Friday, January 8, 2010

News in PUDHARI dt.7th Jan 2010

Folloewing news article appeared in marathi news paper, PUDHARI dt. 7th Jan. 2010.
We want fresh Air to Breath and it is our birth right.

Tuesday, January 5, 2010

News Appeared in LOKSATTA dt. 6th Jan.2010

Loksatta

6th Jan 2010

प्रदूषण रोखणे व पाणी बचतीसाठी आमदार केळकर यांचा पुढाकार
ठाणे/ प्रतिनिधी
पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊ न प्रचार करताना शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पदवीधर मतदारसंघातील भाजपा आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. घोडबंदर तसेच वागळे इस्टेट परिसरात कारखान्यांच्या प्रदूषणाचा नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल ठाण्यातील नागरिकांनी आंदोलन केले होते. जोपर्यंत कोळशाचा वापर होत राहील, तोपर्यंत प्रदूषण होणार, तसेच ग्लोबल वॉर्मिगला देखील कोळशाच्या ज्वलनाने भर पडते. त्यासाठी नैसर्गिक गॅस कारखान्यांना देखील उपलब्ध करून देण्याची मागणी केळकर यांनी केली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत माहिती देण्यासाठी केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद बोलावली होती. याप्रसंगी माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे भाजपा अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर अ‍ॅड. सुभाष काळे उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर १८ हजारांचे कर्ज आहे. राज्यासाठी सर्वंकष असे गृह, क्रीडा, सांस्कृतिकविषयक धोरण राबवण्याची गरज केळकर यांनी व्यक्त केली. सध्या विविध कामांसाठी जेएनआरयूएमअंतर्गत पैसे पालिकेला मिळतात, मात्र त्या खर्चापैकी अर्धा खर्च पालिकेला करावा लागतो. एवढा खर्च करण्याची तयारी पालिकांची नाही, त्यामुळे हे पैसे अनुदान म्हणून देण्याची मागणी केळकर यांनी शासनाला केली. कोकणात फयानग्रस्त झालेल्या शाळा व महाविद्यालयांना नुकसानभरपाई नव्हती, त्या संदर्भात आवाज उठवल्यावर महसूलमंत्री नारायण राणे यांनी शाळा व महाविद्यालयांच्या इमारतींना नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. विक्रमगड येथील ग्रामीण रुग्णालय सुरू न झाल्याबद्दल अधिवेशनात विचारणा केल्यावर २६ जानेवारीपूर्वी त्याचे उद्घाटन करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले. खेळाडूंना प्रतिदिन फक्त ४० रुपये भत्ता मिळतो, तो वाढवला तर खेळाडू जगतील, याकडे केळकर यांनी शासनाचे लक्ष वेधले. तसेच नागरी संरक्षण दलात काम करणाऱ्यांना होमगार्डच्या प्रमाणात भत्ता व हत्यारे मिळावी अशी मागणी त्यांनी विधिमंडळात केली.

News in Maharashtra Times dt. 6th Jan. 2010

घोडबंदरच्या प्रदूषणावर नॅचरल गॅसचा उतारा!
6 Jan 2010, 0115 hrs IST


- म. टा. प्रतिनिधी


घोडबंदर रोडवरील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे मेटाकुटीला आलेल्या रहिवाशांच्या लढ्याला यश मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रदूषण करणाऱ्या कंपन्या कोळशाचा वापर करत असून त्यांनी कोळशाऐवजी नॅचरल गॅसचा वापर केला तर प्रदूषणाची पातळी कमी होणार आहे. या परिसरातील कंपन्यांनी कोळशाचा वापर बंद करण्यास सहमती दर्शवली असून महानगर गॅसनेही त्यांना आवश्यक असलेल्या गॅसचा पुरवठा करण्याचे मान्य केले आहे.

घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्ध हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून येथे काँक्रिटचे जंगल उभे राहिले. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग इमारती थाटल्या गेल्या. परंतु, या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्ध हवेसाठी झगडावे लागत आहे. निवासी भागातील रासायनिक आणि टेक्सटाइल कंपन्यांमधून सोडला जाणारा वायू आणि रसायनमिश्रीत पाण्यामुळे या भागातील प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायूमुळे अन्नावरील वासना उडणे अशा अनंत तक्रारी या भागातील रहिवासी करू लागले आहेत. त्यामुळेच येथील रहिवाशी गेल्या दोन वर्षांपासून शुद्ध हवेसाठी लढा देत आहेत.

भाजपचे आमदार संजय केळकर या रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनस्तरावर प्रयत्न करण्यासह केळकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनताही हा प्रश्न मांडला होता. तसेच, चार महिन्यांपूवीर् रवी टेक्सटाइल या कंपनीच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यानंतर या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावून कोर्टात गुन्हे दाखल करण्यात आले. काही दिवस त्याचा परिणाम झाला असला तरी आता पुन्हा येथील प्रदूषण सुरू झाले आहे. याबाबत संजय केळकर यांनी मंत्री सुरेश शेट्टी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव पाठक यांची भेट घेऊन ठोस कारवाईची मागणी केली. जोपर्यंत कोळशाचा वापर सुरू आहे, तोपर्यंत प्रदूषण थांबणार नाही, हा मुद्दा केळकर यांनी निदर्शनास आणतानाच या कंपन्यांना नैसगिर्क गॅसच्या वापराचे बंधन घालावे, अशी मागणी केळकर यांनी केली.

त्यानंतर २ जानेवारी रोजी ठाण्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात संजय केळकर यांच्यासह स्थानिक रहिवाशांचे प्रतिनिधी सत्यजित शहा, सुहास पोतनीस, दीपाली पाटील, मैथिली चंदवणकर, नैसगिर्क गॅस कंपनीचे प्रतिनिधी आणि स्थानिक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच, प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मोहेकर उपस्थित होते. त्या बैठकीत नैसगिर्क गॅस वापरण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. येत्या दोन महिन्यांत या गॅस पुरवठ्यासाठी आणि कंपन्यांना तांत्रिक बदल करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असा निर्णय या बैठकीत झाला. त्यामुळे प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या घोडबंदरवासियांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.