इथल्या कारभारावर कोणताही आक्षेप नव्हते . मात्र , आता एका कॉलेजसाठी तीन सुसज्ज इमारती उभ्या राहिल्यात . तीन वर्षात एका नव्या पैशाचेही डोनेशन विद्यार्थ्यांनी दिलेले नाही . उलट गरीब विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते . शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारीच नव्हे तर विद्यार्थीदेखिल इथल्या व्यवस्थेवर समाधानी आहेत . मग , आताच एआयसीटीच्या डोळ्यात इथला कारभार का खुपतोय . ९ एप्रिल , २०१० रोजी इथल्या भ्रष्ट आणि वादग्रस्त ट्रस्टींना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर महिन्याभरातच कॉलेजची मान्यता रद्द करण्याची नोटीस देण्यामागचे गौडबंगाल काय , असे सवाल उपस्थित करून इथल्या प्राध्यापकांनी एआयसीटीईच्या कारभारावरच संशय व्यक्त केला आहे .



पार्श्वनाथ कॉलेज ज्या चार एकर जागेवर उभे आहे तीला सोन्याचा भाव ( आजच्या बाजारभावानुसार ४५ ते ५० कोटी ) आहे . वादग्रस्त माजी ट्रस्टी आणि ठाण्यातल्या काही पुढा ऱ् यांचा त्यावर डोळा होता . परंतु , विद्यार्थी आणि शिक्षकांनी अभेद्य एकजूट दाखवून त्यांचा डाव हाणून पाडला . बँकेकडे गहाण पडलेली जागा विद्यमान ट्रस्टींनी लिलावत विकत घेतली असून ती धर्मादाय आयुक्तांच्या मंजुरीने लवकरत कॉलेज व्यवस्थापनाच्या नावे होणार आहे . ठाणे महापालिकेने कॉलेजच्या इमारतीला ओसी देत कॉलेजच्या मार्गातला मोठा अडसर दुर केलाय . हाय कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आले आहे . कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही फेसबुक आणि व्टिटरच्या माध्यामातून कॉलेज वाचवण्याची मोहिम हाती घेतली आहे . राष्ट्रपतींपासून ते नगरसेवकापर्यंत हजारो लोकांना तसे ई मेल धाडले जात आहेत . विद्यार्थ्यांच्या पाठी उभे राहण्याचे आश्वासन युवा सेनेने दिले आहे . चुका कोणाच्याही असतील त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांच्या माथी नको एवढीच साऱ् यांची अपेक्षा असली तरी या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रातल्या अनागोंदीचा जो नमुना समोर आला आहे तो धक्कादायक आणि दुर्देवी आहे .



Wednesday, August 29, 2012

SERIOUS ISSUE OF STRAY DOGS

भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद


भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद



Please go through the following news article published on the front page in the Marathi Daily “ LOKSATTA “ dt. 29th Aug. 2012.



This article is self explanatory .



Also please go through the COMMENTS from READERS mentioned below the article.



I do hope that at least now SO CALLED STRAY DOG LOVERS will stop feeding Stray Dogs inside or outside premises of their housing societies and help in reducing the problems because of increase in the POPULATION of STRAY dogs.





Instead EARNESTLY REQUESTING to support , help HUMAN BEINGS rather than just increasing population of STRAY DOGS.



भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद

एका वर्षांत ७८ हजार मुंबईकर श्वानदंशाचे ‘शिकार’

संदीप आचार्य, मुंबई, बुधवार, २९ ऑगस्ट २०१२



शाळेत जाताना वाटेतच लहानग्या रोहनवर अचानक हल्ला करून तीन कुत्र्यांनी त्याला अक्षरश: फाडून काढले. रोहन जीवाच्या आकांताने ओरडत होता, परंतु त्याच्या मदतीला जाण्याची हिंमतही कोणाला झाली नाही. काही वर्षांपूर्वी बोरिवलीतील एका मैदानात चेंडू उचलण्यासाठी धावलेल्या एका बालकाला असेच भटक्या कुत्र्यांनी फाडून काढले होते. श्वानदंशाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असूनही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त मात्र होऊ शकत नाही. गेल्या वर्षी रत्यावरील कुत्र्यांनी एकटय़ा मुंबईत ७७ हजार ९४१ लोकांना चावे घेतले.



मुंबईत आजघडीला गुंडांपेक्षा भटक्या कुत्र्यांची दहशत अधिक आहे. पहाटेच्या व रात्रीच्या वेळी सायकल व स्कूटर-बाइकस्वारांचा भटके कुत्रे पाठलाग करतात, तेव्हा अपघात हा ठरलेला असतो. अशा अपघातांची नोंद पालिकेत होतच नाही. पूर्वी भटक्या कुत्र्यांना पकडून महापालिका ठार मारत असे. श्वानप्रेमींनी विरोध केल्यानंतर १९९४ पासून हा प्रकार बंद करण्यात आला. त्या वर्षी ३८ हजार ७१८ लोकांचे कुत्र्यांनी लचके तोडले होते. कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांची नसबंदी करा, त्यांना नॅशनल पार्कमध्ये सोडून द्या, त्यांच्यासाठी पालिकेने निवारा व्यवस्था करावी, अशा अनेक सूचना नंतर पुढे आल्या. पालिकेच्याच सूत्रांच्या म्हणण्यानुसार मुंबईत आजमितीस सुमारे साडेपाच लाख भटके कुत्रे असून, आजपर्यंत दोन लाख ३० हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. या नसबंदीपोटी पालिकेने तब्बल सात कोटी ४२ लाख ४५ हजार रुपये खर्च केले तरी ही नसबंदी योग्य प्रकारे झाली अथवा नाही, याबाबत ठोसपणे सांगण्यास पालिका अधिकारीही तयार नाहीत. भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा प्रस्तावही पालिकेच्या सीए विभागाकडे पडूनच आहे.

या विभागाकडे भटके कुत्रे पकडण्यासाठी केवळ तीस कर्मचारी असल्यामुळे निर्बीजीकरणाचे काम किती वेगाने होत असेल याचाही अंदाज येऊ शकतो.



आकडे बोलतात.. २००५ मध्ये ४३ हजार ९८० लोकांना श्वानदंश झाला. २००६ मध्ये ४५ हजार १८३, २००७ मध्ये ५४ हजार ६६१, २००८ मध्ये ६२ हजार ७६३, २००९ मध्ये ७७ हजार ७१२, तर २०१० मध्ये ७७ हजार ४८४ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले. २०११ मध्ये तब्बल ७७ हजार ९४१ मुंबईकर श्वानदंशाचे ‘शिकार’ ठरले. जुलै २०१२ पर्यंत ५० हजार ६४४ लोकांना श्वानदंश झाल्याची नोंद आहे.



आणि हे श्वाननियोजन.. २००९ मध्ये ३६ हजार ९० कुत्र्यांची नसबंदी झाली, तर २०१० साली ४४ हजार ४५ आणि २०११ मध्ये २६ हजार ९६१ कुत्र्यांची नसबंदी केल्याचे पालिकेच्याच अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.



Comments



+12 #9 राजेश भोलाणकर 2012-08-29 06:30

हे सगळे भटके कुत्रे द्या पाठवून मनेका गांधी च्या घरी.

Quote





+7 #8 Shilpa 2012-08-29 06:10

सगळ्या भटक्या कुत्र्यांना पकडून मनेका गांधी आणि श्वानप्रेमींच्य ा, भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालणाऱ्या लोकांच्या घरी नेऊन सोडा. नंतर बघू म्हणतात का कि विरोध करू दे कि भटक्या कुत्र्यांना मारू नका म्हणून. यांना कुत्र्यांचा जीव प्यारा आहे, सर्वसामान्य नागरिकांचा नाही.

Quote





+5 #7 केतन 2012-08-29 05:48

या कुत्र्यांना मनेका गांधीच्या घरी पाठवा. हे सर्व या बाईमुले होत आहे. नेहरू कुटुंबात कोण भिक घालत नाही म्हणून हिचे हे धंदे चालू आहेत.

Quote





+5 #6 अभिजित दातार 2012-08-29 05:24

श्वानप्रेमींनी विरोध केल्यानंतर १९९४ पासून हा प्रकार बंद करण्यात आला. ह्या श्वान्प्रेमिना आता कुत्र्यांना पकडायला पाठवायला पाहिजे मग कळेल कश्या वेदना होतात ते !

Quote





+5 #5 अभिजित दातार 2012-08-29 05:22

श्वानप्रेमींनी विरोध केल्यानंतर १९९४ पासून हा प्रकार बंद करण्यात आला.या श्वानप्रेमी लोकांमुलेच हि मुले आणि बाकी लोक कुत्रांचे बळी ठरले आहेत. याच लोकांनाच अश्या कुत्र्यांना पकडायला पाठवायला हवे म्हणजे कळेल कि कश्या वेदना होतात ते !!

Quote





+9 #4 मंदार ठुसे 2012-08-29 04:20

सगळी कुत्री गोळा करून मनेका गांधीच्या घरी सोडा या बाईनेच हा उपक्रम राबवला आहे.

Quote





+6 #3 rakesh 2012-08-29 03:57

भंपक "पेटा" वल्यावर मनुष्य्हात्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखला करावा. त्यांच्याच उद्योगामुळे हे त्रास भोगावे लागत आहेत.

एरवी उठसूट गले काढणारे हे भंपक लोक भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर मात्र गप्प बसतात. फार त्यांना कळवला असेल तर चार पाच पिसालालेया कुत्र्यांच्या सहवासात सोडून द्यावे.

Quote





+7 #2 स्वप्नील 2012-08-29 03:18

मुंबई मध्ये कुत्र्यांना माणसापेक्षा जास्त सौरक्षण देतात, दहिसर मधेय सुद्धा हीच परिस्तिथी आहे लोक भटक्या कुत्र्यांना खायला घालतात आणि त्यांची लोकसंख्या वाढते आणि दुसऱ्यांना त्रास होतो त्याचा, मला आसे वाटते कुत्र्यांपेक्षा रस्त्यवर राहणाऱ्या लोकांना अन्न द्या

इथे काही सोसायटी मध्ये अस्सेस्च भटके कुत्रे ठेवले आहेत जी इतर लोकांना खूप त्रास देतात

Quote





+7 #1 नरेन 2012-08-28 22:04

ह्या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार?

आता कुठे गेले हे भंपक श्वानमित्र ? केळी खायला?

Quote